रविवार, 28 जून 2020

8 खंडेराज वारकड

_इच्छाशक्ती_

      एक गाव होते.त्या गावाचे नाव होते करवली.त्या गावात दोन मित्र राहत होते ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असे. त्यांचे नाव होते रमेश व सुरेश. रमेश हा खूप गरीब होता पण तो खूप अभ्यासू सुद्धा होता आणि सुरेश हा खूप श्रीमंत होता पण त्याला वाटत होते की त्याला मोठे होऊन काहीच करायची गरज नाही कारण सुरेश च्या वडिलांचा खूप मोठा व्यवसाय होता. इकडे रमेशला मोठे होऊन जिल्हाधिकारी  बनायचे होते तो तुकाराम मुंढेंना त्याची प्रेरणा समजत होता पण सुरेश हा रमेश ला त्याच्या ध्येयापासून दरवेळेस भटकवत असे व त्याची खिल्ली  सुद्धा उडवत असे त्याला वाटत होते की जिल्हाधिकारी  बनणे सोपे नाही व आपला मित्र कधी बनू शकणार ही नाही पण रमेश हा त्याच्या ध्येयापासून कधीच भटकला नाही व आपल्या  ध्येयाकडे सतत वाटचाल सुरु ठेवत राहिला. तो अभ्यास करत होता. एकेदिवशी रमेशचे स्वप्न खरे झाले व तो जिल्हाधिकारी  बनला पण एकीकडे सुरेश चे त्याच्या व्यवसायात खूप मोठे नुकसान झाले इतके की त्याचे घरदारही समाप्त झाले. शेवटी तो रमेश कडे आला व आपले जीवन जगण्यासाठी भीक मागायला लागला. रमेशने त्याला स्वतःच्या घरी छोटीशी नोकरी देऊन टाकली. 

 तात्पर्य : इच्छाशक्ती प्रबळ असल्यास मनुष्य कोणतेही काम करण्यास सक्षम असतो.

नाव:खंडेराज बळीराम वारकड
वर्ग:आठवा 
शाळा:जवाहर नवोदय विद्यालय परभणी 
मो.नं. 9960453288

1 टिप्पणी:

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...