बुधवार, 24 जून 2020

7 अंकुश शिंगाडे

खावटी

          बाहेर पावसाची सारखी रिपरिप सुरु होती. धरणी न्हाऊन तृप्त झाली होती. हवेत गारवा निर्माण झाला होता. तृणाअंकुरही धरणीतून डोकं काढून बाहेर आले होते. तरीपण त्याचे पाय जमीनीतच होते.पक्षी किलबिल करीत होते. पण पावसात भिजल्यानं गारठले असल्यानं आपल्या जोडीदारासमवेत अगदी निगरगट्ट राहून बसले होते. तसं त्याच्या जोडीदारांनाही हायसं वाटत होतं.
          बाहेर पाऊस पडत असल्यानं सगळी माणसंही आपआपल्या घरातच होती. कोणाची भार्या भजी तळत होती तर कुणाची भार्या पापड. पाऊस सुरु असतांना आलेल्या सुगंधावरुन हे सगळं कळत होतं. हा सुगंध त्या धरणीमाईच्या सुगंधात मिसळून गेला होता.
           गंगाधर आपल्या झोपडीत विचार करीत बसला होता. तो त्या पक्षांचं निरीक्षण करीत बसला होता. त्याला आपल्या पत्नीची सारखी आठवण येत होती. गंगाधर शेतकरी होता. त्याच्याजवळ चार एकर शेती होती. शेती दुष्काळानं पिकत नव्हती. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ पडायचा. काही रात्री तर उपासातच काढाव्या लागायच्या. तरीही त्याच्या बानं त्याला शिकवलं होतं. त्याचं लग्नही करुन दिलं होतं.
        गंगाधरचं लग्न झालेलं होतं. तोही शिकला असल्यानं त्यानं नोकरीसाठी बराच प्रयत्न केला होता. पण बराच प्रयत्न करुनही नोकरी न लागल्यानं शेवटी निराश होवून तो शेती करु लागला होता आणि आता नोकरीसाठी प्रयत्नही करणे सोडले होते.
         त्यानं लग्न केलं होतं. शिकलेलीच मुलगी मागीतली होती. त्याला आता विचार आला होता की या आपल्या शेतीत पाहिजे तेवढं पिकत नाही. त्यामुळं नोकरी शोधलेली बरी. निदान मला नाही मिळाली तर काय झाले. आपल्या पत्नीला तर मिळेल.तसा आता तो तिच्या नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. त्यामुळं ते दोघेही नोकरीसाठी प्रयत्न करीत असतांना एका कंपनीत तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.
         ती नोकरी करु लागली होती. त्यामुळं साहजिकच तिला चांगलं राहावं लागत होतं. तिला मिळणा-या पैशाच्या आधारानं घर व्यवस्थीत चालत होतं. तसा जुने दिवस न विसरल्यानं गंगाधर साधा राहात होता. पण ती आपले सारे अस्तिवं विसरुन गेली होती. तशातच गंगाधर शेतकरी असल्यानं व गबाळपणानं राहात असल्यानं तो तिला आवडेनासा झाला. तसंही तिला वाटायचं की आपला पगार गंगाधरनं आपल्या घरात वापरायला नको. आपल्याला पोषणं त्याचं कर्तव्य आहे. याच कारणावरुन त्यांचं दररोज भांडणंही होत होती. अशातच ती एक दिवस त्याच्या घरुन निघून गेली.
          तीन चार महिने उलटले होते. एक पोस्टमेन घरी आला.गंगाधरची सही घेत त्याच्या हातात एक पत्र देवून गेला. गंगाधरनं पत्र उघडलं. तसं त्याला जाणवलं की तो त्याच्या पत्नीनं पाठवलेला नोटीस आहे. नोटीसात तिनं हुंड्याचा आरोप लावला होता व त्यामुळं ती गेली असं तिचं म्हणणं होतं. आता तिला त्याच्याकडून खावटी हवी आहे असंही तिचं म्हणणं होतं. कारण ती आजही अर्धांगीनी आहे असंही ती म्हणत होती.
         गंगाधर विचार करायचा की आपणच हिला नोकरी लावून दिली. आपणच तिच्या नोकरीसाठी प्रयत्न केले अन् आपल्यामुळंच ती पगार कमवू लागली. मग आपण संसाराला थोडा पैसा मागीतला तर काय झाले ? म्हणून पत्नीनं आपल्याला सोडून जायचं काय ? ती स्वतः गेली. तरीही तिनं नोटीसात लिहिलं की आपण हुसकावून लावलं. तसेच हुंडा मागीतला नसतांना मागीतला असं लिहिलं. कधी मारलं नसतांना मारल्याचा आरोपही. त्याला वाटत होतं की चूक तिचीच असून दोष मला देत आहे. त्यानंही तिला नोटीस पाठवला. त्यातच केस सुरु झाली. पण शेतीच्या सततच्या नापिकीनं तो एवढा मागं आला की वकीलाचे पैसे देवू न शकल्यानं न्यायालयानं त्याच्यावर खावटी बसवली. ती नोकरीवर असतांनाही ते तो सिद्ध करु न शकल्यानं........
          आज ती नोकरी करीत होती आणि तिला खावटीही मिळाली होती. चूक तिचीच होती. पण न्यायालयानं खावटी तिलाच दिली होती. पुरावे सादर केले नसल्यानं. शेती पिकत नव्हती. तरीही खावटी द्यावी लागतच होती.
           खावटीची इच्छा उभ्या आयुष्यात पुर्ण करता करता उभी शेती पूर्णतः विकल्या गेली होती. पण आजही खावटी बंद झाली नव्हती. तिनं लपून चोरुन एक बायफ्रेंडही ठेवला होता. कारण तिच्याजवळ नोकरी आणि खावटीचा पैसा होता. पण गंगाधर काही जीवनभर इच्छा असूनही लग्न करु शकला नाही. कारण त्याचा पैसा त्यालाच खावटी देत असतांना तसेच शेतीच्या नापिकीनं पुरत नव्हता. शिवाय त्याच्या पत्नीचीही टांगती तलवार त्याच्या डोक्यावर त्या कलमांतर्गत होती. ज्या कलमांनी आज ब-याच गंगाधरांची जिंदगी बरबाद केली होती. आलेली संकटं कलीयुगात पत्नी जीवंत असतांना तसेच मृत्यूनंतरही कित्येक गंगाधरांना झेलावी लागत होती. चूक त्यांचीच असायची. पण आजही कित्येक गंगाधरलाच न्यायालयानं दोषी मानून खावटी लावून शेत्या विकायला लावल्या होत्या. तसेच विवाहही करु दिले नव्हते. कारण तसे पुरावे आज कित्येक गंगाधरकडे नव्हते. आज याच कारणानं कित्येक गंगाधर आत्महत्या करुन संपले होते. पण खावट्या संपल्या नव्हत्या व खावटी मिळते म्हणून प्रश्न संपले नव्हते. पतींना धमक्या देणेही संपले नव्हते नव्हे तर न्यायालयात अशा प्रकारचे खटलेही दाखल होणे संपले नव्हते.

       अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...