गुरुवार, 16 जुलाई 2020

17 बालाजी पेटेकर खतगावकर

*अल्लाचा मित्र* 
***************

२६ जानेवारी जवळ आली होती.सलीम गुरुजींना सारखं एखाद्या चित्रपटाचा प्रसंग दिसावा तसे हनुमंताच्या पोराचं बोलणं दिसत होतं.देवा पुढं जाऊन मला पुस्तक,दप्तर,वह्या,शाळेचा ड्रेस नाही म्हणून गरिबीची तक्रार करणारा निरागस मुलगा सतत डोळ्यापुढे दिसत होता.एवढ्याशा पोरांमध्ये शिक्षणाची ओढ आणि चटके देणारी गरीबीची होरपळ पाहून गुरुजींना विचार करायला भाग पाडले होते.गुरुजी सकाळी लवकर उठले पहिल्या बसनेच नायगाव गाठले.संध्याकाळी काय आणले देव जाणे पण,एक पिशवी भरून कसलेतरी सामान आणले.

 कडकडत्या थंडीतही सकाळी सात वाजता शाळेतली सर्व मुलं गणवेशात आली होती न आलेली मुलं स्पष्ट गरीबची कळा दाखवत होती.एकदा शिंप्याच्या गणुच्या पोराला शाळेचा ड्रेस का आणला नाही म्हणलं तर तो म्हणाला, "गुरुजी इथं दोन बार पेरणी करून शेतात मोड लागत नाही.आम्ही कशाचा जीवावर संसार करावा तुटपुंज्या तीन एकरांत किती पिकलं बर.. घरात असलेले पैसे घालून पेरणी केली पण तेही गेलं वाया... दुसऱ्यांदा व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागली.".... गुरुजीचे मन सुन्न झालं होतं.झेंडावंदन झालं गावातील माजी विद्यार्थी झेंडावंदनाला हजर होते,ज्येष्ठ मंडळी,शिक्षणप्रेमी हे ही आले होते.
सलीम गुरुजींनी सर्वांना उद्देशून मनात साठवलेल्या शब्दांना वाहत केलं."मित्रहो, शिक्षण हा प्रगतीचा मार्ग आहे.माणूस मनाने,धनाने,ज्ञानाने श्रीमंत फक्त शिक्षणानेच होत असतो.म्हणून मी शिक्षणाला देव मानतो.त्याची पूजा केल्याने,आराधना केल्याने,साधना केल्याने नक्कीच यश मिळते.मी लहान असताना मला गरिबीमुळे शिक्षण घेता आलं नाही ही खंत अजूनही माझ्या मनात आहे माझं स्वप्न होतं.मी डॉक्टर व्हावं. मी अधिकारी व्हावा आणि तशी जिद्द,चिकाटीही होती पण,माझ्या गरिबीनं मला हैराण केलं. पैसेवाले पैसे भरून उच्च शिक्षणाला प्रवेश घेतले पुढचे शिक्षण घेतले नोकऱ्या मिळवले आणि अधिकारीही झाले.मला मात्र गरिबीमुळे शिक्षण पूर्ण घेता आलं नाही,शेवटी 'पळत्याची लंगोटी सही'म्हणून ही मास्तर कि धरली." गुरुजी पोटतिडकीने बोलत होते,माझ्या मनातली खंत,माझे स्वप्न सत्यात उतरावे म्हणून गावातील प्रत्येक घराघरात जाऊन पोरांना शिकवतो माझं स्वप्न त्या पोरात पाहतो पेरतो.आणि गावकर्‍यांनी माझ्यावर विश्वासही टाकला म्हणून गावकऱ्यांच्या कोणाचे घरांमध्ये जाऊन पोरांना मारून शिकवत असतो.
 आईही एकच असते पण तिला माता,अम्मा,मदर,माॅ,मम्मी वेगवेगळ्या नावाने हाक मारत असतो तसचं ईश्वरीही एक असतो पण आपल्या वेगळ्या धर्मातील लोकांनी त्याला देव,ईश्वर,भगवान,गाॅड असे वेगवेगळ्या नावांनी आपण त्यांना हाक मारत असतो. सर्व धर्मांची शिकवण एकच आहे ती म्हणजे माणुसकी,म्हणून मी माणुसकी हा सर्वात मोठा धर्म मानतो. आता शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना गावातील प्रतिष्ठित मंडळी कडून वह्या वाटप करण्यात यावे म्हणून एक मोठी पिशवी समोर आणली.गुरुजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शेवटी हनुमंताच्या मुलांना हा हाक मारून बोलावून त्याला एक पिशवी दिली कारण त्याची परिस्थिती गुरुजींना माहीत होती त्यांनी केदारनाथच्या मंदिरातले बोललेले त्याचे बोल अजूनही मनात रुसून बसले होते.गुरुजी ती पिशवी हनुमंताच्या मुलांना देऊन एका वर्गामध्ये घेऊन गेले काही वेळाने वर्गातून ते दोघे बाहेर आले सगळ्यांना आश्चर्य वाटले केदार चक्क बदलून गेला होता त्याच्या अंगावर नवा गणवेश होता,दप्तर नवे,पुस्तकं,वह्या तो फारच खुशीत दिसत होता सर्व मुलांना खाऊ वाटप करून घरी जाण्या सुट्टी दिली सर्व मुलांनी हेऽऽऽ करून एकच गलका केला.आनंदाने उड्या मारत वासरं पळावीत अशी पळत सुटली, गुरुजी मोठ्या कौतुकानं पाहत होते. तेवढ्यात कुणीतरी त्यांचा हात धरला गुरुजी वळून पाहिले, तर त्यांचा हात धरून केदार म्हणत होता "गुरुजी,मला हे शाळेचा ड्रेस हे सर्व साहित्य कोण दिले?" तेव्हा गुरुजींना काय बोलावं कळत नव्हतं त्या निरागस बाळाचा बोलणं जनरल नॉलेज अवघड प्रश्न सारखं वाटत होतं.तेव्हा विचार करून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत गुरुजी म्हणाले.बेटा मला हे सगळं अल्लांच्या मित्रांन दिलं. तेव्हा केदार तोंडावर हसू आणत भोळ्या मनानं विचारलं,गुरूजी हे अल्ला कुठे राहतो, आम्हाला का दिसत नाही?किती अवघड प्रश्न त्यांन अगदी सहज विचारलं होतं. गुरूजी त्याचे प्रेमानी गाल ओढत म्हणाले,बेटा,अल्ला म्हणजे देव,गाॅड,ईश्वर,नाव अनेक पण,देव एकच...काल येऊन तो माझ्या अल्लाच्या मित्रानं तुला हे द्यायला सांगितलं. गावातील सर्व हे पाहत होते. देव कुणी पाहिला नव्हता पण चांगल्या विचारांच्या माणसात देव राहतो हे मात्र नक्की... म्हणून तर गावातील काही चांगल्या माणसांना देवमाणूस म्हणतात.देव सज्जनात राहतो.देव चांगल्या गुणात राहतो.देव धर्मात नसतो देव चांगल्या कर्मात असतो.देव जातीत नसतो देव पिक पिकवुन भुक भागवणा-या काळ्या मातीत असतो.तो मजिद,गुरुद्वारा,चर्च,देवळात नसतो,देव भुकेलेल्या माणसाच्या कवळात असतो.हे सर्व त्याच्या विचाराच्या पलिकडचे होते.पण त्याला ऐवढे समजले होते की,मला हे सर्व मिळाले ते माझ्या हुशारीमुळं मिळालं.अल्लाच्या मित्रामुळं मिळालं.अल्लाचा मित्र  ऐवढा चांगला तर अल्ला कसा असेल...
मंदिरातल्या,मजिदीतल्या,चर्च मधल्या गुरुद्वारा मधल्या मुर्तीत  देव असो वा नसो पण अल्लाचा मित्र म्हणून आलेल्या गुरुजीत मात्र देव दिसत होता. आणि केदारही सर्व मुलांना सांगत फिरत होता आता मी खूप अभ्यास करणार... खूप पुस्तकं वाचणार... मी खूप मोठा होणार.... अल्लाच्या मित्रांनी मला हे सर्व दिलयं.....
अल्लाच्या मित्रांनी हे सर्व  दिलयं......

*बालाजी पेटेकर खतगावकर*
कलाध्यापक,श्री.सद्गुरु नराशाम विद्यालय टेंभुर्णी ता. नायगाव जि.नांदेड 
भ्र.८९७५३४०७७७

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...