अजय शिवकर यांची अंगावर शहारे आणणारी लघुकथा
*आत्म्याचं दुखण*
"!! *देह करी जे जे काही* !! "
"!! *आत्मा भोगितो नंतर !!*"
"यलकोट यलकोट जय मल्हार "
सदानंदाचा यलकोट ,,,,
अशा जय-घोषात शिवकर कुटुंबाची गाडी जेजूरी वरून गावी केळवणे येथे दोन दिवसांनी संध्याकाळी ७ वाजता परत आली ,कुटुंबातील प्रमुखाने ताकीद दिली होती आधी कुळदेवतेच्या देवळात आरती होईल मग आपापल्या घरी जा,माझे घर देवळासमोर असल्यामुळे मी आधी घरीच गेलो सौ. तर खूपच थकली होती
मीः अग चल चल आधी आरतीला जाऊ
सौःनाही हो मी नाही येत तुम्ही जा
मीःअरे अस कसं इतक करुन काय फायदा पोरा-बाळांच्या सुखासाठी आपण जेजुरीला जाऊन देव घेऊन आलो ना चल लवकर
तीः नाही येत ना,,,
मी खुप वेळा सांगून बघितलं पण ..तीच सारखं उत्तर नाहीच.
एव्हाना मला राग येऊन आवाज वाढला होता
मीःचल मुला-बालांना काय झालं तर
तीः होऊ दे
,,,,आणि पुढच्याच क्षणी मी तिच्या श्रीमुखात दिली ,,,
ती तोंड झाकून रडू लागली ,तिच्या गालावर कमी पण ह्दयावर जास्त लागलं होत,लग्नाच्या ५ वर्षात पहिल्यांदाच मी हात उचलला होता , माझी चुक मला जाणवली पण माघार कोण घेणार ? शेवटी मी पुरुष होतो ,माझा पुरषार्थ आडवा येत होता ,आणि मग येईल ते तोंडात बरळुन मी देवळात आरतीला एकटाच गेलो .
रात्रीच जेवण झाले कुणी कुणाशी बोलत नव्हता
अंथरूणावर पाठ टेकली आणि लक्ष भिंतीवरील आजोबांच्या फोटोकडे गेलं तेच मला अडी-अडचणीला योग्य मार्गदर्शन करत माझे डोळे झोपेमुले बारीक होत होते...............
बाहेर खूप आवाज येत होता,मी दार उघडून बघिटलं रामभाऊ काकांच्या घरासमोर गर्दी होती मी त्यांच्या घरात गेलो पाहतो तर काका शेवटच्या घटका मोजत होते ,त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते ,लहानमुलांप्रमाणे हुंदके देत होते ,आजूबाजूला पूर्ण परीवार होता पण त्यांचं लक्ष कुणाकडेच नव्हतं , मला थोडं विचित्र वाटल आणि हे जास्त बघवलही नाही मी मागं-मागं सरकताना माझ्या हाताचा कोपरा कोणालातरी लागला पाहतो तर आजोबा ....
आजोबाःकाय बघतोस बाळा
मीःबाबा हे असे का करतात
आजोबाः त्याची शेवटची वेळ झाली आहे
मीःपण बाबा हे मरताना असे का करतात दोन वर्षापूर्वी आपल्या शेताशेजारी रंगा मामा सर्पदंशाने मेला होता तो तर खूप ओरडत होता किंचालत होता आणि हे काका तर हुंदके देतात
आजोबाः बाळा ह्या दोघांत खूप फरक आहे
रंगा हा अय्याशी होता व्यसनाधीन होता पोरी-बालींची छेड काडणं बाया-बापड्यांवर नजर ठेवणं देवाने दिलेल्या या देहाचा त्याने कधी सद्पयोग केला नाही या उलट रामभाऊने समाजकार्यासाठी आपला देह चंदनासारखा झिझवला तो निर्व्यसनी होता देवाने दिलेल्या शरीराचा योग्य उपयोग केला ,
बाळा हा देह नाशिवंत असतो पण आत्मा पवित्र असतो मग तो रामभाऊचा असो की रंगाचा,आत्मा सोडून जाताना रामभाऊला मिठी मारतोय नी रडुन सांगतोय तुला सोडून जाताना मला दुःख होतय मला ह्या देहात तु सूखात ठेवलास धन्य केलस मला जावेसे वाटत नाही ,,,,म्हणून रामभाऊ हुंदके देतोय ,पण रंगाचं तस नव्हतं त्याचा आत्मा बाहेर जाताना त्याला लाथा-बुक्यानं तुडवत होता की मला तु बदनाम केलस ,चांगल्या कामी लावलस नाही ,आणि म्हणून तो मरताना ओरडत होता ....
............मिक्सरच्या गरररररररर आवाजानं मी खडबडुन स्वप्नातुन जागा झालो सकाळचे ७वाजले होते ,भिंतीवरील आजोबांच्या फोटोला हात जोडून नमस्कार केला,आज आजोबा जाऊन १५ वर्ष झाली होती पण अजून ते आहेत अस वाटत होते
..............तिच्या कडे बघितलं अजून अबोलच होती .....
दूरवर कुठं तरी गाणं चालु होत
!! *देह करी जे जे काही आत्मा भोगीतो नंतर* !!
तोंडावर पाणी मारून तसाच बाजारात गेलो , येताना आजोबांसाठी हार आणि सौ.साठी तिच्या आवडीचा मोगऱ्या चा गजरा घेऊन आलो,
द्यायची हिम्मत नव्हती ,ती किचन कट्यावर भाजी कापत होती मी हळुच गजरा फ्रिजच्या हँडलला अडकून ठेवला ,तिने फ्रिज उघडताना गजरा बघितला आणि एक नजर माझ्यावर मी काही न बोलता कळविलीन माफी मागितली ...ती फक्त हसली ,मी जवळ जाऊन दोन्ही हात हातात घेऊन डोळ्यांनीच तिला वचन दिले की परत असा वागणार नाही
*शेवटी मला आत्मा दुखवायचा नव्हता माझा ,तिचा आणि इतर कुणाचाही*
*अजय शिवकर*
*केळवणे पनवेल*
७९७७९५०४६४
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें