रविवार, 31 मई 2020

रोज एकलेख :- चवेचाळीसावा दिवस भ्रष्टाचार

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- चवेचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 01 जून 2020 सोमवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- भ्रष्टाचार*

कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे.

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769

[01/06, 11:27 AM] दुशांत निमकर: *(02) भ्रष्टाचार: एक वैश्विक गंभीर समस्या*

            प्रत्येक क्षेत्रात कमी-जास्त प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे.भ्रष्टाचार ही एक समाजाला लागलेली कीड असून एक जागतिक समस्या बनली आहे.शिक्षण,आरोग्य,बांधकाम,सामाजिक,राजकीय या सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो.भ्रष्टाचाराचा प्रत्यक्ष संबंध लाच घेणे आणि लाच देणे यावर अवलंबून आहे.भ्रष्टाचार म्हणजे लाचखोरीच आहे.सामान्य व्यक्तीला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही म्हणजेच व्यवस्थाच भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे.अधिकारी,कर्मचारी सामान्य काम असले तरी पैशाची मागणी करतात आणि काम लवकर व्हायला हवं यासाठी देखील सामान्य व्यक्ती पैसे देत असल्याने ही समस्या आणखीनच गंभीर होत असतांना दिसते आहे.भ्रष्टाचार वाढीला कारणीभूत शासनकर्ते व शासनप्रणाली जबाबदार आहे असं वाटते.शाळा,महाविद्यालयात भ्रष्टाचार निवारण अधिनियम याबाबत माहिती दिली जात असली तरी त्याचे आचरण होत नसल्याचे निदर्शनास येत आहे आणि सर्रास लाच देणे, घेणे चालू आहेत या आशयाच्या बातम्या वृत्तपत्रात वाचायला मिळतात.प्रत्यक्षात भ्रष्टाचार वाढीसाठी कारणीभूत म्हणजे व्यक्तीचे अनैतिक आचरण होय त्यातूनच भ्रष्टाचाराचा जन्म होतो असे दिसते.,समाजामध्ये नैतिक मूल्याचा ऱ्हास होत असल्याने अगदी भ्रष्टाचार निवारण संशोधन कायदा धाब्यावर बसवून भ्रष्टाचार करीत असतो त्यामुळे आज भारतासह सर्व देशाला ही कीड लागलेली असून गंभीर समस्या ठरू पाहत आहे.

         भारतात लोकशाही संसदीय शासनप्रणाली असून जनताच लोकप्रतिनिधीची निवड करीत असतो पण निवड करीत असतांना सांगोपांग विचार करून मतदान करायला हवं त्यावेळी केवळ लोकप्रतिनिधी पैसे वा इतर वस्तूचे आमिष दाखवून निवडून येत असल्याने लोकप्रतिनिधीवर अंकुश राहत नाही त्यामुळे निवडून आल्यानंतर स्वतःचा स्वार्थ हेतू साध्य करण्यासाठी जनतेचा कोणताही विचार केला जात नाही त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा,कोळसा घोटाळा,तेलगी प्रकरण,डाळ घोटाळा,चिक्की घोटाळा,जलसिंचन विभागातील घोटाळा असे अनेक घोटाळ्यातून पारदर्शकतेचा आव आणणारे प्रतिनिधींनी हा भ्रष्टाचार केला आहे याला वाचा फोडण्याचे कार्य करणारे पत्रकार आहेत परंतु घोटाळा उघडकीस येऊ नये यासाठी पत्रकाराला मारहाण झाल्याचे उदाहरण भरपूर आहेत यात पदाधिकारी,अधिकारी यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी दूर राहून पारदर्शक,प्रामाणिकपणाने कार्य करण्यात यावे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्र शासनाचा एक रुपया पाठविला असता त्यांच्यापैकी फक्त पंधरा पैसे सामान्य व्यक्तिपर्यत पोहचते त्यामुळे स्वतः प्रामाणिक राहून समाजात आदर्श निर्माण केल्यास भ्रष्टाचार निर्मुलन नक्कीच होऊ शकते.

        शिक्षण क्षेत्र यातून सुटलेले नाही.शिक्षणाचे बाजारीकरण झालेले असून खाजगी शाळा खूप शालेय शुल्क आकारणी करीत आहे.शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी पैशाची मागणी केली जाते.उदा.शाळेला मान्यता मिळण्यासाठी,मेडिकल बिल काढण्यासाठी व इतर अशा अनेक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आर्थिक व्यवहार केला जातो.आर्थिक व्यवहाराचा प्रत्यक्ष संबंध भ्रष्टाचाराशी आहे.सुशिक्षित अधिकारी,कर्मचारी पदावर असतांना अनैतिक आचरणातून पैसे कमविण्याचा गोरखधंदा चालविला आहे असे केवळ आपल्याच गाव,तालुका,जिल्हा,राज्य,देश नाही तर प्रत्येक देशात ही समस्या आवासून उभी आहे त्यामुळे संविधानातील समतेच्या मूल्याची पायमल्ली होत असून गरीब-श्रीमंतीची दरी आणखी फोफावत आहे.

        भ्रष्टाचार निवारण संशोधन कायदा-2018 ची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे गरजेचे आहे.प्रत्येक पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी यांनी स्वतःच्या कर्तव्य प्रामाणिकपणाने करावे कारण प्रामाणिकपणा हा त्या सर्वांचा आरसा आहे म्हणून प्रत्येकांनी स्वतः भ्रष्टाचारामुक्त होण्यासाठी लाच देणे वा घेणे टाळले पाहिजे आणि एखाद्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यास RTI-2005 (माहिती अधिकार कायद्याचा) वापर करून कठोर कारवाई करण्यात यावी.सध्या परिस्थितीत नेता आणि अभिनेता यांना सामान्य माणूस आदर्श मानत असल्याने त्याचे वर्तन न्यायसंगत,पारदर्शक,प्रतिष्ठा राखणारे असायला हवे तेव्हाच या भ्रष्टाचाररुपी राक्षसाला देशातून नाहीतर जगातून हद्दपार करता येऊ शकते.

✒️ श्री दुशांत बाबुराव निमकर

       मु चक फुटाणा, चंद्रपूर

 मो न 9765548949

[01/06, 11:28 AM] महेंद्र सोनवने: *(08)*

*भ्रष्टाचार; एक चिंतन*

 "गल्लीत मोहल्यात गोंधळ आहे प्रत्येक भ्रष्टाचारी चोर आहे".

     सारा देश भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. देशातले पुढारी सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रचंड भ्रष्टाचार करत आहेत. हा भ्रष्टाचार असाच जारी राहिला, तर एक दिवस सारा देश भ्रष्टाचारात बुडल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला देशातल्या भ्रष्टाचाराविषयी प्रश्नद विचारला तर तो मोठ्या सात्वित संतापाने वरील शब्दात एक भाषण देतो. परंतु देशातला हा भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी तो एक पाऊलसुध्दा पुढे टाकायला तया नसतो. अर्थात भ्रष्टाचाराचा खात्मा करणे हे काही अशा मध्यमवर्गीय माणसाचे काम नव्हे. ते करणारे अण्णा हजारे सारखे खरोखरच धाडसी लोक आवश्यक आहेत. मात्र या मध्यमवर्गीय माणसाने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढावेच असावे असे आपण म्हणू शकणार नाही. मात्र त्याने स्वतः भ्रष्टाचार करू नये, शासन दरबारातील एखादे काम उशिरा झाले तरी चालेल पण आपण कोणाला लाच देणार नाही आणि संधी आली तर लाच खाणारही नाही अशी प्रतिज्ञा त्याने करावी. त्यांनी एवढी गोष्ट केली तरी देशातला भ्रष्टाचार बराच कमी होऊ शकतो. परंतु आपण लोक भाषण देण्यापलीकडे काहीच करत नाही.

"देशाचा हवा विकास, भ्रष्ट नेत्यांना बाळगू नका जवळपास."

हे भाषणसुध्दा जाहीरपणे देत नाही तर आपल्या मित्रांसमोर आणि बायका मुलांसमोर देतो आणि प्रत्यक्षात आपण स्वतःसुध्दा भ्रष्टाचारात लिप्त असतो हे तो मान्य करत नाही. नुकतेच एका अधिकार्या शी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्याशी बोलताना मी नेहमीप्रमाणे, पोलीस सध्या जास्त भ्रष्टाचार करत आहेत असा आरोप केला. तो आरोप ऐकल्यावर त्या  अधिकार्याचा मला राग आला खरे परंतु त्याने आपला राग आवरला आणि भ्रष्टाचाराच्या संबंधात काही माहिती सांगून मलाच काही प्रश्ना विचारले. पोलीस खात्यात भ्रष्टाचार असतो हे त्यांनी मान्य केले. मात्र पोलीस अधिकारी सतत गुन्हे करणार्याा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडूनच पैसे खात असतात असे त्यांनी म्हटले. पोलीस पैसा खात असले तरी देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा पोलिसांशी कधी संबंधही येत नाही आणि आपणही पोलिसांना पैसे दिले असे सांगणारे फार कमी लोक भेटतात. या अधिकार्यााने विचारलेला एक प्रश्नण फार भेदक होता. त्याने आमच्यासमोर बसलेल्या सर्वांनाच एक प्रश्नत विचारला, ‘तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश देताना देणगी दिलेली आहे का?’ प्रत्येकांनी सांगितले की आम्ही देणगी दिलेली आहे. परंतु मुलांच्या शाळा प्रवेशासाठी देणगी देणे हा कायद्याने गुन्हा आहे हे बर्यातच लोकांना माहीतसुध्दा नव्हते. परंतु या पोलीस अधिकार्याशने याची जाणीव करून दिली आणि देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा शाळा प्रवेश हा देणगी देऊन, संबंधित कायदा मोडून झालेला असतो. हे कटूसत्य सांगितले.

पोलीस भ्रष्टाचार करतात, सार्वजनिक बांधकाम खात्यात खूप भ्रष्टाचार असतो परंतु या भ्रष्टाचारामध्ये प्रत्येक व्यक्ती गुंतलेली नसते. परंतु शाळेत प्रवेश घेण्याच्यावेळी प्रत्येक जण भ्रष्टाचार करत असतो. त्याचा हा युक्तिवाद बिनतोड होता. त्या पुढे जाऊन त्याने आणखी एक गोष्ट सांगितली. लग्नात हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, एवढेच नव्हे तर सासर्यासने जावयाला काही भेटवस्तू देणे यालासुध्दा कायद्याने काही बंधने घातलेली आहेत. त्याशिवाय सरकारी कर्मचार्यांतवर, त्यांच्या घरच्या लग्न समारंभात किती खर्च झाला आणि त्यांना कोणी कोणी भेटवस्तू दिल्या याची माहिती सादर करण्याचेसुध्दा बंधन आहे. मात्र लग्न समारंभातले हे दोन कायदे सरसकट सर्व लोक मोडत असतात. त्याला अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सन्माननीय अपवाद असतात. मात्र लग्न समारंभात आपण कायद्याने ठरवून दिलेली अनेक बंधने मोडत असतो, भ्रष्टाचार करत असतो. मात्र आपण भ्रष्टाचार करत आहोत याची फार कमी लोकांना जाणीव असते आणि ज्यांना जाणीव असते त्यांना खंत नसते पण तरीही हे लोक भ्रष्टाचाराच्याबाबतीत लोकांवर आरोप करत असतात.

" भ्रष्टाचार देशातून मिटवू या ,भ्रष्ट राजनेत्याना  हटवू या !"

नुकतेच मित्राने छगन भुजबळबद्दल प्रश्नअ विचारला की छगन भुजबळ हे त्यांच्यावरील खटल्यातून सुटतील का त्यांना शिक्षा होईल? अनुभवी पत्रकार म्हणून त्यांना माझे मत हवे होते. त्यांना मी वेगळ्या पध्दतीने माहिती दिली. तुम्ही चप्पल खरेदी करता आणि दुकानदाराकडे पावती मागत नाही. हा गुन्हा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आपण सरळ सरळ पावती नाकारतो आणि सरकारचे कराचे उत्पन्न कमी करत असतो. आपल्यावर या प्रकरणात कोणी खटला भरत नाही म्हणून आपण सुरक्षित राहतो. पण तसा खटला भरण्याचा निर्णय कोणी घेतलाच तर आपल्याला शिक्षा होऊ शकते. आता छगन भुजबळ 0यांना जवळपास २ हजार कोटी रुपयांचा अपहार केल्याबद्दल कोर्टात खेचण्यात आले आहे. त्यांचे हे २ हजार कोटी रुपयांचे अनेक व्यवहार कायदेशीरच असतील का? कितीतरी ठिकाणी आपण चप्पल खरेदी करताना जसा भ्रष्टाचार करतो तसा त्यांनी केलाच असणार. त्यामुळे त्यांच्या सुटण्याचा प्रश्नआच नाही. एवढ्या मोठ्या व्यवहारापैकी एक छोटासा व्यवहार जरी कायद्याच्या कचाट्यात सापडला तरी तरी भुजबळ गजाआड जाऊ शकतात. आपण सगळे भ्रष्टाचारावर लेक्चर देतो परंतु लहान मोठ्या पातळीवर आपण सगळे भुजबळच असतो. मात्र पोलीस पैसे खातात असा आरोप करत असतो.

 *महेन्द्र सोनेवाने गोंदिया*

  *(9421802067 )*

[01/06, 11:46 AM] अमित बडगे: *(38)*

*"भ्रष्टाचार एक संसर्गजन्य रोग"*

     चिरीमिरीच्या रुपाने आलेल्या छोट्याशा विषाणूने धारण केलेले विक्राळरूप म्हणजे भ्रष्टाचार होय.हा भ्रष्टाचार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांच्या नसानसांत भिनलेला रोग  आहे. आज विज्ञानाची एवढी प्रगती झाली की,प्रत्येक दुर्धर आजारावर इलाज आहे परंतु भ्रष्टाचार हा एकमेव आजार बनलाय की ज्याच्यावर कोणताही विद्वान इलाज शोधू शकला नाही.यामागचे एकमेव कारण म्हणजे याचा संसर्गच एवढा शक्तिशाली आहे की,या रोगाचे उच्चाटन करणे अशक्यच बाब आहे.

    आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला. एखादे काम कुठलीही लाच न घेता करणे म्हणजे त्या कामाचे महत्व कमी करुन घेण्यासारखे झाले आहे.मतदाराने मतदान पैसे न घेता केले तर त्या मतदाराला महत्व उरेनासे झाले. मतदाराला वाटते,हा उमेदवार उद्या निवडून आल्यावर खोऱ्याने पैसा कमावणार मग मी आज मतदानासाठी पैसे घेतले तर बिघडले कुठे?निवडून येणारा उमेदवार तोच विचार करतो,निवडणुकीसाठी एवढा पैसा खर्च केला मग तो काढण्यासाठी भ्रष्टाचार हा मार्ग निवडतो. शाळेत बालकाला प्रवेश देण्यापासूनच  भ्रष्टाचाराची लागण अशी होते,तो भ्रष्टाचार हाडीमाणसी इतका भिनतो की,लपूनछपून निवडलेला हा चोरमार्ग मग राजमार्ग कधी बनतो ,हे लक्षातही येत नाही.

 "उजेड ज्याला मागावयास गेलो,

  तो सूर्यही लाचार पाहिला मी"

अशी अवस्था सूर्याइतके बुध्दीने तेजस्वी असणाऱ्या व्यक्तीची होते ती फक्त भ्रष्टाचारामुळे! एखाद्या रोगाने ग्रासलेला व्यक्ती जेव्हा हतबल झालेला असतो तेवढीच लाचारी,हतबलता जेव्हा भ्रष्ट व्यक्तीची लाचखोरी पकडल्यावर होते. भ्रष्टाचार हा रोग अतिशय संसर्गजन्य आहे. "देरे हरी पलंगावरी"अशी आळशी वृती जोपासणार्याना तर भ्रष्टाचार हा अगदी  चोखंदळ मार्ग वाटतो. जोपर्यंत तो उघडकीस येत नाही तोपर्यंत त्याची लागण इतरांना झपाट्याने होत असते. त्याचा प्रसार झपाट्याने होतो.आज असे एकही क्षेत्र नाही,जिथे या रोगाची लागण झालेली नाही. जुने लोक म्हणत असत,"लोकं मेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खायला कमी करत नाहीत". आधी या बोलण्यात अतिशयोक्ती वाटायची! पण जेव्हा कारगील युध्दाच्या वेळी संबंधित खात्याने कफन घोटाळा केला होता,तेव्हा मात्र मी हातून हादरले होते. ज्या क्षेत्राबद्दल नाव घेताच स्वाभिमानाने छाती वीतभर फुगावी त्या क्षेत्रात जर भ्रष्टाचार एवढा घुसला असेल तर इत्तर क्षेत्राबद्दल कल्पना किंवा विचारच न केलेला बरा!या भ्रष्टाचारामुळे गुणवंताना नाहीतर धनवंताना सर्व बाबींचा फायदा होतो. आज देशात भ्रष्टाचार नसता तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची गरजच पडली नसती. ज्या शिक्षणामुळे परिवर्तनाची दारे उघडली त्या शिक्षणाची दारे मात्र भरमसाठ लाच घेऊनच उघडली जाताहेत,हे किती शोकांतिका आहे!

   'एका हाताने टाळी वाजत नाही'  हे त्रिवार सत्य आहे. लाच मागणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढाच गुन्हेगार हा लाच देणारा आहे. कारण या धावपळीच्या युगात कोणाला थांबायला वेळच नाही. प्रत्येक बाब पैसा देवून जेवढ्या लवकर होइल तेवढ्या लवकर करुन घेण्याच्या हव्यासापोटी आपण भ्रष्टाचाराला रोज खतपाणी घालून वाढवतो आहेत. अशा वेळी सर्व भारतीयानी एकत्र येवून काही झाले तरी लाच देणार नाही व घेणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञाच घ्यायला हवी.कारण यासंदर्भाने अनेक कायदेही झाले  आहेत. परंतु जोपर्यंत मन:परिवर्तन होत नाही तोपर्यंत कायद्याचा काहीही उपयोग होणार नाही.

- अमित प्र. बडगे, नागपूर

   (7030269143)

[01/06, 11:52 AM] Ankush Shingade: भ्रष्टाचार की कथा

          शासन ने खिचड़ी पकाने का निर्णय लिया था। शासन हर पाच पाच साल मे अपने पाठशाला में बाटने वाले उपक्रम में बदलाव करते थे। अभी खिचड़ी लाये थे।पहले अंडे़, दूध आदि चीज़ बाँटते थे। परंतु कुछ दिन के चलते सरकार ने दूध और अंडे़ बाँटना बंद किये।क्योंकि वहाँपर भ्रष्टाचार होता था। उस अंड़ों में से ज्यादातर अंड़े खराब निकलते थे। अतः दूध में ज्यादातर पानी होने से उसमे अधिकांश पोषक तत्व नही रहते थे। उस वजह से बच्चों के सेहत को भी फक्र नज़र आता था। अपितु कुछ दिन योजनाओं का बौरा बज़ गया। छात्र को क्या देना चाहिए के चक्कर में बरसों बीत गये।तब शासन ने चाँवल बाँटने का प्रावधान लाया।लेकिन उसमे भी भ्रष्टाचार।चाँवल के पाकिट फोड़कर चाँवल बाँटते थे और उस फोड़े हुए चावल में जो भी चाँवल बचता था। वह चाँवल किसी दुकान में बाँट देते थे। कभी कभी तो चाँवल का पाकिट बच्चों के हाथ से फट जाने से चाँवल बच्चों के घर नही पहुँचता था।

         शासन ने उसका विचार किया कि वह चाँवल माँ बाप भी खाते थे। उसके बदले पाठशाला में खिचड़ी बनाने का उपक्रम पाठशाला में सरकार ने चालू करने का निर्णय लिया।खिड़की के तहत एक बच्चे को शंभर ग्रँम चाँवल तथा उसके पकाने की पुरी सामुग्री मिलती थी। उस सामुग्री के तहत एक बच्चा सौ ग्रँम चाँवल नही खाता था।अपितु इसमे भी बचता था पैसा।इस योजना के तहत सरकार को जरुर नुकसान हुआ। परंतु पाठशाला वाले बहोत ही धनवान हुए।उनको तो उस पैसों से इतना घमंड़ चढ़ा था कि वे लोग किसी भी अध्यापक को कभी भी पाठशाला से निकाल देते।वकीलों तथा कोर्ट को भी खरीद लेते और फैसलों को अपने पक्ष में तब्दील कर देते।इसी विषय से अध्यापक चिंतीत थे। देश भलाई स्वतंत्र हुआ था। लोगों ने भलाई स्वतंत्र्यता के सपने देखे होगे।देश में भलाई कानून बना होगा और भलाई पाठशालाओं में से पढ़े बच्चों का भविष्य उज्ज्वल बनता होगा। परंतु जिस देश में अध्यापक खुश न था। उस देश की बरबादी नज़दीक आ रही थी।

        भ्रष्टाचार के चलते हर पाठशाला में प्रधानाध्यापक छात्र पाठशाला में नही आने के बावजुद भी उसकी मौजूदगी दिखा देता।क्योंकि उसे खिचड़ी का पैसा ज्यादा से ज्यादा मिले और वह उन पैसों में से ज्यादा से ज्यादा पैसा कमाये।अध्यापक भी प्रधानाध्यापक से तकलिफ ना हो।अपितु वे भी उनका साथ दिया करते।सिर्फ दिखावे के लिए दो चार छात्र की मौजूदगी वे अध्यापक नही दिखाते हुए पाठशाला चल रही थी। इसमें शासन के पैसों का खुला अपहार था। परंतु शासन व्यवस्था कुछ नही कहती थी। कुछ करती भी नही थी।क्योंकि शासन व्यवस्था में मंत्रीयों के रिश्तेदार तथा पाठशाला भी उन्ही रिश्तेदारों की थी।

        कभी कभी तो पेपर में छपकर आता था कि खिड़की में सर्प पका।चूहाँ पका।फिर भी शासन ने खिचड़ी चालू ही रखी थी।

          खिचड़ी बनाते समय हरदिन अलग अलग पदार्थों की खिचड़ी बनाना,हरदिन खिचड़ी पकाना ऐसा नियम था। परंतु पाठशाला वाले कभी खिचड़ी पकाते,तो कभी पकाते ही नही थे। वैसे खिचड़ी के अलग अलग मेनू की जगह एक ही मेनू रहता था। जिस मेनू को खा खाकर छात्र बोर हो गये थे। अपितु वे घर से भोजन लाते। परंतु पाठशाला की खिचड़ी खाते नही थे।कोई कोई तो पाठशाला वाले सिर्फ हल्दी नमक के सिवा खिचड़ी में कुछ भी नही डालते थे। ना ही उसमें तिखापन और ना ही उसमें तेल रहने से उसका स्वाद ऐसे बिगड़ गया कि हर छात्राओं ने अधिकतर खिचड़ी खाना ही बंद किया।तब कितनी भी कम खिचड़ी बनाये पाठशाला वाले। इतनी सारी खिचड़ी बचती कि वह खिचड़ी कचरे मे फेंक देते।वह ऐसी जगह फेंक देते कि जहाँ सुअर,कुत्ते वह खिचड़ी खाते रहते थे। परंतु वे भी पुरी खिचड़ी न खाने से आजुबाजू में दुर्गंध फैलती रहती थी। अतः विषैलें जीवजंतू फैलने का डर भी था। इसी खिचड़ी की वजह से हर इलाके में सुअर दिखाई देते थे। अतः वे सुअर लोगों के बर्तनों को भी मुँह लगाते रहते थे।

         कम पकानेपर भी खिचड़ी में कुछ स्वाद की महक न रहने से जो खिचड़ी जो बचती थी।उसमें अध्यापक वर्ग की गलती नही थी। परंतु प्रधानाध्यापक अध्यापकों पर ही चिल्लाता रहता था। धमकाते रहता था। परंतु अध्यापको में से कुछ अध्यापक जब कहते थे कि वह खिचड़ी के हरदिन मेनू बदलाये और हरदिन खिचड़ी अच्छी परायें ताँकि स्वाद के महक से हर छात्र खिचड़ी खा सके। अच्छा स्वाद रहेगा तो कोई भी खायेगा।परंतु जो अध्यापक ऐसा सुझाव प्रधानाध्यापक को देने लगे थे। उनकी  प्रधानाध्यापक घृणा करने लगे थे। वे प्रधानाध्यापक उनको बड़ी तकलीफ देने लगे थे। क्योंकि उसमें से बचा चाँवल बेचते समय कभी भी इन अध्यापकों से अपने को क्षति पहूँच सकती है। ऐसे प्रधानाध्यापक को लगता था।

           खिचड़ी से मालामाल के गिनती में माधव का प्रधानाध्यापक भी आया था। बाकी लोगों के भाँति वह भी खिचड़ी से पैसें कमाने लगा था। अतः जो जो अध्यापक उसका विरोध करते रहते।वो वो अध्यापकों को वह परेशान करने लगा था। उस परेशानी का शिकार माधव भी हुआ था। क्योंकि माधव को भ्रष्टाचार पहले से ही नही चलता था। वह इमानदार था।बखूबी उसकी इमानदारी की चर्चा पुरे पाठशाला मेें थी। इसलिए उसके प्रधानाध्यापक से झगड़े होते रहते थे।

         प्रधानाध्यापक ने सैर में से तथा स्नेहमिलन से भी पैसा कमाया था। तथा उन पैसों के अतिरिक्त बोनाफाईट,परीक्षाशुल्क,सरस्वतीपुजन,तीलगुल,गोपालकाला आदि माध्यम से प्रधानाध्यापक बहोत ही धनवान बना था।वह आदि माध्यम से प्रधानाध्यापक धनवान बनते ही उसका स्वभाव इतना बदल गया कि अब वह किसी पुलिस या किसी कोर्टकचेरी को नही जानता था।

        अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२

[01/06, 1:29 PM]  Manisha Pandhare, Solapur: (४०)

मनिषा पांढरे, सोलापूर

भ्रष्टाचारावर नियंत्रण

भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली एक किड आहे. कोणत्याही कामासाठी पैसे देणे/ घेणे याला आपण भ्रष्टाचार असे म्हणतो.आज भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार झालेला आहे. कोणत्याही क्षेत्रात आज काम करायचे झाल्यास पैसे दिल्याशिवाय होतच नाही.कोणतेही क्षेत्र असू द्या तेथे भ्रष्टाचार दिसतो. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही भ्रष्टाचाराने शिरकाव केलेला आहे.

    आपल्याला भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी  खरी सुरुवात ही मी माझ्यापासून करायला हवी. प्रत्येकाने असे ठरवले तरच हे शक्य आहे. आपण इतरांकडून अपेक्षा ठेवत असतो पण स्वत: पासून कधीच सुरुवात करत नाही.तीच सुरूवात मी माझ्यापासून केली तर आपल्या कडून प्रेरणा घेऊन इतरही त्याचे अनुकरण करतील.

साध्या साध्या छोटया गोष्टींसाठी देखील आज पैसे द्यावे लागतात.

एक गोष्ट मला आठवते.....

यमराजाच्या दरबारात अनेक घड्याळ लावलेली असतात. सर्व घड्याळ वेगाने फिरत असतात त्यातच एकाने विचारले, " महाराज येथे सर्व देशांचे घड्याळ आहेत पण आमच्या भारत देशाची घड्याळ मात्र दिसत नाही ." तेव्हा यमराजांनी पंख्यांकडे बोट दाखवले......पंख्याला खालील बाजूस एक घड्याळ चिकटलेले होते . हा एक जोक जरी असला तरीही आपल्या देशातील भ्रष्टाचार किती वाढला आहे हे यावरून सहज लक्षात येते.

यासाठी मला कितीही त्रास पडला तरी माझे काम मी पैसे न देता अर्थात भ्रष्टाचार न काम करत राहू. काही कामे होण्यास उशीर होईल पण पाठपुरावा केला तर ते सहज शक्य आहे. तेव्हा आजपासून माझ्यासोबत तुम्हीही ठरवा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही आणि करु देणार नाही.

[01/06, 2:07 PM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *(09)*भ्रष्टाचाराचा भस्मासूर*

    

              संपूर्ण भारताला भ्रष्टाचार नावाच्या राक्षसाने ग्रासले आहे.भ्रष्टाचार ही आपल्या देशासमोरील गहन समस्या आहे. अगदी सरकारी शिपायापासून ते मोठ-मोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत अनेक लोक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत. आज भारतात कोणतेही छोटेमोठे काम करायचे झाले तर आपल्याला समोरच्याला थोडेफार चहापाणी द्यावेच लागते, कोणालाच त्यात काही वावगे वाटत नाही पण कळत नकळत आपणही भ्रष्टाचाराला बढावा देत असतो.

    भारताची विकसीत राष्ट्राकडे वाटचाल     सुरू     असतांनाच लोकसंख्येच्या भस्मासुराने भारताला ग्रासले आहे. सोबतच  बेरोजगारी भ्रष्टाचार  आहेच. 

            भ्रष्टाचाराची सुरवात झाली कशी व कुठून ह्याबद्दल   कोणीही फारशी माहिती सांगू शकत नाही, पण हे खर आहे कि जस जसा माणसांकडे पैसा येऊ लागला तस तसा माणूस चैनीच्या व दिखाव्याच्या गोष्टींकडे आकर्षित होऊ लागला. पूर्वी जेव्हा माणसांकडे जास्त पैसा नव्हता तेव्हा त्यांच्या साठी दैनंदिन गरजेच्या वस्तू महत्वाच्या होत्या. त्यांची अपेक्षा फक्त दोन वेळेचे पुरेसे जेवण आणि जीवनावश्यक वस्तू मिळविणे एवढेच होते. त्यामुळे पूर्वीचे बहुतेक लोक मेहनती आणि निर्मळ मनाचे होते. जसजशी सुधारणा होत गेली तश्या अनेक चैनीच्या वस्तू उपलब्ध होऊ लागल्या. गरज नसतानाही त्या हव्याहव्याश्या वाटू लागल्या. माणसांना लोभ वाटू लागला. जास्त मेहनत न करता अधिकाधिक संपन्न जीवन जगण्याची हाव वाढू लागली. ही हावच मूळ आहे भ्रष्टाचाराचे.

आपल्या पदाचा, अधिकाराचा गैरफायदा घेऊन कमीतकमी मेहनत करून जास्तीत जास्त नफा करून घेणे हा भ्रष्टाचारा मागचा उद्देश्य असतो. पण सामान्य माणूस सुद्धा तेवढाच गुन्हेगार जेवढा लाच मागणारा माणूस. सामान्य माणूस लाच देतो म्हणून समोरचा माणूस लाच घेतो. किती सहजपणे आपण नकळतच गुन्हा करत असतो. कितीवेळा बघतो आपण नाक्यावर पोलिसांनी पकडले कि सर्वजण पोलिसाच्या हातावर पन्नास – शंभर रुपये टेकवून पुढे निघून जातात. सरकारी नोकरीच्या ठिकाणी तर लाखांची लाच दिली जाते. शाळेत- कॉलेजात अॅडमिशन घेताना कोण-कोणाला पैसे चारले जातात. इतकच नव्हे तर देवळाच्या रांगेमध्ये सुद्धा आपण  रुपये देऊन लवकर दर्शन घेतो. का? देवाच्या दर्शनासाठी इतर भक्त उन्हात ताटकळत असताना आपण मात्र पैशाच्या जोरावर पुढे जाऊन दर्शन घेतो. पटत असेल का हे देवाला? आपल्या मनाला तरी पटते का? विचारांची श्रृंखला सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे.किती वेळा लोक दुसऱ्यांना पैसे देऊन नोकरी किंवा उच्च पद मिळवतात. 

        निवडणुकांमध्ये मतदारांना पैसे वाटून मत खरेदी केली जातात. नंतर जेव्हा अश्या लोकांना अधिकार प्राप्त होतात तेव्हा हे लोक अनेक पटींनी वाटलेले पैसे वसूल करतात. आपली प्रत्येक काम करताना आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. का हे आपल्याला आधी कळत नाही कि जे लोक चांगली काम करून निवडून येण्याऐवजी मतदाराला पैसे चारून निवडून येतात ते लोक निस्वार्थपणे समाजाची सेवा करणार नाही. तेव्हा आपण डोळ्यावर बक्षिसांची पट्टी बांधून कोणालाही निवडून देतो आणि मग भारतातील सिस्टीमला नाव ठेवत बसतो. पण आपली चूक कबूल करत नाही.

             कोरोणामुळे घरी चित्रपट पाहण्याची चंगळच. कालच एक चित्रपट  पाहिला . त्यात एक भ्रष्ट अधिकारी असतो जो पैसे घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये मुलांचे अॅडमिशन करून देत असतो. त्यामुळे चांगली बुद्धीमत्ता असलेली मुले पुढे येऊ शकत नाही याउलट कमकुवत बुद्धिमत्ता असलेली मुले पैशांच्या जोरावर डॉक्टरकी साठी प्रवेश मिळवतात. पुढे हीच मुले पैसे चारून पेपर विकत घेऊन पास होतात. काही काळानंतर त्या अधिकाराच्या मुलाला भयंकर रोग होतो आणि त्याचे ऑपरेशन करायचे असते. तो मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो तर तिथे त्याला पैसे देऊन डॉक्टर बनलेला मुलगा आढळतो. हा काय आपल्या मुलाचे ऑपरेशन करणार म्हणून तो दुसरीकडे जातो पण तिथे सुद्धा हीच परिस्थिती. तो ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथे सर्वत्र पैशाच्या जोरावर बनलेले डॉक्टर असतात. त्याला आपली चूक उमगते ,समजते पण "चिडीया चुग गई खेत अब पछतायं होयं क्या ? "आता वेळ निघून गेलेली असते.

           आपणा सर्वाना समजायला पाहिजे की, भ्रष्टाचार करून प्रगती करण्यापेक्षा मेहनत करून प्रगती करायला पाहिजे. थोड्या प्रमाणात त्रास झाला तरी चालेल पण पैसे देऊन आपण आपले काम करून घेतले नाही पाहिजे. कदाचित आपल्या सर्वाना हे पटत असत, पण पटलं तरी आपण कळत नकळत भ्रष्टाचार करत जातो.  "म्हणतात ना ,कळते पण वळत नाही." जेव्हा दुसरे आपल्या पेक्षा जास्त पैसे देवून आपल्या पुढे जातात तेव्हा मात्र आपण त्यांच्या नावाने शंख करत बसतो. कधी कधी तर असे होते की, आपण पैसे देऊन काम करवून घेतो आणि आपल्या ह्या वृत्तीमुळे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला सुद्धा सोप्या मार्गाने पैसे मिळवण्याची चटक लागते, मग तो माणूस एखाद्या गरिबाचे सहज काम करत नाही. कारण त्यात त्याला फायदा वा नफा नसतो. किती त्रास होत असेल गरिबांना या भ्रष्टाचाराचा हा आपण विचारच नाही करत. माझ काम पटकन झालं पाहिजे, पाहिजे तर थोडे पैसे घ्या पण काम करा ही अनेकांची वृत्ती असते.

आपण आपल्याला सुधारत का नाही ? हे सर्व तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ह्या देशातील प्रत्येक नागरिक आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही. थोडे कष्ट पडले तरी चालतील पण मी चुकीचे वर्तन करणार नाही अशी प्रवृत्ती जोपर्यंत भारतातील प्रत्येक माणसात येत नाही तोपर्यंत आपला भारत भ्रष्टाचार मुक्त होणार नाही. आपल्या भारताची प्रगती व्हावी अशी वाटत असेल तर आजपासून सर्वांनी प्रतिज्ञा करावी  मला कितीही त्रास पडला, कामाला कितीही वेळ लागला तरी ,मी भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही.मनातही भ्रष्टाचाराचा विचारांचा शिरकाव करू देणार नाही.आणि आपले भविष्य ,उद्याचे नागरिक यांच्या तही भ्रष्टाचाराच्या भस्मासूर शिरकाव करणार नाही असेच धडे गिरवू या!!

लेखिका 

*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*

      *(9420516306 )*

[01/06, 2:14 PM] senkude: ( 5)

भ्रष्टाचाराचा भस्मासुर

आजच्या काळात भ्रष्टाचार हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या साऱ्या श्रद्धा निष्ठा का हरवतात? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अमानवी कृत्य का करतो? मंदिराचा सुवर्णकळस घडवणारा कळसातील सोने चोरतो,  तेव्हा त्याच्या आचरणाला काय म्हणावे?

माणसाच्या या सार्‍या वृत्तीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे 'माणसाची उपभोगवादी वृत्ती'! 

ही उपभोगवादी वृत्ती माणसाच्या अंगात जोपर्यंत आहे तोपर्यंत तो भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला असेल. आजकाल भ्रष्टाचार हा गरीब-श्रीमंत सगळेच करताना दिसतात. सुव्यवस्था व सुविद्य माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात. 

फार प्राचीन काळी भ्रष्टाचार नावाचा हा शब्द अस्तित्वात नव्हता. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचारी माणसाला अतिशय कमी लेखले जाई. भ्रष्ट आचरण करणाऱ्याला वाव नव्हता. पण आज सार्‍या नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला आहे. आज एकही असे क्षेत्र नाही तेथे भ्रष्टाचार होत नाही.आज भ्रष्टाचार या शब्दाचा समाजजीवनात सर्रास प्रयोग करण्यात येत आहे.भ्रष्टाचाराचा भस्मासुर सर्वत्र बोकाळला आहे. भ्रष्टाचाराची वाळवी आज समाज मनाला पोखरू लागली आहे. समाजातून मानवीय नीतिमूल्यांचा नाश होत असून आज समाजामध्ये लाच घेणे, खोटे बोलणे, फसगत करणे, चोरटा व्यापार करणे, आयकर चुकवणे, अफरातफर करणे, बळजोरी करणे इत्यादी अनैतिक मार्गाचा अवलंब होऊन या अनेकविधी भ्रष्टाचार भ्रष्टाचाररुपी प्राण्यांने संपूर्ण समाज डोंगर पोखरून काढलेला आहे. आज भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात माणूस अडकत चालला 

आहे. आता या भ्रष्टाचारातून माणसाची सुटका होणार तरी कधी? हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनाला भेडसावत आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर आपले उघड उघड आकांत तांडव करून समाजाला काळीमा फासण्याचे काम करत आहे. भ्रष्टाचाराचा ओघ अव्याहतपणे सुरूच आहे. या अव्याहतपणे चालणाऱ्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला कधी पायमल्ली बसते? कधी आळा बसतो?

असा प्रश्‍न पुन्हा पुन्हा उपस्थित होतो?

〰️〰️〰️〰️〰️〰️

✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे

ता.हादगाव जि.नांदेड.

[01/06, 3:09 PM] जी एस पाटील: कोड नं.३६ विषय:-"भ्रस्टाचार" आजचा विषय फार महत्वाचा आहे.भ्रस्टाचार याची आपण फोड़ केली तर ती असेल अशी " भ्रस्ट अधिक आचार" भ्रस्ट म्हणजे वाईट आणि आचार म्हणजे आचरण म्हणजेच साधी सोपी व्याख्या केली तर "वाईट आचरण" म्हणजे भ्रस्टाचार हा शब्द वापरून वापरुन गुळगुळीत झालेला आहे म्हटले तर वावगे होणार नाही.कारण रोजचे कोणतेहि वर्तमान पत्र पाहिली तर कोठे ना कोठे एक तरी बातमी आपणास भ्रष्टाचाराची वाचावयास मिळत असते. या भ्रष्टाचारामध्ये शासनाचे कोणतेहि विभाग यातून सुटलेले नाहीत.हे आज पर्यंत वाचलेल्या वेगवेगळया बातम्या वाचून असेच समाजमन तयार झालेले असेल ते चुकीचे म्हणता येणार नाही. अगदी आपण रोज जे दुध खरेदी करतो ते शुध्द मिळते का? काय काय त्यात मिसळून जनतेच्या जीवाशी खेळणारे महाभागाची भांडाफोड झालेली दूर दर्शन वाहिन्या वरून पाहलेली आहे. हा भ्रस्टाचाराचाच भाग आहे.अशीच आपल्या दैनंदिन वापरातील वेगवेगळ्या अत्यावशक  असणा-या खाध्य तेल, कडधान्य, ज्वारी,गहू,तांदूळ ,वेगवेगळ्या डाळी यामध्ये भेसळ करून  भ्रष्टाचार मधून सुटका झालेली नाहीं. अगदी काही महाभाग आहेत वहानासाठी लागणारे डिझेल,पेट्रोल ही सुध्दां भेसळयुक्त नसेल असे सांगता येणार नाही कारण काही पेट्रोलच्या पंपाच्या तपासणी करून काही पंप आजहि बंद आहेत ही  भ्रष्टाचाराची उदाहरण म्हणता येईल.वेगळ्या ठिकाणी तयार होणारे रस्ते ते तयार करून घेणारे अधिकारी चांगले असले पाहिजेत नाही तर खडी,डांबर कमी वापरून काही ठेकेदार शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून भ्रष्टाचार करतात. आणि भ्रष्टाचार करणारे सर्वच काही सापडत नाहीत. यख साठी भ्रष्टाचार जर रोखायचा असेल तर जनतेने शासनाच्या लक्षात आणून देणेची गरज आहे.नाही तर एकच रस्ता दरवर्षी पावसाळ्यात उखडला जात असतो हे कशाचे लक्षण असते ते तुम्ही समजू शकता वेगळे सांगणेची गरज नाही.शासन काही ना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देवून गाय,म्हैस,शेळ्या,मेंढया  खरेदी करण्यासाठी विविध सोसायटी च्या मार्फत जनावरे खरेदी करण्यासाठी जवळच्या बाजाराची निवड करतात पण काही महाभाग स्थानिक सोसायटी कर्मचारी यांचेशी संपर्क साधून आपली पूर्वीची घरचीच जनावरे खरेदी केली असे दाखवून शासनाच्या चांगल्या योजनेचा गैरफायदा घेतात व जनावर खरेदीची रक्क्म खिशात घालतात हे सरकार ला फसवतात हा भ्रष्टाचारच नव्हे का?सर्वच ठिकाणी असे चालते असे नाही पण हे वास्तव नाकारता येणार नाही.याठिकाणी जो कोणी लाभ धारक असणार त्याच्या उत्पन्न काही वाढणार नाही तेवढेच राहणार मात्र तुमचा आमच्या करातून गेलेल्या पैसाचा गैरवापर होणार    अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देता येतील. शासकीय इमारती किवा छोटया मोठ्या पूलांच्या बांधकाम ठेकेदारा मार्फत केली जातात हया ठिकाणी काही ठेकेदार शासनास फसवत असतात गुणवत्ता पूर्वक करत नाहीत मुदतीपूर्वीच बांधकाम पडलेल्या घटना आपण दूर दर्शन वर कोसळलेले पूल किवा फुटलेले धरणाचे पाट आपण पाहिलेले आहे व त्या मुळे निरपराध लोकांचे बळी जावून काही कुटुंबे निराधार झालेली आहेत त्यांना आजहि शंभर टक्के मदत मिळालेली नाही अशाना भ्रष्टाचाराचा वास येत असतो.सध्या कोरोनामुळे आपली तिजोरी खाली झालेली आहे त्यामुळे दारुची दुकाने शासनाने सुरु केली आहेत कारण सगळयात जास्त दारूच्या करापासून जास्त ऊत्पन्न मिळते.पण याच दारू बंदी विभागामध्ये काम करणारा अधिकारी स्वतः दारू विकताना दारूच्या दुकानातच रंगेहात पकडलेली बातमी फोटो सह पाहवयास मिळते तर एका आरोग्य अधिका-याच्या शासकीय गाडीतच दारूच्या बाटल्याचा साठा सापडते ही भ्रष्टाचाराची उदारणे नव्हेत का? हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात आल्या शिवाय राहणार नाही.कोरोना या महामारीच्या काळात गावी जाणाऱ्या काही लोकांना प्रवास करणेचा बनावट पास वाटप करणारी टोळी सापडली म्हणजे हे वाईट आचरण नाही का ? शासनाच्या लाचलुचपत विभागा मार्फत विविध ठिकाणी सापळे रचून भ्रष्टाचार करणारे पकडले जातात पण "सापडला तो चोर" या म्हणी प्रमाणे असते त्या संबधीत कोणाचा सहभाग आहे हे सुध्दा शासनाने शोधून काढले पाहिजे.सहज म्हटले जाते " करेल तो भरेल "पण ही पकडली जाणारी घटना या हिमनगाचे टोक आहे.अशा या भ्रष्टाचारी जगात गरीबांना मात्र फार झळ पोहचत असते. भ्रष्टाचारामध्ये मोठे मोठे मासे सुटून जातात पण चिरीमिरी घेणारेच सापडतात. एकाने तर म्हटलेले माझ्या ऐकण्यात आले की भ्रष्टाचार वरुन खाली पाझरत असतो जो अधिकारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा चहा सुध्दा स्वीकारत नाही तो कनिष्ठ भ्रष्टाचार करताना घाबरत असतो.पण बोटावर मोजणारेच काही मा.तुकाराम मुंडे यांच्या सारखे शासकीय नियमानुसार काम करणारे व कोणाच्याहि दबावाला बळी न पडता आपले काम निष्ठेने करतात तर त्यांच्या हाताखालील काम करणारा कोणीही भ्रष्टाचार करणार नाही. वरिष्ट अधिका-याच्या बंदोबस्त करण्यासाठी खर्च करावा लागतो तो  त्यामुळे कनिष्ट कर्मचारी भ्रष्टाचार करत असतात आणि कधीतरी तरी ते लाचलुचपतच्या सापळ्यात सापडतात वरीष्ट अधिकारी नामानिराळे राहतात.हे सर्व आपणास मराठी  चित्रपट "झेड पी"सदाशिव अमरापूरकर यांचा   पाहिला असेल तर आपले लक्षात येईल.भ्रष्टाचाराची मुळे कशी पसरलेली आहेत हे आपले लक्षात आल्या शिवाय राहणार नाही. आपल्या देशातील विविध बैंक मधून लाखो हजार कोटि रुपये कर्ज घेऊन परदेशात पळून गेलेले आहेत हा भ्रष्टाचार नव्हे तर दुसरे काय म्हणावे.भ्रष्टाचारामुळेच गरीब हा अत्यंत गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत हा अगदी श्रीमंत होत चालला आहे.असा हा सहजा सहजी कोरोना सारखा न दिसणारा भ्रष्टाचार जनतेने मनावर घेवून भ्रष्टाचार करणा-याला पकडून देण्यास सरकारला मदत केली तर आपले राज्यच नव्हे तर आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त होण्यास वेळ लागणार नाही....लेखक... जी.एस.कुचेकर-पाटील.भुईंज ता.वाई जि.सातारा. मो.नं.७५८८५६०७६१.

[01/06, 3:23 PM] सविता साळुंखे: कोड नंबर 13

भ्रष्टाचार

'भ्रष्टाचार' म्हणजे भ्रष्ट असे आचरण होय .आचरण जे नीतिमूल्यांचा धरून नसते.

भ्रष्टाचार नाही असे एकही क्षेत्र भारतात तरी शोधून सापडणार नाही. शिक्षण, कला, संस्कृती, आरोग्य, धर्म, राजकारण ,समाजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला आढळतो. भ्रष्टाचार आहे असे आपण मान्य करतो म्हणजे भ्रष्टाचाराला आपणही कारणीभूत असतो .अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणाऱ्या हा अधिक दोषी असतो ,तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या पेक्षा तो पाहणारा व होऊ देणारा  अधिक दोषी असतो.

चारा घोटाळा, बोफोर्स तोफा घोटाळा, जलसिंचन घोटाळा, कारगिल युद्धाच्यावेळी चा कफन घोटाळा यादी करतच गेलो तर कागदही पुरणार नाही एवढी भ्रष्टाचाराची मोठी यादी आहे. सर्वसामान्य व्यक्ती म्हणेल मी या घोटाळ्यात कुठे होतो ?;परंतु आपल्या दैनंदिन जीवनात देखील आपण भ्रष्टाचारात सामील असतो याचे छोटेसे उदाहरण आपल्याला बघता येईल. जेव्हा बस मध्ये एखाद्या छोट्या मुलाला घेऊन आपण प्रवास करतो आणि कंडक्टर विचारतात या मुलाचे वय किती तर मुलाचे अर्धे तिकीट काढायला नको म्हणून इयत्ता दुसरीत असणाऱ्या मुलालाही आपण बालवाडीत ही जात नाही असे सांगतो म्हणजे सामान्य माणूसदेखील भ्रष्टाचारामध्ये गुंतलेला आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांचे जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा लोकांना जे प्रश्न विचारले त्याला खूप मजेशीर उत्तरे ऐकायला मिळाली. तुमच्याकडे मोबाईल आहे का ?गाडी आहे का? तुमचे स्वतःचे घर आहे का? घरात कोण कोणत्या सुविधा आहेत ?जसे फ्रीज, टीव्ही, गॅस अशा वेळी लोकांनी आमच्याकडे या सुविधा नाहीत असे टाका म्हणजे शासनाकडून येणाऱ्या सुविधा आम्हाला मिळतील असे सर्वेक्षण करणाऱ्याला सुचवले ,म्हणजेच आपले उत्पन्न लपवणे हादेखील भ्रष्‍टाचार आहे.अनेक अनेक श्रीमंत लोकांची नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत सापडली आहेत ही शोकांतिका आहे.

सोने खरेदी करताना किती लोक पक्या पावती ची मागणी करतात?

पक्या पावती मुळे टॅक्स भरला जातो हे कुणाच्या लक्षात येत नाही परंतु टॅक्स वाचवण्यासाठी दुकानदार आणि ग्राहक मात्र पक्की पावती करत नाहीत. आपण अनेक वस्तू दुकानातून खरेदी करतो प्रत्येक वेळी आपण बिलाची मागणी का करत नाही? प्रत्येक वेळी बिलाची मागणी केल्यामुळे आपल्याकडं टॅक्स आपोआपच भरला जातो आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो हे आपल्या कधी लक्षात येणार?

लग्नसमारंभात आपल्याला अनेक भेटवस्तू येतात मग आपण आपल्या मालमत्तेचे विवरण देताना आपल्याला आलेल्या प्रत्येक भेटवस्तू चे विवरण त्यात देतो का? हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे हे माहीत असूनही लोक हुंडा हा शब्द न वापरता भेट वस्तू आहेर हा शब्द वापरतात .टॅक्स चुकवण्याचा हा एक मार्ग म्हणजेच भ्रष्टाचार आहे. सरकारी कार्यालयात आपल्या कामाची फाईल लवकर निकालात निघावी म्हणून देखील आपण लाच देतो मग भ्रष्टाचाराची सुरुवात ही सामान्य माणूसच करतो. लाच मागणाऱ्यापेक्षा देणारा देखील दोषी आहे.

भ्रष्टाचार होण्यामागे कारणे शोधण्यास पहिले कारण म्हणजे 'अशिक्षितपणा 'होय लाच देणे हा गुन्हा आहे हे काही लोकांना समजत नाही .आपले काम लवकर व्हावे हा लोभ त्यांच्या मनात असतो भ्रष्टाचाराचे दुसरे कारण म्हणजे परंपरा होय, भ्रष्ट परंपरा होय कारण माझ्या आधीही लोक लाच घेत होते मग मी का घ्यायची नाही? ही मानसिकता भ्रष्टाचाराला खतपाणी घालते.  भ्रष्टाचाराचे महत्त्वाचे कारण म्हणजे हातातून सत्ता जाण्याची भीती .सत्तेचा वापर करून हवी ती कामे करून घेतली जातात अशी कामे नियमबाह्य असतात.

भ्रष्टाचार थांबविण्यासाठी भारतामध्ये भ्रष्टाचार निवारण कायदा 2018साली करण्यात आला त्यापूर्वीही आरटीआय (राइट टू इन्फॉर्मेशन) 2005 म्हणजे माहितीचा अधिकार कायदा देखील अस्तित्वात आलेला आहे. जितके अधिक कायदे तितकी अधिक कायद्याची पायमल्ली होताना आढळत आहे. मग कायदे असूनही भ्रष्टाचाराला निर्बंध का होत नाही? लाच मागणारा व देणारा दोन्ही गुन्हेगार आहेत मग लाच कोणी मागितली असता त्याविरुद्ध किती केसेस दाखल होतात?

IEC ( इंडिया अगेन्स्ट करप्शन) च्या सदस्य किरण बेदी म्हणतात, "सीबीआय "या संस्थेला सरकारी हस्तक्षेपापासून दूर ठेवा म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालता येईल. सीबीआयला दडपण विरहित चौकशी व निर्णय घेता येतील.

लोकपाल विधेयक संसदेत मंजूर झाले आहे परंतु या लोकपालच्या अंमलबजावणीसाठी किती सामान्य नागरिक पुढे येतात? दुधात पाणी भेसळ करून दूध वाला दूध विकतो पण आपण ते विकत घेतो यात आपलाही काही दोष नाही का? की फक्त पाणी भेसळ करणारा दोषी आहे. आपण त्याचे दूध घेण्याचे बंद केले तर तो ते दूध डेअरीला घालतो परंतु डेअरीमध्ये त्याला आपण देतो त्यापेक्षा कमी भाव मिळतो त्याचे नुकसान होते, आपले नाही तरीही हे सर्व माहीत असून आपण पाणी भेसळ असलेले दूध विकत घेतच राहतो व भ्रष्टाचारी असलेल्या दूध वाल्याला त्याने काहीच फरक पडत नाही .यात ग्राहक म्हणून आपण देखील भ्रष्टाचारी आहोत कारण भ्रष्टाचार सहन करणे म्हणजे देखील भ्रष्टाचार होय हे कधी कळणार आपल्याला?

भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचे म्हणणे होते "युवकांचे कर्तव्य म्हणजे भ्रष्टाचाराला विरोध करणे होय".

भ्रष्टाचाराविरुद्ध कायदे कितीही बनत राहतील

परंतु; त्याची अंमलबजावणी करणे तुमच्या आमच्या हातात आहे आपण कायद्याचे पालन मनापासून केल्याशिवाय भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही.

सविता साळुंके, श्रीरामपूर,

9604231747

[01/06, 3:29 PM] Bharti Sawant: भ्रष्टाचार: माझी भूमिका 

            अरेरे!!.....किती हे घोटाळे!.. जिथे पहावे, ऐकावे तेथे घोटाळेच घोटाळे. बॅंकघोटाळा,शेअर्स घोटाळा, संरक्षण घोटाळा, आदर्श घोटाळा.... सगळेच घोटाळे ! सारा देशच घोटाळ्याने बरबटला आहे. यातून जनावरांचा चाराही सुटला नाही. या घोटाळ्यांनी किडलेला भारत देश सर्वकाही मूकपणे सहन करतो आहे. हा समाजाला लागलेला दुर्धर रोग आहे.अर्थातच हा रोग नवीन नाही. प्रशासन निर्मितीपासूनच त्याचा उद्भव झाला नि आता त्याची पाळेमुळे सर्वत्र फैलावली आहेत. जिथे सत्ता आहे तिथे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते. निवडणुकांपूर्वी प्रत्येकजण विकासाची आश्वासने देऊन सत्ता मिळवतो.एकदा सत्ता हातात आल्यानंतर विकास योजना कचरापेटीतच जातात.उदय होतो फक्त भ्रष्टाचाराचा. आपल्या सात पिढ्या बसुन खातील एवढी संपत्ती मिळवण्याची जणूकाही स्पर्धा सुरू होते.आपमतलबी वृत्ती वाढीस लागून स्वतःच्या सुखसोयी पाहिल्या जातात.

         प्रत्येकजण स्वार्थी होऊन आपलीच तुंबडी कशी भरेल ते बघत असतो. या रोगाला वेळीच आळा घालायला हवा नाहीतर तो वाळवीसारखा  सर्व काही खाऊन टाकेल. भागवतात कलियुगाचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्याचा प्रत्यय आज आपणास येत आहे. "ज्या युगात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार मानला जातो ते युग म्हणजे कलियुग". सत्ययुगात सत्याला, सामाजिक नीति- मूल्यांना किंमत होती.भ्रष्ट माणसाला जबर शिक्षा होत. 'नियमबाह्य वर्तन करणे म्हणजेच भ्रष्टाचार होय'. लाच घेणे, असत्य वर्तन, असत्य भाषण, तस्करी, चोरी, स्वार्थासाठी अमानवी आचरण, अफरातफर संपत्ती मिळवण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब ही सारी भ्रष्टाचाराची रुपे आहेत. भ्रष्टाचार रुपी रावणाचे दहन वेळेतच करावे.

     औद्योगिक क्रांतीमुळे सर्वच गोष्टीत परिवर्तन घडून आले. उपयोगापेक्षा उपभोगाकडे माणूस जास्त खेचला गेला. कमी कष्टात जास्त पैसा हातात खेळू लागला. त्यामुळे पैशाची हाव वाढतच गेली.सर्व नीतिमूल्यांची पायमल्ली झाली. भ्रष्टाचाराच्या तावडीतून एकही क्षेत्र सुटलेले नाही. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत तसेच सामान्य माणूस, राजकारणी, कलाकाराची कर्तव्य,राष्ट्रहित विसरून भ्रष्टाचाराच्या चढाओढीत गुरफटले गेले. जीवनाच्या गरजा वाढत गेल्या. त्यामुळे  पोटापुरतेच मिळवायचे आणि समाजहित जपायचे ही भावनाच नष्ट झाली. त्यामुळे समाजसेवा करणारा मूर्ख, बावळट ठरला. "जसा राजा तशी प्रजा" राज्य चालवणारे भ्रष्ट असल्यावर जनता काय वेगळी असणार ?केवळ थोर पुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करून देश सुधारणार नाही.

              भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बाहेर काढून सन्मार्ग दाखवणारा एखादा वाटाड्या हवा, आपली भूमी आहे राम,कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारख्या शूर योद्ध्यांची. ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांनी उपदेशपर केलेल्या अभंगातील आचरणाची व सावरकर, भगतसिंग आणि विनोबाजींसारख्या थोर देशभक्तांच्या बलिदानाची. अशा या महाराष्ट्राच्या भूमीत भ्रष्टाचार बोकाळला आहे.भ्रष्टाचार रोखण्याची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी.भोगवादी, चंगळवादी वृत्ती न बाळगता कष्टाने अभ्यासाला प्राधान्य द्यायला हवे. लोकांमधील अज्ञान नष्ट करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. भ्रष्ट आणि अकार्यक्षम राज्यकर्त्यांना खुर्चीवरून खाली खेळायला हवे. सामान्य जनतेचे नैतिक पतन न  होऊ देता ,ग्रामस्वराज्य व्यवस्था बळकट करायला हवी. जनशक्ती एकत्र येऊन राज्यसत्ता ही सामान्य माणसांच्या हाती सोपवावी. तेव्हाच भ्रष्टाचाराची ही कीड मरून जाईल आणि देश सुखी, संपन्न, समृद्ध बनेल.

सौ.भारती सावंत

मुंबई

[01/06, 3:33 PM] Jeevansing khasawat: जीवन खासावत

      भंडारा 9545246027

.       .भ्रष्टाचार..

       आपण खातो

        शुध्द आहार,!

  

       शरीर आपले

        पाचवतो सारा सार!

       मग काय गरज आहे ?

           भ्रष्टाचार! 

         भराष्टाचार ही  एक समाजाला लागलेली कीड आहे.भ्रष्टाचारामुळे गरीब ,गरीब होत आहे.आणि श्रीमंत ,श्रीमंत

होत आहे.पिकावर जसे तोळधाडीचे सावट पडले आहे.त्या प्रमाणे समाजात शासन दरबारी प्रत्येक ठिकाणी दलालांचे सावट पडले आहे.  भ्रष्टाचार करण्यासाठी शासन दरबारातील कर्मचारी कोणत्याही स्तरावर पोहचतो.प्रत्येक कार्यालयात सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपले दलाल ठेवलेले असतात.सर्व समण्यावकंची कामे ही दलाल आणि कार्यालयातील लोक होऊच देत नाहीत.काहींना काही त्रुटी काढत असतात आणि कार्यालयाच्या चक्रा मारायला लावतात.सर्व सामान्य व्यक्ती शेवटी थकतो आणि पर्याय नसतो.शेवटी काहींना काही तरी चिरीमिरी केल्याशिवाय पर्याय उरत नाही.आपण कितीही इमानदार असलो तरी समोरचा व्यक्ती इमानदार राहू देत नाही. 

आणि हे काम प्रत्येक कार्यालयात चालते .छोटे मोठे गोरख धंदे सतत चालू असतात. सर्व सामान्य व्यक्ती जेंव्हा लाच देतो तेंव्हा तो स्वतःच्या खिशातून ,आपल्या मिलकतीतून,लहान मुलाबाळांच्या तोंडातून काढून देतो तेंव्हा त्याच समोरच नियोजन पूर्ण बिघडत जाते आणि शेवटी कर्ज बाजरी होतो. पण जेंव्हा एखादा दलाल ,किंवा श्रीमंत व्यक्ती जेंव्हा लाच देतो तेंव्हा तो लोकांकडून काढून देतो.स्वतःच्या खिशाला झळ लागू देत नाहीत.

       एक सत्य घटना आहे.अंखो देखा हाल आहे.मी माझ्या मित्रा सोबत एकदा जातपडताळणी प्रकरणासाठी  गेलो होतो .त्या ठिकाणी जात पडताळणी विभागात खुप मोठं भ्रष्टाचार चालायचं माझ्या मित्राला त्यांनी बऱ्याच चक्रा मारायला लावल्या .तो अतिशय कष्टी झाला.खूप दुखी झाला कारण त्याच्या गावापासून लातूर म्हणजे 

आठ तास जाणे आणि आठ तास येणे असा लांब चा पल्ला होता.

येवढ्या लांब जाण्या येण्या साठी त्याच्या कडे पैसे पण मिळत नव्हते .कर्यालातील लोक खूप त्रास द्यायची .तिथेच एका नवीन लीपिकाची निवड झाली होती. जेंव्हा त्यांची निवड झाली तेंव्हा ते एकदम सडपातळ होते.आणि त्या कार्यालयाचे सर्व अधिकारी भृष्याचारी असल्यामुळे .ते लीपिकही भ्रष्टाचारी बनले.प्रकरण दोन वर्ष पेंडींग पडले .आणि आता प्रकरण पी.आय.कडे सोपवले.पी. आय. ने लाचेची रक्कम मोठी मागितली.आता त्याच्याकडे शिल्लक काहीच उरले नव्हते.दोन वर्ष कार्यालयाच्या चक्रा मारून आर्थिक परिस्थिती आणि मानसिक स्थिती अतिशय वाईट झाली होती.आणि त्याने एकदम टोकाचा निर्णय आत्म्म हत्या करण्याचा निर्णय घेतला.त्याने मला तिथूनच फोन केला .मी आता काही जगू शकत नाही ,हा वाक्य त्याच्या तोंडातून निघाला आणि त्याला मी वेगळ्या मार्गाने समजूत घातली .आणि त्याला धीर दिले .त्या क्षणा क्षणात ल्या गोष्टी आजही आठवतात काळीज फासणाऱ्या थरारक गोष्टी आहे.त्याला घरी बोलावून पुन्हा परत घेऊन देण्याच्या अटीवर त्यांची पाच एकर जमिन विक्रीला  काढली आणि त्या समाज कल्याण अधिकारी आणि पी.आय .या दोघांची भरती करून दिली रक्कम मोठी होती त्यामुळे ते स्वतः हातात घेत नव्हते.त्यांनी ती रक्कम एका पेंट च्या दुकानात ठेवायला सांगितले.आम्ही दौऱ्यावर आहोत.असे सांगत राहिले .मलाही तेवढी मोठी रक्कम पेंट च्या दुकानावर ठेवायला भीती वाटत होती.शेवटी मला जोखीम पत्करावी लागली आणि मी ती रक्कम ठेवली.आणि तेवढ्यात दोन्ही साहेबांचे फोन स्विच ऑफ झाले आणि अजुन जास्त धडकी वाढली .आता काय करावे सुचत नव्हते.असे काम कधी केले नव्हते.पैसा मेहनतीचा होता.आणि देणगी दान दिल्या सारखे द्यावं लागलं.मन खूप दुखत होत काय करावं समजत नव्हत .मी मनातून त्यांना खूप खालच्या स्तरावर जाऊन शाप देत होतो.  

      शेवटी न व्हायचेच झाले .त्या पी.आई.कडे आणि समाजकल्याण अधिकाऱ्याकडे अतोनात आर्थिक संपत्ती आहे. आणि तिसऱ्याच दिवशी फोन आला की पी.आय.साहेबांचा एकुलता एक मुलगा मोटर सायकल अपघातात जागीच ठार झालाय,ही माहिती सर्वीकडे पसरली आणि वाईट वाटले.आता त्यांची करोडोंची प्रॉपर्टी खाणारे कुणीच नव्हते.आता म्हातारं वयात गेल्यावर काय ते घरातल्या  भिंती सोबत बोलतील काय?आई च हदय आपल्या पुत्र सुखासाठी  काय बोलत असेल .अशी विविध विचार माझ्या मनात घोळत होते.असे सतत आठ दिवस विचार करत होतो.पुन्हा समाज कल्याण अधिकाऱ्याचे घरीच पाय घसरुन पडल्याची बातमी आली .पायात रॉड टाकली पाय गुढग्या पासून खूळ खुळे झाले असे माहीत पडले.त्यांच्यावर ही वेळ माझे पैसे खाल्ले म्हणून नाही तर आमच्या सारख्या अनेक लोकांची मने दुखावली त्यामुळे ही वेळ आली .मुलाची पाच एकर जमीन गेली तरीही तो आता सुखी आहे .मनाचा येवढं मोठा शाप बसतो.आणि ह्या कलंक मध्ये ८०/ जनता गुंतली आहे.त्या मुळे समाजाचा विकास खुंटला आहे.राजीव गांधीच एक वाक्य अगदी बरोबर आहे. ,"शासनाकडून एक रुपया विकास कामासाठी निघाला असला तरी तो झिरपत जाऊन समजा पर्यंत जाऊन २०पैसे उरतो.त्या मुळे कोणत्याच गोष्टीचं विकास होत नाही काही लोक वाघासारखी तोंड वासुनच शासनाच्या रक्कम साठी बसलेली असतात. कोणाचाही विचार न करता गिळंकृत करतात .या मागे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.म्हणून प्रसार मध्यम ,समाज जागृती,ह्या सगळ्या माध्यमातून विविध उपाय योजना करून ही कीड बाजूला काढल्यास समाजाचा.,देशातील प्रत्येक घटकाचा खंबीरपणे नक्कीच विकास होईल.

सर्व मिळून अंगिकारू एकच ध्यास!!

भृष्याचाराचा करू मुळापासून सत्यानास!!

तेंव्हाच होईल भारत देशाचा खरा विकास!!

तेंव्हाच घेईल सर्व सामान्य जनता आनंदाचा श्वास.!!

           जय हिंद ,! जय भारत!

[01/06, 4:11 PM] शुभदा दीक्षित:  ( 11 )      भ्रष्टाचार : एक भस्मासुर

         आज भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला राजमान्यता मिळाल्यासारखे झाले आहे. अगदी तीस-चाळीस वर्षांपूर्वी कोणाच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडली तर त्या लोकांना मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे. बाहेर तोंड दाखवायला लाज वाटायची. पण आज सगळेच बदलले आहे. आज इन्कम टॅक्सी धाड पडली तर त्या गोष्टीचा चक्क अभिमान वाटतो! अशी आपल्या नैतिक मूल्यांची पायरी घसरली आहे.

           संविधानिक सर्व नियम धाब्यावर बसवत, अवैध मार्गाने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पैसे मिळवणे, म्हणजे भ्रष्टाचार.

          भ्रष्टाचाराचे मुख्य कारण आपल्या कायद्यातील पळवाटा. पैसे देऊन बरेच भ्रष्टाचारी कायद्याच्या कचाट्यातून मानाने सुटतात. अपराध्यांना शिक्षेचे भय राहिलेले नाही .कुठल्याही न्यायालयातील केसचा निकाल लागण्यास खूप होणारा विलंब, ह्यामुळे भीती राहिली नाही.

           भ्रष्टाचाराची खालपासून वरपर्यंत सर्व लोकांना सवय लागल्यासारखी झाले आहे. सरकारी ऑफिसात पैसे चारल्याशिवाय आपले काम झाले, तर ती दुसऱ्याला सांगण्यासारखी 'बातमी' असते. यात सगळे काही आले. एखाद्या साहेबा पर्यंत पोहोचण्यासाठी बाहेरचा रखवालदार हि पैसे घेतल्याशिवाय सोडत नाही. इतका आपला समाज खालपासून पोखरला गेला आहे.

           व्यक्तीने दृढनिश्चय केला तर त्याला काही अशक्य नसते. पण भ्रष्टाचार करण्याची इच्छा असेल तर काहीच होऊ शकत नाही. कारण या व्यक्तीच्या मनात कायम असंतुष्टता, असंतोष असतो. पैशाच्या मागे माणूस लागलेला असतो. म्हणूनच नाटककार वसंत कानेटकर भ्रष्टाचाराला 'मनाचा महारोग' म्हणतात.

         असमानता, आर्थिक असो -सामाजिक असो, पद- प्रतिष्ठे मध्ये असो, माणूस स्वतः स्वतःला भ्रष्ट करतो. चंगळवादाच्या हव्यासापोटी हा भ्रष्टाचार केला जातो.

           भेसळीच्या अन्नाने, मद्याने, औषधाने अनेक लोकांचे प्राण घेतले आहेत. माणूस माणसाच्या जीवावर  उठलाय असे म्हणण्याइतका भ्रष्टाचार निर्ढावला आहे.

            अगदी क्षुल्लक गोष्ट, वजनात तराजू मारणे, प्रमोशनसाठी वरिष्ठांना पार्टी देणे, पैसे देणे, इथपासून ते आपल्या राष्ट्राची गुपिते परराष्ट्रांना कळवणे, राष्ट्र संरक्षक हत्यारे खरेदीत घोटाळा करणे, इथपर्यंत माणूस खालच्या पातळीवर उतरला आहे. नीतीचा अंकुश हरवला आहे. Easy money सगळ्यांना हवा आहे. 

         क्रिकेटमधील मॅच फिक्सिंगमुळे सारे जग हादरले. लोकं तहान-भूक विसरून, महत्त्वाची कामे बाजूला ठेवून, नको इतके खेळाडूंवर प्रेम करत, त्यांचा खेळ पाहण्यासाठी आटापिटा करतात. हेच आपले खेळाडू पैशासाठी विकले जातात हे पाहून लोकांना कमालीचा धक्का बसला.

          बोगस प्रतिष्ठाना द्वारा पैसा जमवला जातो. तो जातो कुठे? हा भ्रष्टाचार म्हणजे कुंपणाने शेत खाण्या सारखे आहे..

          'कागदावर वजन ठेवणे' हे अगदी परवलीचे वाक्य झाले आहे. डॉक्टरकीचा हा 'नोबल' व्यवसाय असे म्हटले जायचे. पण आज काही डॉक्टर फसवून पेशंटची किडनी काढून विकतात. खोटा पॅथॉलॉजी रिपोर्ट दाखवून खोटी  अबोर्शन्स करतात. 'रोज इतकी ऑपरेशन्स झालीच पाहिजेत' असा 'अलिखित' नियम काही हॉस्पिटलचा असतो.

           भ्रष्टाचार आणि राजकारण या दोन्ही ला आपण वेगळे करूच शकत नाही. ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालत आहेत. याला पुरावेही आहेत. चारा घोटाळा, मुद्रांक घोटाळा, मिग विमाने घोटाळा, टूजी घोटाळा, बोफोर्स घोटाळा, कोल घोटाळा इत्यादी. असा हा राजकारणातला भ्रष्टाचाराचा भस्मासुर.

           यासाठी आपल्याकडे न्यायसंस्था, कायदेकानून कडक हवे. दाव्यांचे निकाल लवकर लागून,  शिक्षा लगेच व्हायला हवी.

       मी देशाचा नागरिक आहे. भ्रष्टाचार न करण्याची नैतिकता माझी आहे. असे प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजे.

        भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याकडे लोकायुक्त आहेत. देशपातळीवर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर आहेत. लेखा तपासणी करणारी सर्वोच्च यंत्रणा आहे, कॅग आहे. सर्वोच्च न्यायालय आणि खुद्द विधिमंडळे यांचे अधिकार क्षेत्र खूप मोठे आहे. आणखीही बऱ्याच शासनाच्या कायदेशीर यंत्रणा कार्यान्वित आहेत- अँटी करप्शन ब्युरो ते  सीबीआय- सगळे असूनही भ्रष्टाचाराचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतो का?

         भ्रष्टाचारामुळे आपल्या देशाच्या विकासाची गती मंदावते आहे. कारण ही समाजाला लागलेली कीड आहे. सभ्य समाज म्हणूनही आपला विकास जेमतेमच झाला आहे. घरात नातेवाईक, मित्रमंडळीत 'चांगला' सभ्य  म्हणून समजला जाणारा माणूस ऑफिसमध्ये त्याच्या खुर्चीत स्थानापन्न झाला की त्याची 'चांगली' भूमिका गळून पडते. तो प्रत्येक सहीचे ठरवून पैसे घेत असतो. ही अशी वैयक्तिक आणि सार्वजनिक सभ्यते मधील दरी असते. अशी दरी राजकीय व्यवहारांमध्ये असते, ती जास्त रुंद असते. भ्रष्टाचारामुळे गरीब व श्रीमंत यामधील दरी वाढते आहे. गरीब जास्त गरीब होतो आहे, श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहे.

         आज एखादा पैसे न खाणारा अधिकारी वरच्या  पदावर येऊन बसला,  तर त्याची बदली करण्यामागे सगळे हात धुवून लागतात. आणि त्याची अवस्था शटल् कॉक सारखी होते. ही आजची सत्यस्थिती. आज असे एकही क्षेत्र नाही, जेथे भ्रष्टाचाराचा भस्मासुर नाही.

          मालकाच्या बागेतील आंबा घेतला तर हात कलम करून घ्यायला निघालेले दादोजी कोंडदेव, यांचा आदर्श ठेवणे आज योग्य तरी ठरेल का?

          भ्रष्टाचारात पावणे दोनशे देशात आपला 94 वा नंबर लागतो. सबंध जगात भ्रष्टाचाराविरुद्ध जागरुकता निर्माण करण्यासाठी 9 डिसेंबर हा 'अंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस' म्हणून साजरा करतो. यासारखे दुर्दैव ते कोणते?

शुभदा दीक्षित ( 11 )

पुणे

[01/06, 4:38 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: (37)

*भ्रष्टाचार मुक्त देश घडवुया*

     आपला भारत देश दिवसेंदिवस विकसित राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे परंतु आपल्या समोर आजही अनेक अतिशय गंभीर समस्या आहेत. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी या सोबत च भ्रष्टाचार ही आपल्या देशासमोर असलेली गंभीर समस्या आहे. अगदी छोट्या छोट्या व्यक्ति पासून तत  मोठ-मोठ्या लोकांपर्यंत  अनेक लोक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत. आज भारतात कोणतेही छोटेमोठे काम करायचे झाले तर आपल्याला समोरच्याला थोडेफार चहापाणी चा खर्च द्यावाच  लागतो , कोणालाच त्यात काही वावगे वाटत नाही पण कळत नकळत आपणही भ्रष्टाचाराला बढावा देत असतो.

 या सगळ्यांना काही प्रमाणात आपण सगळेच जबाबदार आहोत. आपणच आपले काम लवकर व्हावे, आपला वेळ वाचावा म्हणून पुढच्या व्यक्ति ला भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहित करतो. काही कळत आणि किही नकळत रित्या हे कार्य करित आहोत.

भ्रष्टाचार हे एका जहाल विषा प्रमाणे आहे. समाजातील आणि देशातील वाईट हेतू ठेवणार्‍या लोकांच्या मनात हे मोठ्या प्रमाणात पसरलेले आपण बघत आहोत. 

    भ्रष्टाचाराची सुरवात झाली कशी व कुठून ह्याबद्दल कुणीही फारशी माहिती सांगू शकत नाही. पण हे खरेआहे की जसजसा माणसांकडे पैसा येऊ लागला तस तसा माणूस चैनीच्या व दिखाव्याच्या गोष्टींकडे आकर्षित होऊ लागला. पूर्वी जेव्हा माणसांकडे जास्त पैसा नव्हता तेव्हा त्यांच्या साठी दैनंदिन गरजेच्या वस्तू महत्वाच्या होत्या. त्यांची अपेक्षा फक्त दोन वेळेचे पुरेसे जेवण आणि जीवनावश्यक वस्तू मिळविणे एवढेच होते.पैशाचा हव्यास नव्हता किंवा चैनीची सवय लागलेली नव्हती त्यामुळे पूर्वीचे बहुतेक लोक मेहनती आणि निर्मळ मनाचे होते. जसजशी सुधारणा होत गेली तश्या अनेक चैनीच्या वस्तू उपलब्ध होऊ लागल्या. गरज नसतानाही त्या हव्याहव्याश्या वाटू लागल्या. एखाद्या कडे ती वस्तू आहे तर माझ्या कडे पण पाहिजे ही हेवा किंवा स्पर्धेची भावना वाढीस लागली. माणसांना लोभ वाटू लागला. जास्त मेहनत न करता अधिकाधिक संपन्न जीवन जगण्याची हाव वाढू लागली. भ्रष्टाचाराचे मुळचा अति लोभ करणे हे आहे. 

     आपल्या पदाचा, अधिकाराचा गैरफायदा घेऊन कमीतकमी मेहनत करून जास्तीत जास्त नफा करून घेणे हा भ्रष्टाचारा मागचा उद्देश्य असतो. पण सामान्य माणूस सुद्धा तेवढाच गुन्हेगार जेवढा लाच मागणारा माणूस गुन्हेगार आहे त्यापेक्षा जास्त गुन्हेगार लाच देणारा आहे. . सामान्य माणूस लाच देतो म्हणून समोरचा माणूस लाच घेतो. किती सहजपणे आपण नकळतच गुन्हा करत असतो आणि आपल्या ला त्या गुन्ह्याची कल्पना नसते किंवा आपण त्या गोष्टी चा विचारच केलेला नसतो. कितीवेळा  आपण बघतो नाक्यावर पोलिसांनी पकडले कि सर्वजण पोलिसाच्या हातावर पन्नास – शंभर रुपये टेकवून पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करतात. पोलीस फक्त त्यांची ड्यूटी बजावतात पण त्यामागे आपली सुरक्षा हा मुख्य हेतु आहे हेच आपण समजून घ्यायला तयार नाही. उलट त्या पोलिसांनी पकडलं म्हणून त्यांना आपल्या ला सोडा म्हणून पाहिजे ते करायला तयार असतो यात चुक कुणाची? सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावावर लाखो रूपयांची फसवल्याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. शाळेत- कॉलेजात अॅडमिशन घेताना कोण-कोणाला पैसे चारले जातात. इतकेच नव्हे तर देवळाच्या रांगेमध्ये सुद्धा आपण 2000- 5000रुपये देऊन लवकर दर्शन घेतो. का? देवाच्या दर्शनासाठी इतर भक्त उन्हात ताटकळत असताना आपण मात्र पैशाच्या जोरावर पुढे जाऊन दर्शन घेतो. पटत असेल का हे देवाला? आपल्या मनाला तरी पटते का?या भ्रष्टाचाररुपी राक्षसाने देवदर्शनाला सुद्धा सोडलं नाही. मग आपण तर सर्व सामान्य मनुष्य आहोत. 

किती वेळा लोक दुसऱ्यांना पैसे देऊन नोकरी किंवा उच्च पद मिळवतात. निवडणुकांमध्ये मतदारांना पैसे वाटून मत खरेदी केली जातात. अशा लोकांना अधिकार प्राप्त होतात तेव्हा हे लोक अनेक पटींनी वाटलेले पैसे वसूल करतात.  निवडणूकीत झालेला खर्च मग ते आपल्या च नावावरील कामातून काढतात. आपली प्रत्येक काम करताना आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. का हे आपल्याला आधी कळत नाही कि जे लोक चांगली काम करून निवडून येण्याऐवजी मतदाराला पैसे चारून निवडून येतात ते लोक निस्वार्थपणे समाजाची सेवा करणार नाही. तेव्हा आपण डोळ्यावर लालसेपोटी पट्टी बांधून कोणालाही निवडून देतो आणि मग भारतातील सिस्टीमला नाव ठेवत बसतो. पण आपली चूक कबूल करत नाही हेच भ्रष्टाचाराचे मुळ आहे. 

 एखादा श्रीमंत वडील जे पैसे घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये मुलांचे अॅडमिशन करून देत असते. त्यामुळे चांगली बुद्धीमत्ता असलेली मुले पुढे येऊ शकत नाही याउलट कमकुवत बुद्धिमत्ता असलेली मुले पैशांच्या जोरावर डॉक्टरकी साठी प्रवेश मिळवतात. पुढे ही मुले पैशाच्या बळावर पेपर विकत घेऊन पास होतात किंवा अनेकदा नापास होत कसंतरी शिक्षण पुर्ण करतात.  तो ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथे सर्वत्र पैशाच्या जोरावर बनलेले डॉक्टर असतात. अशावेळी रोग्यांना काय होत असेल ते देवच जाणे. जेव्हा त्याच्या कुटुंबातील कुणी आजारी पडतो तेव्हा मात्र तो दुसर्‍या डाक्टरांकडे जायला सांगतो. आपल्याकडे एक म्हण आहे ' घरच्या डाक्टरांची औषध लागू पडत नाही.' आपणा सर्वाना समजायला पाहिजे कि भ्रष्टाचार करून प्रगती करण्यापेक्षा मेहनत करून प्रगती कधीही फायद्याचे आहे. थोडा त्रास झाला तरी चालेल पण पैसे देऊन आपण आपले काम करायला नको पाहिजे. कदाचित आपल्या सर्वाना हे पटत असते, पण पटत असूनही आपण कळत नकळत भ्रष्टाचार करत जातो आणि जेव्हा दुसरे आपल्या पेक्षा जास्त पैसे देवून आपल्या पुढे जातात तेव्हा मात्र आपण त्यांच्या नावाने ओरड करतो. कधी कधी तर असे होते कि आपण पैसे देऊन काम करवून घेतो आणि आपल्या ह्या वृत्तीमुळे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला सुद्धा सोप्या मार्गाने पैसे मिळवण्याची चटक लागते, मग तो माणूस एखाद्या गरिबाचे सहज काम करत नाही कारण त्यात त्याला नफा नसतो. किती त्रास होत असेल गरिबांना या भ्रष्टाचाराचा हा आपण विचारच करत नाही . माझे काम पटकन झालं पाहिजे, पाहिजे तर थोडे पैसे घ्या पण काम करा ही अनेकांची वृत्ती असते.

      आपण आपल्याला सुधारायला पाहिजे. हे सर्व तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ह्या देशातील प्रत्येक नागरिक आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही. थोडे कष्ट पडले तरी चालतील पण मी चुकीचे वर्तन करणार नाही अशी प्रवृत्ती जोपर्यंत भारतातील प्रत्येक माणसात येत नाही तोपर्यंत आपला भारत भ्रष्टाचार मुक्त होणार नाही. आपल्या भारताची प्रगती व्हावी अशी वाटत असेल तर आजपासून आपण सर्वांनी प्रतिज्ञा करु की, मला कितीही त्रास पडला, कामाला कितीही वेळ लागला तरी मी भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. तेव्हांच या भ्रष्टाचाररुपी राक्षसाच्या विळख्यातून आपली, आपल्या देशातील नागरिकांची सुटका होईल.

   चला तर आपण आपल्यापासून सुरुवात करुया. आजपासून मी भ्रष्टाचाराला बढावा देणारे कोणतेही कार्य करणार नाही आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या कुणालाही हे कार्य करु देणार नाही. मी तयार आहे आपल्या समाजातील जनतेला भ्रष्टाचाराच्या राक्षसापासून वाचवण्यासाठी. आता आपली पाळी आहे.

*सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे*

गोंदिया

9423414686

[01/06, 4:47 PM] सौ भारती तिडके: 39)*****भ्रष्टाचार :-एक भयानक राक्षस.*****

आज स्वतंत्र भारतात, खेड्यापाड्यात, गावोगावी, शहराशहरात, सरकारी कार्यालयात, दवाखान्यात, कंपन्यात सर्व ठिकाणी भ्रष्टाचाराने धुमाकूळ घातला आहे. सभोवताल पाहिले असता भ्रष्टाचारी देशाचे भयानक रूप आपल्याला दिसून येते. सर्व ठिकाणी गुन्हेगारी, गुंडागर्दी, लाचखोरी, चुकीची शिक्षा इत्यादी अनेक वाईट प्रवृत्तीचे वातावरण पसरलेले आहे. सरकारी, खाजगी कार्यालय कोणत्याही विभागाची असो, तेथे तर खालच्या चपराशी, बाबू पासून तर वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत फाईलवर वजन द्यावे लागते. पैसे नसेल तर काम पूर्ण होत नाही. आज मानव मानव राहिला नाही तर तो क्रूर राक्षस याप्रमाणे झाला आहे. सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार आपले घट्ट पाय रोवून बसत आहे. म्हणून भ्रष्टाचार एक भयानक राक्षस आहे.

                आपल्या विकास कार्याला अपेक्षित आणि भरीव फळे येत नाहीत, याची एक अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे सर्व स्तरावर बोकाळलेला भयानक राक्षस भ्रष्टाचार.! ज्याप्रमाणे covid-19 ची लागण देशात वाढत आहे त्याचप्रमाणे या भ्रष्टाचाराने देखील एकही क्षेत्र अस्पर्शित ठेवले नाही. जेव्हा समाजाच्या नीतीचा पगडा सैल होतो तेव्हा समाजात भ्रष्टाचार बोकाळतो. माणुसकी हरवते. त्यामुळे सामाजिक जीवन विस्कळीत बनले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे समाजातील भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराची रूपे अनेक आहेत, आणि जीवनाच्या सर्व अंगात की वाळवी सारखी पसरलेली आहे.

या भ्रष्टाचाराची आवडते ठिकाण म्हणजे शासकीय व्यवहार. तिथे सत्ता असते, अधिकार असतो. भ्रष्टाचाराची कीड समाजांचे मुळानाच लागलेली आहे.बदली किंवा बढती पाहिजे असेल तर ती जबाबदारी भ्रष्टाचाराकडे सोपवीणे फार सोयीचे होते.

वशिलेबाजी हे भ्रष्टाचाराचे आणखी एक रूप. ओळखीचा किंवा आप्तसंबंध याचा फायदा घेऊन काम साधने हे वशिलेबाजी चे काम. विशेषतः नोकरी मिळविण्याच्या क्षेत्रात वशिलेबाजी ची कर्तबगारी फार प्रसिद्ध आहे. काळाबाजार हे भ्रष्टाचाराची आणखी व्यापारी दर्शन. उपयुक्त व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा ही काळया बाजाराची जननी आणि अधिक किंमत देऊन वस्तू प्राप्त करणे हा आपला सोस असतो. उपयुक्त व दैनंदिन जीवनाच्या गरजेच्या वस्तूंचा तुटवडा काही अपरिहार्य कारणाने होतो. या परिस्थितीमुळे काळया बाजाराला बहार येतो आणि व्यापारांचा खिसा भरतो.

भेसळ आणि नक्कल हे काळ्याबाजाराचा चुलत किंवा मावस भाऊ, पण विशेष जवळचे सगेसोयरे. दुधामध्ये पाणी मिसळवीणे ही तर सर्वांच्या परिचयाची बाब झाली आहे. रोज नित्यनियमाने गवळी दुधात पाणी मिक्स करतो. फल्लीच्या तेलात पामोलिन तेलाची भेसळ केली जाते. त्यातच हळद मिरच्या पावडर मधील भेसळ समजत देखील नाही.

        अफरातफर हे भ्रष्टाचाराची आणखी एक वारसदार. खोटे दस्तऐवज हे त्याचे शस्त्र. हुंडा हा समाजाधिषठीत भ्रष्टाचाराचा एक लोकप्रिय नमुना आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी याचा उपयोग होतो. हा वैचारिक भ्रष्टाचाराचा आधुनिक अवतार. आणि अलीकडे या अवताराला फार भाव आलेला आहे. खुर्चीचे दर्शन व्हावे म्हणून नेता जनतेला लाच देतो. तर बालाजीचे दर्शन लवकर व्हावे म्हणून भक्त पुजाऱ्याला लाच देतो.

असे का घडते ?याचा विचार केला असता श्रम न करता सगळ्यांना झटपट श्रीमंत बनायचे असते. या श्रीमंतीत माणुसकी विकल्या गेली तरी परवा नाही किंवा आपल्या चारित्र्याचा विचार नाही. आजचा समाज अतिशय शुदद्र भावनेच्या आहारी गेलेला आहे. या भ्रष्टाचाराची बीज समाजामध्ये गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, शिक्षिता पासून अशिक्षिता पर्यंत, कलावंत, राजकारणी, डॉक्टर ,वकील इत्यादी प्रतिष्ठित व्यक्ती, धर्मरक्षक मंडळी या सर्वांच्या मनात भ्रष्टाचार विषयक विचारांचे थैमान सुरू आहे.

महात्मा गांधीची, नेहरू जींची, ज्योतिबा फुले यांची, लोकमान्य टिळकांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा काळाच्या पडद्याआड गेली. निस्वार्थ देशभक्ती लोपली आणि उरला फक्त भ्रष्टाचाराचा तमाचा

 अंधकार! 

   ही भूमी संतांची आहे. राम कृष्ण या भूमीत जन्माला आले. ज्ञानेश्वर तुकाराम यांनी सत्य आचरणाचा मंत्र दिला. अनेक देशभक्त याच भूमीने जन्माला घातले. अशा या पावन मंगल सात्विक भूमीवर या भ्रष्टाचार नामक राक्षसाने उघड-उघड आकांत-तांडव करावे हेच समाजाला काळीमा फासणारी आहे. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. लाच घेणारा आणि देणारा ही तेवढाच दोषी असतो. भ्रष्टाचार ही गोष्ट मुळापासून नष्ट करायला हवी तर त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतः पासुनच करायला हवी. स्वतः पण भ्रष्ट आणि लाचखाऊ लोकांना समाजापुढे आणायला हवं. स्वतः प्रामाणिकपणे काम  करायला हवे. सरकारने भ्रष्ट अधिकारी सेच भ्रष्टाचाराला प्राध्यान्य देणार्‍यांवर कडक कारवाई करायला हवी. भ्रष्ट लोकांमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होते. देशात असुविधा आणि विषमता निर्माण होते.

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कामाला वाव दयायला हवा. आपण आपल्या कामात तसेच सरकारी कामात सुद्धा पारदर्शकता आणायला हवी. आपल्या भारत देशात अण्णा हजारे सारख्या व्यक्तीने भ्रष्टाचार विरोधी आंदोलन पुकारले होते.

भ्रष्टाचार हा क्रूर राक्षस आहे. योग्य नियंत्रण राबवून या भ्रष्टाचारी रुपी राक्षसाला वेळीच आटोक्यात आणणे आवश्यक आहे. यासाठीच हिंदीतील एक उक्ती मला आठवते.

       "गुरु जनो की मेहनत न जाने देंगे बेकार, सच्चाई से अपने करेंगे जीवन जीवन गुलजार."

सौ. भारती दिनेश तिडके

 रामनगर गोंदिया

8007664039.

[01/06, 5:00 PM] सुंदरसिंग साबळे: *34*

*भ्रष्टाचार एक परीक्षण*

===============

"भ्रष्टाचाराच्या असुराने

मांडला कल्लोळ 

मानव जीवनाची 

झाली बिकट गुंतावल

भ्रष्टाचाराने घातला 

सर्वत्र धुमाकूळ 

गोरगरीब करिता 

पोटासाठी हळहळ"

      भारत देश भ्रष्टाचाराने भरकटलेला आहे. देशातले पुढारी सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रचंड भ्रष्टाचार करत आहेत. हा भ्रष्टाचार असाच जारी राहिला तर एक दिवस सारा देश भ्रष्टाचारात बुडल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला देशातल्या भ्रष्टाचाराविषयी प्रश्‍न विचारला तर तो मोठ्या सात्वित संतापाने वरील शब्दात एक भाषण देतो. परंतु देशातला हा भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी तो एक पाऊलसुध्दा पुढे टाकायला तया नसतो. अर्थात भ्रष्टाचाराचा खात्मा करणे हे काही अशा मध्यमवर्गीय माणसाचे काम नव्हे. ते करणारे अण्णा हजारे सारखे खरोखरच धाडसी लोक आवश्यक आहेत. मात्र या मध्यमवर्गीय माणसाने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढावेच असावे असे आपण म्हणू शकणार नाही. मात्र त्याने स्वतः भ्रष्टाचार करू नये, शासन दरबारातील एखादे काम उशिरा झाले तरी चालेल पण आपण कोणाला लाच देणार नाही आणि संधी आली तर लाच खाणारही नाही अशी प्रतिज्ञा त्याने करावी. त्यांनी एवढी गोष्ट केली तरी देशातला भ्रष्टाचार बराच कमी होऊ शकतो. परंतु आपण लोक भाषण देण्यापलीकडे काहीच करत नाही.

     भाषणसुध्दा जाहीरपणे देत नाही तर आपल्या मित्रांसमोर आणि बायका मुलांसमोर देतो आणि प्रत्यक्षात आपण स्वतःसुध्दा भ्रष्टाचारात लिप्त असतो हे तो मान्य करत नाही. नुकतेच एका पोलीस अधिकार्‍याशी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्याशी बोलताना मी नेहमीप्रमाणे, पोलीस सध्या जास्त भ्रष्टाचार करत आहेत असा आरोप केला. तो आरोप ऐकल्यावर त्या पोलीस अधिकार्‍याला राग आला खरे परंतु त्याने आपला राग आवरला आणि भ्रष्टाचाराच्या संबंधात काही माहिती सांगून मलाच काही प्रश्‍न विचारले. पोलीस खात्यात भ्रष्टाचार असतो हे त्यांनी मान्य केले. मात्र पोलीस अधिकारी सतत गुन्हे करणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडूनच पैसे खात असतात असे त्यांनी म्हटले. पोलीस पैसा खात असले तरी देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा पोलिसांशी कधी संबंधही येत नाही आणि आपणही पोलिसांना पैसे दिले असे सांगणारे फार कमी लोक भेटतात. या अधिकार्‍याने विचारलेला एक प्रश्‍न फार भेदक होता. त्याने आमच्यासमोर बसलेल्या सर्वांनाच एक प्रश्‍न विचारला, ‘तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश देताना देणगी दिलेली आहे का?’ प्रत्येकांनी सांगितले की आम्ही देणगी दिलेली आहे. परंतु मुलांच्या शाळा प्रवेशासाठी देणगी देणे हा कायद्याने गुन्हा आहे हे बर्‍याच लोकांना माहीतसुध्दा नव्हते. परंतु या पोलीस अधिकार्‍याने याची जाणीव करून दिली आणि देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा शाळा प्रवेश हा देणगी देऊन, संबंधित कायदा मोडून झालेला असतो. हे कटूसत्य सांगितले.

    पोलीस भ्रष्टाचार करतात, सार्वजनिक बांधकाम खात्यात खूप भ्रष्टाचार असतो परंतु या भ्रष्टाचारामध्ये प्रत्येक व्यक्ती गुंतलेली नसते. परंतु शाळेत प्रवेश घेण्याच्यावेळी प्रत्येक जण भ्रष्टाचार करत असतो. त्याचा हा युक्तिवाद बिनतोड होता. त्या पुढे जाऊन त्याने आणखी एक गोष्ट सांगितली. लग्नात हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, एवढेच नव्हे तर सासर्‍याने जावयाला काही भेटवस्तू देणे यालासुध्दा कायद्याने काही बंधने घातलेली आहेत. त्याशिवाय सरकारी कर्मचार्‍यांवर, त्यांच्या घरच्या लग्न समारंभात किती खर्च झाला आणि त्यांना कोणी कोणी भेटवस्तू दिल्या याची माहिती सादर करण्याचेसुध्दा बंधन आहे. मात्र लग्न समारंभातले हे दोन कायदे सरसकट सर्व लोक मोडत असतात. त्याला अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सन्माननीय अपवाद असतात. मात्र लग्न समारंभात आपण कायद्याने ठरवून दिलेली अनेक बंधने मोडत असतो, भ्रष्टाचार करत असतो. मात्र आपण भ्रष्टाचार करत आहोत याची फार कमी लोकांना जाणीव असते आणि ज्यांना जाणीव असते त्यांना खंत नसते पण तरीही हे लोक भ्रष्टाचाराच्याबाबतीत लोकांवर आरोप करत असतात.

    "साधी राहणी उच्च विचार 

त्याचीच प्रगती घेईल वारंवार 

नको महागड्या वस्तूचा बाजार 

स्वार्थ साधाया नको भ्रष्टाचार"

===============

श्री.सुंदरसिंग आर.साबळे गोंदिया 

 मो.9545254856

[01/06, 5:36 PM] Milind Gaddamwar: (43) मानसिक रोग " भ्रष्ट्राचार "


            ' भ्रष्ट्राचार ' (भ्रष्ट +आचार )म्हणजे चुकीची वागणुक.मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.तो समाजात वावरतांना दुहेरी भुमिका घेत असतो.तोंडावर एक अन् मागे एक असे त्याचे वागणे असते.याला दुहेरी मुखवटा धारण करणारी माणसे असे फारतर म्हणता येईल.अशी माणसे बेभरवशाची असतात. आपल्या बोलण्यावर ती ठाम रहात नाहीत.दिलेला शब्द पाळत नाहीत.आपला स्वार्थ साधण्यासाठी ते कुठलेही टोक गाठू शकतात.सर्वसामान्य माणसाला ती पुरून उरतात.सरकारी नौकरीत अश्याच प्रवृतीच्या माणसांची गाठ पडत असल्याने आणि ती पण संघटीत असल्याने सामान्य नागरिक जेरीस आल्याशिवाय राहत नाही.असाच अनेकांचा अनुभव असतो. फारच कमी ठिकाणी लोकांना योग्य ते सहकार्य करणारी चांगली माणसं आढळून येतात.तेंव्हा आपला जीव भांड्यात पडतो.

            आपले मन हे अत्यंत चंचल आहे. क्षणार्धात ते सारे जग फिरून येत असते. आपल्या मनात नाही नाही ते विचार येत असतात.काही चांगले तर काही वाईट विचार असतात.चांगल्या विचारांचा ज्याला आपण सकारात्मक विचार असे म्हणू शकतो.याचा चांगला परिणाम होतो.तर वाईट व नकारात्मक विचारांचा वाईट परिणाम होतअसतो.भ्रष्टाचार हा प्रथम मनात निर्माण होतो.नंतर तो कृतीशील होतो. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे.कारण त्याला विशिष्ट प्रकारे हाताळले जाते.एखादा व्यक्ती काम घेऊन आला की त्याला अमुक अमुक व्यक्तिंना भेटा असे सांगितले जाते. भ्रष्टाचाराची सुरुवात ही कार्यालयात पहीले पाऊल टाकण्यापासून सुरू होते. डोअर किपर ते स्टोअर किपर आणि माती, सिमेंट,दगड-धोंडे खाण्यापासून नितीभ्रष्ट झालेल्या माणसात होते.या व्यक्तींना कशाचेच भान रहात नाही.ती एक नशा असते.लोकांना विविध प्रकारे त्रास देऊन आपण ज्या कामाचे वेतन घेतो तेच काम लवकर करून देण्याच्या बहाण्याने पुढील व्यक्तीला मानसिक व आर्थिक त्रास होईल असे वागणे-बोलणे ही भ्रष्टाचाराची पहिली पायरी असते.कमी पैशात होणारे काम जास्त पैसे घेऊन करून देणे हा भ्रष्टाचाराचाच भाग आहे.भष्टाचारास दोघेही जवाबदार असतात.देणारा आणि घेणारा.आपले काम इतरांपेक्षा लवकर व्हावे म्हणून आर्थिक लाभ पोहचविणे हे चुकिचेच ठरते आहे.भ्रष्टाचाराचे स्वरूप हे वेगवेगळ्या प्रकारचे असते.

           आपली निवडणूक प्रणाली ही भ्रष्टाचाराने बरबटली असल्याने आपल्याकडे आपले अमुल्य मत हे विक्री व खरेदी केल्या जाते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर पाहिला मिळत असते.म्हणून निवडणूक लढविणे हे सर्वसाधारण माणसांचे काम राहिलेले नाही असे सांगितले जाते आणि ते खरेही आहे.पैसा लगावो और पैसा निकालो या राजकीय वाटचालीने देशाचे न भरून निघणारे नुकसान होते आहे.याकडे आपले लक्ष जात असले तरीही ‌दुर्लक्ष केले जात असल्याने आपल्याला सुज्ञ नागरिक म्हणवून घेण्याचा अधिकार राहिलेला नाही.तो आपण केंव्हाच गमविलेला आहे.आमची लोकशाही किती चांगली यावर फक्त व्याख्यान देणे,चर्चा करणे एवढेच आपणांस ठावे आहे.संरक्षणात भ्रष्टाचार, आरोग्य योजनेत भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार,न्यायदानात भ्रष्टाचार, बांधकामात भ्रष्टाचार अशी लांबलचक यादी ही होवू शकते.याचे कारण आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचार हा समुळ खणून काढलेला नाही.कायद्यातील पळवाटा शोधून मार्ग काढणे सोपे जाते आहे.यामुळे फक्त भ्रष्टाचाराचे फक्त आरोप-प्रत्यारोप होतात.परंतु शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने कायद्याचा धाक राहिलेला नाही.आपल्या शिक्षण प्रणालीत दोष असून भ्रष्टाचाराबद्दल आपल्यात चीड,घृणा निर्माण होईल असे कुठलेही ज्ञान दिले जात नाही.देशप्रेम कशात पाहिले पाहिजे हे शिकविले जात नाही.जोपर्यंत तरूण पिढी च्या मनात भ्रष्टाचाराची आग लागणार नाही तोपर्यंत हे असेच चालणार आहे.यात तिळमात्र बदल अपेक्षित नाही.आज तर गुरूजन वर्गच स्वत: भ्रष्टाचाराचे समर्थन करतांना आढळून येतात.ज्यांच्यावर देशाची संपुर्ण धुरा ही अवलंबून आहे.भ्रष्टाचाराने सारे जग हे व्यापलेले आहे. नविन पिढीचे आणि देशाचे भवितव्य जर उज्वल करायचे असेल तर याची सुरुवात शिक्षणापासून झाली पाहिजे.कारण पक्की मडकी, नविन पिढी घडविण्याचे काम हे शिक्षकजणच करीत असतात.देशप्रेमाची ओळख ही शिक्षणातूनच झाली पाहिजे.मुल्यसंवर्धन करणे,जोपासणे, वृध्दिंगत करणे हे काम शिक्षण व्यवस्थेचे आहे.शिक्षक हा त्याचा आधारस्तंभ आहे. ज्याच्या मनात भ्रष्टाचारा विषयीची चीड आहे तो कधीच भ्रष्टाचारास प्रवृत्त होत नाही.बळी पडत नाही.दुस-याने केलेला भ्रष्टाचार खपवून घेत नाही.ही मानवी मनाची बांधनी आहे. शिक्षकवर्ग मुल्यशिक्षणात कमी पडत असल्याने आज संपुर्ण देश भ्रष्टाचारात डुबलेला आहे.याचे सोयरसुतक कुणालाही राहीलेले नाही.भ्रष्टाचाराच्या या आगीत आपणं सर्वजण व संपुर्ण देश हा होळपून निघत आहे.याचे सोयरसुतक कुणालाही राहिलेले नाही असे खेदाने म्हणावे लागते.

                        * मिलिंद गड्डमवार,राजुरा

                           भ्र.क्र.९५११२१५२००

[01/06, 5:39 PM] Sujata Jadhav: भ्रष्टाचार:एक समस्या (28)

          शासनाच्या किंवा समाजाच्या चाकोरी बाहेर जाऊन कृत्य करणे,म्हणजे भ्रष्टाचार होय.अति हव्यास,घाई,जलगतीने प्रगती करण्याच्या दृष्टीने अथवा कोणत्या तरी आमिषाला बळी पडल्यास,तो भ्रष्टाचार समजला जातो, बरीच तरुण विविध मार्गांनी पैसा कमवायला बघतात,आणि मग लाच घेऊन अथवा देवून भ्रष्ट होतात.

           अशा तरुणाईला वेळीच सावधान केले पाहिजे,त्यांना  मार्गदर्शन केले पाहिजे,सध्या नोकरी मिळणे कठीण झाले आहे,त्यातच सरकारी नोकरी म्हणजेच पर्वणी!! आणि ही नोकरी मिळवण्यासाठी काही वेळेस सर्वसामान्य ज्यांकडे पैसा नाही असे लोक या भ्रष्टाचाराचे शिकार बनतात,मोठं मोठ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेताना, डॉक्टर, इंजिनिअरिंग साठी देखील पैसा द्यावा लागतो, कधी या भ्रष्ट पैशाला नाव दिले जाते,आम्ही डोनेशन घेतो. आणि शेतकरी कुटुंब असेल तर बिचारे कुठून पैसा उभे करणार,शिक्षकी पेशात बरेच काही ठिकाणी अशा गोष्टी घडल्या,विद्यादानाचे काम शिक्षक करतात,त्यांना शिक्षणापासून ते नोकरीला लागतानाही काही रक्कम भरावी लागते,म्हणजे अनुदानाचा टप्पा पार करेपर्यंत पैसा भरूनही पगार चालू होतं नाही.

        आपला देश सर्वसामान्य लोकांचा आहे,गरिबी बरीच आहे,तिचे उच्चाटन करता-करता नवनवीन संकटे उभी रहातात, सर्वच क्षेत्रात अथवा सर्वच मंत्री भ्रष्ट असतात असे नाही,काही प्रमाणिकही असतात,मग अशा लोकांचे कधीना कधी भिंग फुटते,काही वेळेस नोकरीत तुम्ही टॉपर असलात किंवा तुम्ही लेखी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू जरी चांगला दिलात,तरी त्यावेळेस नोकरी मिळविताना भ्रष्टाचाराला पायामुळे फुटतात,आणि त्यात तरुण भरकटतो.

         तुम्ही सरकारी नोकरीत असाल,तर तुम्हांला भेटणारी मित्रमंडळी कौतुक करण्या ऐवजी तुम्हांला "या नोकरीसाठी किती पैसे भरले"असा प्रश्न करतात,भले तुम्ही तुमच्या टॅलेंटवर लागला असाल तरी,म्हणजेच बघा!!भ्रष्टाचार किती बळावला आहे,ही एक समाजाला लागलेली कीड आहे,एक समस्या आहे!!तिचे वेळीच उच्चाटन केले पाहिजे.


सुजाता जाधव

नवी मुंबई

[01/06, 5:44 PM] डॉ हरिश्चंद्र भोईर: भ्रष्टाचार हाच बनलाय शिष्टाचार


  डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06)

    शहापूर(ठाणे)


  आपला देश लोकशाहीप्रधान देश आहे.खरे तर इतका मोठा खंडप्राय देश जगात कोठेही नाही.निसर्गसृष्टीने नटलेला आपला देश...संपन्न असूनही विकसित नाही.याला अनेक कारणे जरी कारणीभूत असली तरी आपल्या देशात असणारा भ्रष्टाचार हे ही एक मोठं कारण आहे.हे विसरून चालणार नाही.भ्रष्टाचार रुपी कॅन्सर ने पोखरल्याने कोणती घटना केव्हा घडेल,आणि कोणता प्रसंग केव्हा येईल हे काही सांगता येत नाही.

 भ्रष्टाचार ही एक अशी सिस्टीम आहे.ज्यात देणारा आणि घेणारा अशा दोघानाही त्याचं काहीही सोयर सुतक वाटत नाही.काम लवकर झालं म्हणून देणारा खुश ,सर्व बिदागी मिळाली म्हणून काम करणारा खुश.पण या सिस्टीममध्ये सर्वात जास्त नुकसान होते ते सर्वसामान्य माणसांचे. या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार पडतात.कोणी याला बक्षिसी म्हणतो,कोणी वरकमाई  तर कोणी याला 'वजन'म्हणतंय.नाव कोणतेही असले तरी यातील होणारी आर्थिक स्वरूपाची उलाढाल मात्र नक्कीच वाईट आहे मध्यंतरी पुराच्या पावसात नुकताच केलेला नवीन पूल वाहून जातो आणि त्याच्या शेजारी असलेला ब्रिटिश कालीन अतिशय जुना पूल मात्र जसाच्या तसा उभा होता....अशी बातमी वाचायला मिळाली.याचं कारण होतं पुलाच्या कामात झालेला भ्रष्टाचार.

  या भ्रष्टाचाराच्या किडीमुळेच पाकिस्तान मधील अतिरेकी भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईसह देशाच्या राजधानीवर हल्ला करू शकले हे विसरून चालणार नाही.भ्रष्टाचार म्हणजे 'कुंपनाणेच शेत खाण्याचा प्रकार आहे.

  'जास्तीत जास्त श्रीमंत होण्याचा शॉर्ट कट' म्हणून भ्रष्टाचाराचा मार्ग आवलंबला जातो.पण यातून आपण आपल्या देशाचे किती नुकसान करतो याचे भान अशा भ्रष्टाचार करणाऱ्याला कळत नाही.स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या माय भूमी आणि देशाला संकटात ढकळणाऱ्या व्यक्ती आपल्याला आपल्या आजूबाजूलाच अनेक दिसतील.


  एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मते जगातील सुमारे पावणेदोनशे देशांमध्ये भ्रष्टाचारात भारताचा क्रम ९४वा आहे. त्याचबरोबर लोकायुक्त, एसीबी, केंद्रीय दक्षता आयुक्त यांच्या जोडीला न्यायालये ते माहितीचा अधिकार .. अशा भ्रष्टाचारविरोधी यंत्रणाही आपल्या देशात मोठय़ा संख्येने आहेत. मात्र यंत्रणा स्थापन करायच्या आणि त्यांच्या कारभारावर कोणतेही नियंत्रण न ठेवल्यानेच...'भ्रष्टाचारातून भ्रष्टाचार'अशी शृंखलाच बनत जाते.

  अगदी लहानातल्या लहान कामांसाठी अनेक हेलपाटे मारायला लावून ज्याची भ्रष्टाचाराला हातभार लावण्याची अजिबात  इच्छा नसलेल्या व्यक्तीही शेवटी वैतागून ह्या भ्रष्टाचारी व्यक्तींना लाच देऊन त्यात सामील होतात.

  खरं तर भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती इतकीच त्याला लाच देणारी व्यक्तीही  जबाबदार असते.हे जरी खरे असले तरी दिवसेंदिवस हेलपाटे मारून वेळ आणि पैसे गमावण्या पेक्षा हा 'चिरीमिरीचा'मार्ग लोकांना योग्य न वाटल्यास आश्चर्य वाटणार नाही.

  आज भ्रष्टाचाराने शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रालाही सोडलेले नाही.कमी गुण असूनही केवळ पैशांचा उपयोग करून आपल्या पाल्याना आवडत्या ठिकाणी प्रवेश देणारी अनेक धेंड आपल्याकडे अनेक दिसतील  तर केवळ पैसा नाही म्हणून खितपत पडलेली अनेक गुणवान देखील इथं दिसतील.हा उघड उघड भ्रष्टाचार उघड्या डोळयांनी बघण्याशिवाय सर्व सामान्य माणसाच्या हातात काहीही नाही अशी हताश मानसिकता ठेवण्यापेक्षा 'मी भ्रष्टाचार करणार नाही... आणि कोणाला करूनही देणार नाही'असे ठरवल्यास आपल्या देशातील 'भ्रष्टाचार'नक्कीच संपल्याशिवाय राहणार नाही.


    डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर

    शहापूर(ठाणे)

     9226435827

[01/06, 5:49 PM] वर्षा सागदेव: *भ्रष्टाचार*

     भ्रष्टाचार हा शब्द  भ्रष्ट आणि आचार ह्या दोन शब्दातून उत्पन्न झाला आहे.म्हणजे भ्रष्ट आचरण. सर्व सामान्यपणे भ्रष्टाचार पैशाशी जोडल्या गेला आहे.लाच घेणे व देणे, पैशाचा गैर व्यवहार करणे इत्यादी.पण भ्रष्टाचारचा खरा अर्थ आहे जेव्हा एखादी व्यक्ती न्याय व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन आपला स्वार्थ पुरा करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करते त्याला भ्रष्टाचार म्हटले जाते. थोडक्यात भ्रष्टाचारचा अर्थ अतिशय व्यापक आहे. सत्ता, अधिकार आणि स्थानाचा गैरवापर करणे  त्याचबरोबर वशिलेबाजी, काळा बाजार करणे, प्रमाणापेक्षा जास्त नफा कमावणे आदींचाही भ्रष्टाचारात समावेश होतो.

     ह्या व्यतिरिक्त सरकारी कर्मचारी आर्थिक व अन्य स्वरूपाचा फायदा करून घेण्याच्या पारंपरिक भ्रष्ट मार्गा व्यतिरिक्त इतर स्वरूपाचाही भ्रष्टाचार करतात. तो म्हणजे कमी दर्जाची सेवा देणे, खोटे भत्ते स्वीकारणे, खोट्या पावत्या सादर करणे, सरकारी यंत्रणेचा खासगी कारणांसाठी वापर करणे इत्यादी. थोडक्यात आधुनिक काळात भ्रष्टाचाराची व्याप्ती प्रचंड  वाढली आहे की जणू संपूर्ण जीवन आणि जनमानस भ्रष्टाचाराने व्याप्त आहे.

        भ्रष्टाचाराची सुरुवात ही कुठून आणि कशी झाली हे कोणालाही माहित नाही. पण याला मानव स्वत: जबाबदार आहे. हे खरे आहे . काही अंशी प्रशासकीय कार्यकालीन कामकाज पद्धती ही वेळकाढू, दीर्घ मुदतीची आणि गुंतागुंतीची असते. यामुळे लाच देऊन लवकर कामे करवून घेण्यात येतात. राज्य आणि प्रशासनाच्या कार्याची व्याप्ती आधुनिक काळात वाढलेली आहे. नागरिकांना त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनावर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांची अडवणूक करून अतिरिक्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न प्रशासकीय कर्मचारी करतात. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, हितसंबंधी यांच्यातील लागेबांध्यामुळे सर्व प्रशासकीय प्रक्रिया भ्रष्ट होतात.       

     वर उल्लेखलेल्या कारणां व्यतिरिक्त  मानवी स्वभाव आणि प्रवृत्ती हे भ्रष्टाचाराचे मूळ कारण आहे. स्वार्थीपणा, लोभ, लालसा या मानवी स्वभावातील सहज प्रवृत्ती आहेत. या वृत्तींना माणूस बळी पडतो आणि अतिलालसा बाळगतो, तेव्हा चांगल्या-वाईटाचा विचार न करता माणूस सहज भ्रष्ट बनतो.

  *पूर्वीच्या काळात जेव्हा मानवाकडे पैसा नव्हता तेव्हा त्याच्यासाठी दैनंदिन वस्तू याच महत्वाच्या होत्या. माणसाची अपेक्षा फक्त दोन वेळचे पुरेसे जेवण मिळविणे एवढेच होते. त्यामुळे पूर्वीची माणसे ही मेहनती आणि साफ मनाची होती*.  परंतु जसीजशी सुधारणा होत गेली तशी मानवाला गरज नसताना सुद्धा त्या वस्तू हव्याहव्याश्या वाटू लागल्या. माणसाच्या मनात लोभ निर्माण झाला. 

*माणूस हा जन्माने भ्रष्ट नसतो* पण त्याला आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती भ्रष्टाचारी बनवते. म्हणजेच इर्ष्या, हव्यास, दुर्बलता, लोभ, राक्षसी प्रवृत्ती इ भ्रष्टाचार करण्यास पार पडते

  भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे. देशामध्ये भ्रष्टाचारची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.भ्रष्टाचार हा देशाला किंवा समाजाला लागलेला एक मोठा कलंक आहे.जर  भ्रष्टाचार वाढतच राहिला तर  देशाच्या विकासाला अडथळा निर्माण होईल. आज भारत देश विकसित राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे.परंतु या देशासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. त्यात सर्वात गंभीर समस्या भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचारा मुळे देशाची अर्थ व्यवस्था डळमळते. त्यामुळे देशात असुविधा आणि विषमता निर्माण होते.


       आपल्या देशात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अनेक कायदे झाले  अनेकानेक समित्या झाल्या , नवीन कायदे झाले  पण भ्रष्टाचाराला आळा घालणे शक्य झाले नाही. ह्याचे कारण म्हणजे *परत भ्रष्टाचार*  भ्रष्टाचाराची समस्या दूर करण्यासाठी सर्व लोकांना प्रयत्न केले पाहिजेत. तसेच सरकारने सुद्धा भ्रष्टाचारी लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. ह्याने काही अंशी आणि काही प्रमाणात भ्रष्टाचार कमी होईल पण त्याचे निर्मूलन होणार नाही 

     

     जो पर्यंत माणसाच्या मनात लोभाची भावना असेल तो पर्यंत आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त होणार नाही.जो पर्यंत  चांगली प्रवृत्ती माणसात येत नाही,अगदी लहानपणा पासून प्रामाणिकताचे बाळकडू मिळत नाही.कितीही कष्ट पडले तरी चालतील पण त्याने सदैव सन्मार्गाचा अवलंब करावा,ही प्रवृत्ती माणसाच्या मनाचा ताबा घेत नाही, तो पर्यंत भ्रष्टाचार निर्मूलन एक स्वप्नच राहिल.

डाॅ.वर्षा सगदेव 

   


.

[01/06, 5:54 PM] Manik Nagave: 07 लेख


भ्रष्टाचार


 मानव त्याच्या आचरणाने लोकांच्या लक्षात राहत असतो. आचरणामध्ये सदाचार व भ्रष्टाचार असे प्रकार पडतात. सदाचार म्हणजे चांगले वागणे कुणालाही न दुखवणे, दुसऱ्याच्या चांगल्यासाठी प्रयत्न करणे. तर भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण. यामध्ये कोणत्याही प्रकारची नैतिकता नसते. यामध्ये दुसऱ्याला त्रास देण्याचे कृत्य केले जाते. दुसऱ्याला फसवणे.कोणतेही काम सरळ मार्गाने न करता आडमार्गाने म्हणजे लाच देऊन अशा प्रकारची कामे करणे म्हणजे भ्रष्ट आचरण होय.चोरी करणे, लबाडी करणे हे सर्व भ्रष्टाचारामध्येच येतात.


 परंतु जेव्हा आपण सदाचरणाने वागतो तेव्हा ते आपल्याला समाधान आनंद देत असते म्हणजे तो आनंद चिरकाल टिकत असतो.परंतु दुसऱ्याला फसवून यश मिळवले तर  हा आनंद, समाधान जास्त काळ टीकत नाही व आपल्याला त्याचा कधी ना कधी तरी पश्चाताप करावा लागतो. 


 भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मा.आण्णा हजारेंनी खूप प्रयत्न केले.माहिती चा अधिकार हे एक नवे शस्त्र त्यांनी अंमलात आणले.त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले.त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना भ्रष्टाचाराला आळा बसला आहे .पण अजून खूप प्रयत्न करणे गरजेचे आहे.


श्रीमती माणिक नागावे

कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

[01/06, 5:57 PM] अर्चना गरुड किनवट नांदेड: कोड क्र. [ 14 ]


" भ्रष्टाचार न संपणारा महारोग "


     " घरी आणण्या 

       चकाकती कार

       इमान सोडून 

       स्विकारी भ्रष्टाचार "


" भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट असे आचरण होय . " ही एक मानसिक स्वरूपाची प्रक्रिया होय . ती स्वार्थीवृत्तीतून उदयास येते .. शिवाय कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट न करता चौर्यमार्गाने मिळवलेली संपत्ती वा धन म्हणजे भ्रष्टाचार होय ... हा रोग जडलेली व्यक्ती प्रामाणिकपणे आपले कार्य करीत नाहीत .. उलट पैशाच्या हव्यासापोटी काळाबाजाराचा डोंगरच निर्माण करतात ... आणि अशा अनितीने मिळणाऱ्या पैशात आपल्या भौतिक सुखसोईची भूक भागवितात .... ही ऐतखाऊ मनोवृत्ती जोपर्यंत मानवी मनापासून कायमची दूर होणार नाही तोपर्यंत हा रोग आटोक्यात येणारच नाही ...


     " भौतिक गोष्टींत

        मानी धन्यता 

        मानसिक समाधाना

        लेखी न्यूनता "


भ्रष्टाचार निर्माण होण्याचे एकमेव मूळ म्हणजे मानसिक असमाधान हे होय ... इतरांचा , शेजारच्यांचा हेवादेवा करणे ... शेजारी नवीन एखादी भौतिक वस्तू आणली रे आणली की स्वतःच्या पोटात दुखू लागणे .... आणि ती वस्तू तशीच वा त्यापेक्षा सरस ! आणली म्हणजे ही अशी पोटाची तडस आपोआप शमते ... ही अशी वाढत जाणारी हव्यासी भावना या भ्रष्टाचार रोगाला पोषक व हितावह ठरणारी असते ... म्हणून आधी ह्या रोगाच्या मूळावरच घाला घालावा लागेल ... त्यासाठी मानसिक प्रदूषण निर्मूलन केले पाहिजे ...


     " सुंदर निसर्गास

       व्यर्थ देई दूषण

       वाढता मानवाचे

       मानसिक प्रदूषण "

खरंच ! मानव हा एवढा हावरट का होत चाललाय ... फक्त काही पैशासाठी मानवी जीवनच उध्वस्त करायला निघालायं ... अन्न , धान्य , औषध , फळे , पालेभाज्या ह्या सर्व प्रकारात तो भेसळ करून आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवीत आहे .... हे कुठंतरी थांबायला हवे .... कोण शिकार होत आहेत ? आपणच मानवजात ... वाह ! शिकारी व शिकारही आपली आपणच घेत आहोत ...हे पातक कर्म जेव्हा प्रत्येक मानवी मनात अगदी अंर्तमनांतून , काळजाच्या देठांपासून ठसेल ...तेव्हाच त्याच क्षणी हा भ्रष्टाचारी रोगांचा  पूर्णपणे नायनाट झालाच म्हणून समजा ....


     चला तर मग आपल्यापासूनच या वाढत्या महारोगाला आळा नको प्रतिबंधकच प्रामाणिकपणांची सर्वजन लस टोचून घेऊया ... आणि ह्या विराट महाकाय चौफेर विखुरलेल्या महारोगाला मूळासकट दूरवर फेकून देऊया .... आणि एक खरेखुरे देशभक्त होऊन सुंदर व स्वच्छ जीवन आनंदाने जगूया ...

अर्चना दिगांबर गरूड 

ता. किनवट , जि. नांदेड 

मो. क्र. 9552963376





शनिवार, 30 मई 2020

सहाव्या आठवड्याचे मानकरी

*साहित्य सेवक समुह आयोजित*

रोज एक लेख उपक्रम
दिनांक :- 24 मे ते 30 मे 2020
~~~~~~~~~~~~~~~
*सहाव्या आठवड्याचे मानकरी पुरस्कार*


~~~~~~~~~~~~~~
*सात पैकी सात लेख लिहिणारे*
01) हणमंत पडवळ, उस्मानाबाद
02) दुशांत निमकर, चंद्रपूर
05) श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड
07) श्रीमती माणिक नागावे, कोल्हापूर
08) महेंद्र सोनेवाने, गोंदिया
09) सौ.यशोधरा सोनेवाने, गोंदिया
13) सविता साळुंके, श्रीरामपूर
14) अर्चना गरुड, नांदेड
17) ज्ञानेश्वर झगरे गुरुजी, जालना
28) सुजाता जाधव, मुंबै
36) जी. एस. पाटील
37) सौ. जयश्री सिरसाटे
38) अमित बडगे
39) सौ. भारती तिडके
40) सौ. मनीषा पांढरे

*सात पैकी सहा लेख लिहिणारे*
10) सौ.भारती सावंत, मुंबई
11) शुभदा दीक्षित, पुणे
16) डॉ. वर्षा सगदेव, नागपूर

सहाव्या आठवड्याचे मानकरी ठरल्याबाबत आपले मनस्वी अभिनंदन .......!
~~~~~~~~~~~~~
*सात पैकी पाच लेख लिहिणारे*
26) जीवन खासावत
34) सुंदरसिंग साबळे, गोंदिया

*सात पैकी तीन लेख लिहिणारे*
15) गणेश सोळुंके, जालना

*सात पैकी दोन लेख लिहिणारे*
06) डॉ.हरिश्चंद्र भोईर, ठाणे
30) सुभद्रा खेडकर

*सात पैकी एक लेख लिहिणारे*
04) भागवत गर्कल बीड
19) अंकुश शिंगाडे
22) अरविंद कुलकर्णी, पुणे
25) सुवर्णा सोनवणे, चाळीसगाव
27) सौ. मेघा अनिल पाटील
32) दिपाली राऊत, उस्मानाबाद
41) संदीप वाकडे, औरंगाबाद
42) हेमंत पापळे, वाशिम
43) श्वेता अंबाडकर
44) मिलिंद गड्डमवार, चंद्रपूर

आठवडाभरात लेखन उपक्रमात सहभागी झालेल्या साहित्यिक मंडळींचे आठवड्याचे मानकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. अभिनंदन ......!
~~~~~~~~~~~~~~~
http://sahityasevak.blogspot.com/2020/05/blog-post_95.html
~~~~~~~~~~~~~~~
*आपण ही या समुहात join होऊ शकता, त्यासाठी खालील क्रमांकावर विनंती पाठवावे.*
~~~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769

रोज एक लेख :- दिवस त्रेचाळीसावा प्रेरणा / प्रोत्साहन

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- त्रेचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 31 मे 2020 रविवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- प्रेरणा / प्रोत्साहन*

कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे.

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769

शुक्रवार, 29 मई 2020

रोज एक लेख : दिवस बेचाळीसावा एकाग्रता

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- बेचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 30 मे 2020 शनिवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- एकाग्रता*

कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे. 

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*एकाग्रता:यशाचा मार्ग*
माणसाच्या जीवनशैलीमध्ये  गती आलेली आहे. आणि गती मध्ये काम करत असताना होणारे काम यशस्वी होईलच याची शाश्वती देता येत नाही. कारण काम करत असताना माणसाची एकाग्रता टिकून राहत नाही. ती न टिकण्याचे कारण म्हणजे त्याची जीवनशैली सुद्धा कारणीभूत आहे. खाण्याच्या सवयी, राहणीमान रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, जेवणाच्या वेळा निश्चित नसणे, आहारामध्ये सात्विक पदार्थांचे सेवन न होणे. अशा अनेक गोष्टी एकाग्रतेवर परिणाम करणाऱ्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवघेणी चाललेली स्पर्धा त्यातून येणारा तणाव या साऱ्या गोष्टी आपल्या एकाग्रतेवर परिणाम करत असतात. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असू तेथील एकमेकाशी असणारे संबंध आपल्या एकाग्रतेवर प्रभाव टाकू शकत असतात. जीवनामध्ये जे लोक यशस्वी झालेले आहेत मग तो कलाकार असेल, व्यवसायिक असेल, वैज्ञानिक असेल किंवा अनेक क्षेत्रातील कोणी असेल एवढेच काय विद्यार्थी सुद्धा केवळ आणि केवळ एकाग्रतेवरच यशाचे उंच शिखर गाठू शकतो. पुराण काळामध्ये सुद्धा अर्जुनाचे उदाहरण दिले जाते एकाग्रतेच्याबाबतीत. एखादे लक्ष्य पार करण्यासाठी आवश्यकता असते ती एकाग्रतेची. एकच काम अनेकांना सांगितले तर सर्वांकडून ते पूर्ण होत नाही किंवा ते व्यवस्थित पार पाडले जात नाही काही लोकांकडून, काही मोजक्या लोकांकडूनच ते पुर्ण होते. याचे कारण म्हणजे ते लोक त्या कामावर लक्ष केंद्रित करून जबाबदारी पार पडत असतात. काहीना हे लक्ष केंद्रित करणे जमत नाही. त्यामागे त्यांची मानसिकता, अस्थिर मन आणि इच्छाशक्ती या गोष्टी कारणीभूत असतात. शारीरिक स्वास्थ्य साठी हे एकाग्रतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. केवळ शारीरिक स्वास्थ्य उपयोगाचे नाही. तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा तंदुरुस्त असायला हवे. आणि त्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये चालत आलेली पद्धत म्हणजे ध्यानधारणा. ध्यानधारणा करून आपण एकाग्रता मिळवू शकतो. याची प्रचिती आजपर्यंत अनेकांना आलेली आहे. योगशास्त्रातही त्याचा आधार आहे. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अनेक विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत, अनेक योगिनी सांगितले आहे, अनेक आध्यात्मिक गुरूंनी देखील सांगितले आहे की ध्यानधारणेमुळे केवळ एकाग्रताच प्राप्त होत नाही तर एकाग्रता वाढीस लागण्यासाठी ध्यानधारणेचा उपयोग होतो.सतर्कता आणि मनाचे लक्ष हे नियमित ध्यानसाधनेचे परिणाम आहेत. असे गुरुदेव रविशंकर यांनी सांगितले आहे.काल्पनिक कथा, मासिके, जाहिराती किंवा मनाला त्रास देणाऱ्या बातम्या पाहिल्याने किंवा वाचल्याने मन अधिक बेचैन होते. टीव्ही आणि इंटरनेटमुळे मन गोंधळून जाते आणि निरर्थक प्रसंग मनात घर करतात. आणि आपली एकाग्रता भंग पावते. त्यामुळे अशा गोष्टीपासून आपण दूर राहणेच योग्य.  प्रेरणादायी विचार , चांगल्यांची संगत आणि आरोग्यदायी आहार, त्याचबरोबर नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, योगा या गोष्टीतून आपण मन शांत आणि एकाग्र करू शकतो. एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्याने उत्तम यश संपादन करता येते म्हणूनच विवेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला यशाची गुरुकिल्ली असे म्हणत. या गुरुकिल्लीला आणि वरील गोष्टी जर आपण साध्य केल्या आणि आपले मन जर एकाग्र झाले तर आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी परिपक्वता आपल्यामध्ये आल्यावाचून राहणार नाही.
       *हणमंत पडवळ*
        *उस्मानाबाद*
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(08)

  *एकाग्रता आणि स्मरणशक्ती*

        एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच विकेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ असे म्हणत. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन, ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती.योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते. परीक्षेतील यश असो वा नोकरीत आपल्यावर सोपवले गेलेले काम असो.. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्य़ानं साध्य करता येतात. याचे कारण या दोन्ही क्षमतांमुळेच आपल्याला हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास येतो.
          अनेकांना परीक्षेत मनासारखं यश मिळत नाही. यामागे अभ्यासात लक्ष लागत नाही, आठवत नाही, समोर पुस्तक असतं पण डोक्यात शिरत नाही अशी वेगवेगळी कारणं असतात. यावर उतारा म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणं. लक्षात ठेवा, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर या क्षमता विकसित करता येतात. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यानधारणेचा निश्चितच उपयोग होतो.
               आपल्याला हवं ते यश मिळवलंय, ध्येय साध्य केलंय याची दृश्यकल्पना करा (व्हिज्युलाइजेशन). परीक्षेसाठी छान तयारी करत असल्याचं आणि यशस्वी झाल्याची कल्पना तुमचा यशाचा मार्ग सुकर करतं. वेळ, पैसे खर्च न करताही अनेक गोष्टींचा सराव करता येईल. एकटय़ानं वा गटात स्मरणशक्तीचे खेळ खेळता येतील.. विविध प्रकारच्या भेंडय़ा लावणं, गोष्ट सांगणं, कविता सादर करणं, विशिष्ट ढंगात विनोद सांगणं, प्रश्नमंजूषा, सुडोकू, शाब्दिक कोडी सोडवल्याने स्मरणशक्तीला चालना मिळते आणि आपल्याला जी गोष्ट करायची आहे, त्यावर आपोआप आपलं लक्ष एकाग्र करायचीही सवय जडते.
           योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते. परीक्षेतील यश असो वा नोकरीत आपल्यावर सोपवले गेलेले काम असो.. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्य़ानं साध्य करता येतात. याचे कारण या दोन्ही क्षमतांमुळेच आपल्याला हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास येतो. अनेकांना परीक्षेत मनासारखं यश मिळत नाही. यामागे अभ्यासात लक्ष लागत नाही, आठवत नाही, समोर पुस्तक असतं पण डोक्यात शिरत नाही अशी वेगवेगळी कारणं असतात. यावर उतारा म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती याएकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच विकेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ असे म्हणत. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन, ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती.
          शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे असे स्वप्न सर्वच आई-वडील पाहात असतात. बौध्दिक विकासासाठी किंवा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आज बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत व दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. त्यापैकी नेमकी कोणती औषधे घ्यावी किंवा कोणते उपचार करावे हे कळेनासे होते. आपले उत्पादन कसे सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची तर जणु चढाओढच लागलेली असते. अशावेळी कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये हे कळेनासे होणे स्वाभाविक आहे. अशा उत्पादनां पैकी काय घ्यावे, किती प्रमाणात घ्यावे ह्या औषधांशिवाय आणखी काय उपाय आहेत, आहार काय असावा, व्यायामाचे महत्व काय, देवपूजा किंवा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे, ज्ञान ग्रहण करण्याचे कार्य नेमके कसे होते, ग्रहण केलेले ज्ञान कशा प्रकारे साठवले जाते, ते आठवण्याची क्रिया नेमकी कशी होते, ह्या व अशा प्रकारच्या अनेक शंका आपल्या मनाला रोज भेडसावत असतील. ह्या सर्व शंकांचे समाधान शास्त्रीय दृष्टिकोनातून बघूया.
           “शस्तं धी स्मृति मेधाऽग्नि बलायुः शुक्र चक्षुषाम्….” म्हणजेच बौध्दिक विकासासाठी व कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी ज्ञान ग्रहण, ज्ञानाची साठवण व स्मरण अशा तीनही कामांसाठी गायीचे तूप श्रेष्ठ आहे. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. मेंदू वर कार्य करणारी औषधे नाकाच्या मार्गे दिली तर त्यांचा परिणाम लवकर होतो. कारण ब्लड-ब्रेन बॅरियर यंत्रणे पासून मुक्त अशा सोप्या मार्गाने ही औषधे काम करतात. अलिकडे मधुमेहा साठी नाकाच्या मर्गे इन्सुलिन देण्याचे नवीन तंत्र प्रचलित होत आहे. ह्याच तत्वावर आधारित उपचार पध्दती आयुर्वेदात नस्य विधी म्हणून वर्णन सापडते. नाकाच्या मर्गाने टाकलेले औषध रक्तात शोषले जाण्यासाठी फक्त १.५ मिनिटांचा अवधी पुरेसा होतो असे प्रयोगांती सिध्द झाले आहे. केशराचे वस्त्रगाळ चूर्ण शास्रशुध्द विधीने मूर्छित केलेल्या गायीच्या तुपामध्ये सिध्द करून हे तूप नियमितपणे नाकात चार चार थेंब टाकावे. अभ्यासातून वेळ काढणे कठीण होत असेल तर आठवड्यातून दोन दिवस तरी हे तूप नाकात जरूर टाकावे. त्यामुळे नाका बरोबरच कान व डोळ्यांची पण शक्ती सुधारते, डोळ्याने वाचलेला व कानाने ऐकलेला विषय किंवा अभ्यास सहज पणे मेंदू पर्यंत विना-अडथळा पोचतो. बोटात अंगठी जात नसेल तर त्या ठिकाणी तेल किंवा दुसरा काही स्निग्ध पदार्थ लावला की ती क्रिया अगदी सहज होते. ह्या उपचारा मुळे काही त्रास न होता नकळतपणे अनेक फायदे होऊ लागतात. कोणाला वरच्या वर सर्दी होत असेल तर तो त्रास नाहिसा होतो, केस गळत असतील तर थांबून जातात, वाचून वाचून डोळ्यांना थकवा वाटत असेल तो थकवा गायब होतो, डोळ्यांची आग थांबते, कानात दडे बसत नाही, चष्म्याचा नंबर हळू हळू कमी होत जातो व कायम साठी जऊ पण शकतो, डोकेदुखीचा त्रास असल्यास तो पण आपोआपच ठीक होतो. 
_________________________

*महेंद्र सोनेवाने गोंदिया*
*मो. 9421802067*
दिनांक : ३०/०५/२०२०
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
39)मनाची एकाग्रता*******

मनाची एकाग्रता असणे हेच जीवन जगण्यासाठी फार आवश्यक आहे. मनाची एकाग्रता नसेल तर मन चंचल होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती च्या साह्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात एकाग्रता आणि स्मरणशक्ती हि यशाची गुरुकिल्ली आहे. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे.मनाची एकाग्रता म्हणजे आपण निश्चित केलेले लक्ष किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी निश्चित केलेले लक्ष किंवा साध्य पूर्ण करण्यासाठी झोकून देऊन ध्यानी- मनी- स्वप्नी त्याच गोष्टीचा विचार करत राहणे.आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. योग्यवेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमण आणि त्यावेळीच  आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते. परीक्षेतील यश असो नोकरीत आपल्यावर सोपवलेले गेलेले काम असो या दोन्ही गोष्टी आपल्याला मनाची एकाग्रता आणि स्मरणशक्ती च्या साह्याने साध्य करता येतात.
      "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण"
रामदास स्वामीचे ही उक्ती मनाची शक्तीची प्रचीती देते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी योगा अभ्यास आणि ध्यान साधनेचा निश्चितच उपयोग होतो. एकाग्रता ही नैसर्गिक असते. केवळ मनाला विश्रांती किंवा आराम देऊन एकाग्रता नैसर्गिक रित्या वाढविणे शक्य आहे. मनाला आराम देण्यासाठी किंवा विश्रांती देण्यासाठी आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी असू शकतात.मनाची एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी ध्यानधारणेद्वारा मनाला विश्रांती देणे आवश्यक आहे. अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले की ध्यानधारणा करण्याचा नियमित सराव केल्याने लक्ष वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते. मनाची एकाग्रता हवी असेल तर ध्यान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मन हे विमानापेक्षा ही वेगाने उडणारे आहे."कधी येथे तर कधी कुठे". मनातले विचार हे अव्यक्त कल्पनांच्या पुढे पुढे जात असतात. परंतु त्या मनाचे संगोपन  निकोप व्हायला हवे. त्यात  स्वैराचार यायला नको, चांगले वाईट विचार मनात आले तर सद्गुण- सद्वर्तनाचे स्वीकार व्हायला हवा. मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे.प्रत्येक मनुष्य जवळ कोणतेही काम करण्याची क्षमता असते. या सर्व प्रगतीचे रहस्य म्हणजेच त्याच्याजवळ असलेली प्रबळ इच्छाशक्ती, जिज्ञासू वृत्ती, मनाची एकाग्रता.
        हमको मन की शक्ती देना
        मन विजय करे
         दुसरो की जय से पहले
          खुद की जय करे.
अशी एक प्रार्थना आहे. ती मला खूप आवडते. प्रबळ इच्छाशक्ती मुळे मनुष्य जग जिंकायला निघाला आहे. मानस शास्त्रानुसार ज्याला स्वतावर विश्वास आहे त्यालाच जीवनातला खरा आनंद, सुख उपभोगता येते. आपल्या मनाची एकाग्रता वाढविणे, मनावर नियंत्रण ठेवणे आणि आपली मनशक्ती जागृत करणे हे आपल्याच हाती आहे अडलर नावाचा मानसशास्त्र होऊन गेला. त्याने अनेक व्यक्तीच्या मानसिकतेचा अभ्यास करून एक सिद्धांत मांडला. मानवी मनाची धाव नेहमी उत्तुंगतेकडे असते. आपल्या मध्ये जर काही कमी असेल तर ती कमतरता भरून निघण्यासाठी ही धाव
अजूनच वाढते. व पुढे जाण्याला मदत करते. आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचे असेल तर, स्वतःवर, आपल्या मनावर, इच्छाशक्तीवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. कारण हेच मन कधी कधी आपल्याला आपल्या लक्ष्यापासून, उद्देशापासून वंचित करते. म्हणून पुढे जाण्यासाठी मनाची एकग्रता व मनापासुन इच्छा हवी. ज्या व्यक्तीला पुढे जायचे त्या व्यक्तीला आंतरिक इच्छा हवी. पुरेशी इच्छा नसेल तर मनाची शक्ती जागृत होणार नाही.
             स्वतःला आपल्याजवळ सर्वशक्तिमान असलेले मन आहे. व ते आपल्याला अडचणीवर मात करायला शक्ती देणारे आहे, मार्गदर्शन करणारे आहे. यासाठी मनाची एकाग्रता, मनातील बदल हा महत्त्वाचा आहे. मनाची एकाग्रता नसेल तर अभ्यासू वृत्ती नष्ट होते. विध्वंसक बाजूला मन वळते. म्हणून मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी मनातील विचारांना अध्यात्म चांगल्या चिंतन कार्यात गुंतलेल्‍या पाहिजे. स्वतःची ,समाजाची प्रगती साधणारे विचार, इतरांना मदत करण्याचे विचार, जनकल्याण व मानवता कल्याणाची विचार जर मनात आणले तर आपल्या मनाची ऊर्जा सदैव आपल्या पाठीशी राहते. नशिबात आहे म्हणून होणारच याकडे आपल्या मनातील भावनेने लक्ष देता कामा नये. कारणाचा अंधारातच उद्याचा उषकाल दडलेला आहे. प्रकाशाची जाणीव संपणार नाही. नवी पहाट येईल, तिच्या स्वागतासाठी आपण तयारी करू.. प्रतिकूल परिस्थितीवर आपल्याला मात करायची आहे. अडचणींचे डोंगर पार करायचे आहे. याकडेच आपण आपले लक्ष केंद्रित करायला पाहिजे म्हणून मनाची एकाग्रता वाढवावी लागेल.
मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी मन एकाग्र करणे आवश्यक आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास लक्षात राहण्यासाठी मुलांची मनाची एकाग्रता हवी. अनेक संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की नेहमी ध्यान केल्याने एकाग्रता वाढते, विषयाबद्दल आवड निर्माण होते. सूर्यनमस्कार व सर्वांगासन असं केल्याने मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. परिणामी चांगली प्रगती होते. प्राणायाम केल्याने तीन तास मनाची एकाग्रता टिकून राहू शकते. आर्ट ऑफ लिविंग शिबिरात शिकविला जाणारा "एकाग्रता"प्राणायाम केल्याने हे साध्य होते. सुदर्शन क्रिया देखील मनाची एकाग्रता वाढवते. पौष्टिक  आहार, पूर्ण झोप, ध्यान साधना इत्यादीचा परिपोष चांगला केला तर मनाची एकाग्रता वाढते म्हणून असे म्हणतात की,
"Sound mind in a sound body."

सौ.भारती दिनेश तिडके
 रामनगर गोंदिया
8007664039
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*(02) एकाग्रता टिकविणे सध्या आव्हानात्मकच*

"धकाधकीच्या जीवनात
 आवश्यक आहे एकाग्रता
 ध्यान,प्राणायाम,योगासने
 करून मन ठेवावे शांत आता"
      
          एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे युग आहे.या तंत्रज्ञांनी युगात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करून मोबाईलमधील आभासी गेम खेळण्यात लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सतत खेळत वेळ घालवीत आहेत त्यामुळे सततच्या मोबाईल,लॅपटॉप, टीव्ही वरील चित्रपट,मालिका,गेम यासारखे बघत असल्याने थकवा,कंठाळा निर्माण होऊन शारीरिक व मानसिक ताणतणाव निर्माण झाल्याने एकाग्रता भंग होत आहे.प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायात अधिक काळ घालवीत असल्याने आराम, विश्रांतीची सवडच आजचा लोभी माणूस विसरत जात असल्याने एकाग्रता भंग होत आहे.सध्याच्या धकाधकीच्या काळात एकाग्रता टिकविणे हे सामान्य व्यक्तीच्या समोर आव्हानात्मक ठरत आहे.स्वामी विवेकानंद यांनी एकाग्रता व स्मरणशक्ती ही 'यशाची गुरुकिल्ली' आहे असे संबोधले होते.कोणत्याही व्यवसायात,कार्यात यश संपादन करायचे असेल तर एकाग्रता संपादन करणे खूप गरजेचे आहे.एकाग्रतेवर यश अवलंबून असतात असे सकारात्मक विचार अमलात आणण्यासाठी आवश्यक आहे.आपले चित्त शांत ठेऊन ध्येय गाठण्यासाठी एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे.शारीरिक कार्य करण्यासाठी शारीरिक ऊर्जा आवश्यक असते पण मानसिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी असावी लागते त्यामुळे मनाचा समतोल राखण्यासाठी एकाग्रता गरजेचे आहे आणि सध्या टिकविणे आव्हानात्मक ठरले आहे.एकाग्रता नसेल तर आपल्या कार्यक्षमतेवर,नवीन गोष्टी शिकण्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो.आज लहान मूल व युवक यांचा स्पर्धा परिक्षेवरील ताण-तणाव यामुळे त्याच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो आहे त्यामुळे सततच्या विविध कामाच्या व्यापामुळे थकवा, कंटाळा, काळजी,चिंता,लक्ष केंद्रित न करणे इत्यादी अनेक कारणांमुळे एकाग्रतेला तडा जात आहे म्हणून एकाग्रता साधने,टिकविणे आजच्या काळाची गरज बनली आहे.

         एकाग्रतेने कार्य केल्यास त्याची कार्यक्षमता, निर्णयक्षमता वाढीस लागते. नवनवीन कला कौशल्य शिकण्याची क्षमता निर्माण होते.त्यासाठी मनावरील ताण कमी करण्यासाठी विश्रांती घेणे गरजेचे आहे.दरदिवशी उत्तम झोप,सकस पौष्टिक आहार,सकाळी योगासने,व्यायाम,प्राणायाम केल्याने मनावरील ताण कमी होऊन एकाग्रता वाढीस मदत लागते.गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात की,ध्यान करणे म्हणजे मन एकाग्र करणे नव्हे तर सतर्कता व मनाचे लक्ष हे नियमित ध्यानधारणेचे परिणाम आहेत म्हणून सतर्कता पाळण्यासाठी आणि मनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी सकाळी व्यायाम नियमित केल्यास मन केंद्रित होऊन एकाग्रता वाढीस मदत होऊ शकते.प्राणायाम करीत असताना श्वासावर नियंत्रण ठेऊन श्वास आत,बाहेर केल्यास मन अगदी आनंदी,एकाग्र व शांत राहण्यास मदत होते याचसोबत सकस पौष्टिक आहारासोबत फळे घेतल्यास ताण कमी होऊन मन,शरीर शुद्ध,शांत राहून एकाग्रता निर्माण करून आपल्यासमोरील आव्हान निश्चितच पेलू शकतो ही आशा आहे.

✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(5)

*एकाग्रता*

*'एकाग्र करी मन l तेणे होईल समाधान रे' l* 

हे ज्ञानेश्वर माऊलीचे सुवचन ऐकले की एकाग्रतेने किती समाधान लाभते हे जाणवते. आपल जीवन यशस्वी करायच  असेल तर आपण मनापासून एकाग्रतेने काम केले पाहिजे. तरच आपलं जीवन यशस्वी होतं.
' सर्व जगाला विसरुन मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात'. एकाग्रता म्हणजे  एकचित्तता. ही एकचित्ता आपल्याला आपल्या कामात यश मिळवून देते. 
आपल्या कामात द्विधा मनस्थिती असेल तर त्या कार्याचा नाश होतो. मननामुळे माणसाला एकाग्रता लाभते. तसेच आपल्या मनाचा एक  दोष आहे तो म्हणजे चंचलता.  माणसाचे मन हे चंचल असते. हे चंचल मन वाऱ्यासारखे धावत असते. या चंचलतेमुळेच मनात संकल्प ,विकल्प निर्माण होतात.हे स्वैर धावत सुटलेले मन सावरायचे असेल तर आपल्या मनाची सर्व शक्ती दृढपणे स्थिर करून एकाग्रता निर्माण करावी लागेल. तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. माणसाने आपल्या कामात इतके तन्मय व्हावे की समोर कोणी जरी आले तरी आपल्याला ते माहित होऊ नये. एकदा नेपोलियनला बिन साखरेचा चहा दिला.नेपोलियनने तो चहा चटकन पिऊन टाकला. तो आपल्या कामात इतका तन्मय होता की चहात साखर नाही हे त्यांना कळलेच नाही. 
अशी एकाग्रतेची ,तन्मयतेची, एकरूपता, एकचित्तता, तल्लीनता ची कितीतरी उदाहरणे आहेत. एकाग्रता साध्य करण्यासाठी मनुष्याच्या डोळ्यापुढे एक विधायक ध्येय साधना पाहिजे. आपण ध्येयधुंद होऊन कार्य  केले तर जीवनाची यशश्री लाभते.
म्हणून माणसाचे मन हे बुद्धीच्या अनुरोधाने चालणारे असावे. बुद्धीने सांगावे,मनाने करावे. मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असावे. तरच योग्य निर्णय घेता येते. एकदा द्रोणाचार्यांना आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची होती. झाडावर एक पक्षी टांगला होता, आणि त्याच्या डोळ्याचा वेध करायचा होता. आचार्यांनी प्रत्येक शिष्याला जवळ बोलावून विचारले, " तुला काय दिसते?" सगळे म्हणाले झाड दिसते, पाने दिसतात, पक्षी दिसतो. परंतु एकटा अर्जुन म्हणाला, " मला फक्त डोळा दिसतो". अर्जुनाच्या  या एकाग्रतेतमुळेच तो वीर धनुर्धर बनला. एक अद्वितीय धनुर्धर म्हणून अर्जुनाची ओळख आहे.

 “ध्यान, एकाग्रता ही एक सदैव सज्ज असणारी, उपयोगी व संकटात मुक्त करणारी फायदेशीर सवय आहे. एकाग्रता आपल्या जीवनातला एक परम आवश्यक गुण आहे. ”असे चार्लस् डिकन्स या विचारवंताचे मत आहे.  म्हणून माणसाने आपला प्रत्येक क्षण आणि सर्व शक्ती कर्मातच उपयोगीली पाहिजे. अशी ध्यान आणि एकाग्रता ची सवय ठेवावी. एकग्रतेसाठी संयमाची अत्यंत आवश्यकता आहे. जीवनाचे स्वरूप उलगडायचे असेल तर व्यक्तीने आपले वळण संयमाकडे आहे की स्वच्छंदाकडे आहे हे जाणून घेतले पाहिजे. विनोबा भावे यांनी म्हटले आहे  की " संयम ही जीवनाची किल्ली आहे". संयमाची ही जीवनाची किल्ली आपल्याजवळ असेल तर आपल्याला एकाग्रतेची सवय लागेल. आणि आपले मन एकाग्र झाल्यावर आपल्याला अशक्य असे एकही काम नाही. जर एकाग्रतेचा अभाव असेल तर आपले एकही काम यशस्वी होणार नाही. या एकाग्रतेच्या अभावामुळे आपली शक्ती विकेंद्रीत होऊन तिचा अपव्यय होतो. म्हणून जीवनात एकाग्रता, तन्मयता, एकरूपता , एकचीत्तता, परिमिततता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  माणसाने एकाग्रतेने काम करावे तरच समाधान मिळते.  म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या सुवचनात म्हटले आहे
*'एकाग्र करी मन l तेणे  होईल समाधान रे l'* 
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जि. नांदेड.
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
कोड न. ३६ ............विषय : - "एकाग्रता"  आपले मनात वेगवेगळ्या प्रकारचे चालू असतात,मन एकाच ठिकाणी स्थिर ठेवणे म्हणजे "एकाग्रता" आणि हे कोणाला सहजा सहजी शक्य नसते त्यासाठी भरपूर प्रयत्न केले तर काहीच अवघड नाही.मन चंचल असते कधी आपन एखादे पुस्तक वाचत असलो तरी मनात जर वेगळा विचार चालू असेल तर पुस्तकात काय वाचले ते सांगता येत नाही म्हणजे "एकाग्रता" नव्हती असेच म्हणावे लागेल.आपण एका ठिकाणी सहल साठी गेलेला असाल तर आपण घरचा विचार विसरून सहली मधील आंनद तेथील नव नवीन वेग वेगळा निसर्ग पाहुन "एकाग्रता" मनात ठेवून आंनद घेतला पाहिजे त्यावेळी घरचा विचार मनात आला की गाईला पाणी कोणी पजल असेल आज घरी काय जेवण केले असेल किवा यावेळी मी काल कोठे होतो हे जर विचार चालू असतील तर त्या सहलीचा काहीच उपयोग नाही हे एकाग्रता आपणास न कळत शिकवून जात असते.शाळे मध्ये विद्यार्थी म्हणून जर शिक्षण घेत असाल तर  आपले शिक्षक काय शिकवतात त्याच्याकडे लक्ष असल पाहिजे काही शिकविले मधील विचारले तर तुमची एकग्रता असेल तर पटकन उतरे देवू शकता.पण तुमचे लक्ष नसेल तर तुम्ही उत्तर देवू शकणार नाही.एकदा वर्गात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु बैरिस्टर मा.पी.जी.पाटील शिकत असताना शिक्षकानी त्याना उभे केले त्यावेळी हातामध्ये पुस्तक न घेता पुस्तक मधील पान नंबर व ओळ सुध्दा सांगितली ही "एकाग्रता"अशी असली पाहिजे.महाभारतातील  द्रोणाचार्य अर्जुन ला व इतर पाण्डवानां विचार तात झाडावर पक्षी बसलेला आहे त्या संबधी प्रत्येकाला प्रश्न विचारतात तुम्हाला झाडावर काय दिसत आहे काही सांगतात पक्षी दिसत्तो,एक सांगतो पक्षाचे पंख दिसतात पण ज्यावेळी अर्जुनावर वेळ येते त्यावेळी अर्जुन सांगतो मला पशाचा फक्त डोळा दिसतो आहे ही "एकाग्रता"असते.आता सध्या एकाग्रता हवी आहे कारण सर्वत्र आपण ध्वनी प्रदूषनामुळे एवढे घायाळ झालो आहोत की एकाग्रता नाही मिळू शकत.वाहना ची रस्त्यावर गर्दी ,रेल्वे, विमान छोटीमोटी इतर वाहन संख्या वाढली आहे ती वाहने गरज म्हणून आपण वापरत असतो त्यांमधुन आवाजाचा त्रास हॉट असतो त्यामुळे एकाग्रता मिळत नाही शहरात राहणाऱ्या विद्यार्थी याना फार त्रा स असतो यावर मात करून अभ्यास करतात.एकदा खेडे गावातील एक मुलगा अभ्यास करीत होता त्याच्या शेजारुन एक बैलगाड़ी धड़ धड़ करीत गेले नंतर तेथे येवून विचारतो येथून थोड्या वेळापूर्वी एक बैलगाड़ी गेलेली पाहिला का? तेव्हा तो म्हणतो मी नाही पाहिली.म्हणजे तो मुलगा एवढा एकाग्र झाला होता त्याला बैलगाडिचा आवाज ऐकु आला नाही.आज पर्यन्त ज्यावेळी वेळी शोध लावले ते केवल आणि केवल एकाग्रता यामुळेच आपण सुध्दा तसाच प्रयत्न केला तर आपल्या स्वत:च्या प्रगतिबरोबर आपल्या देशाची प्रगति करु शकतो ही काळ्या दगड़ावरची रेष ठरेल हे नक्की.....

.लेखक जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*एकाग्रता हीच यशस्विता*

आजकाल माझे मन कुठंच लागत नाही, मन अस्वस्थ वाटायला लागतं, वाचलेले काही लक्षात राहत नाही, एक करायला गेलो की दुसरेच होते अशी काही वाक्य आपल्या मित्रांकडून किंवा नातलगातील व्यक्तीकडून ऐकतो तेंव्हा आपण त्यांना एकच सल्ला देतो ते म्हणजे अगोदर मन एकाग्र कर, बाकी सर्व ठीक होईल. मन एकाग्र करणे म्हणजे काय ? मनाची एकाग्रता काय केल्याने मिळते ? या प्रश्नाच्या उत्तरांचा शोध घेतल्यास लक्षात येते की मनाची एकाग्रता म्हणजे आपले लक्ष, अवधान. आपले लक्ष किंवा अवधान नसेल तर मन एकाग्र होणार नाही आणि कोणतीही क्रिया यशस्वीपणे पूर्ण होणार नाही. ही एकाग्रता एका दिवसांत किंवा काही महिन्यात मिळविणारी गोष्ट मुळीच नाही. त्यासाठी लहानपणापासून आपणांस असलेल्या अनेक सवयीचा परिपाक म्हणजे एकाग्रता. एकाग्रता वाढली की आपली स्मरणशक्ती वाढायला लागते. स्मरणशक्ती वाढत गेली की आपण जीवनातील अनेक संकटे लीलया पार करू शकतो. ध्यान धारणा करून चित्त एकाग्र करण्याचे काम पूर्वीचे संत आणि ज्ञानी लोक करत असत. पौराणिक कथेत आपण असे ही वाचले आहे की, हे ऋषीमुनी तपश्चर्या करण्यासाठी घनदाट जंगलात, एखाद्या गुहेत किंवा उंच पर्वतावर जाऊन बसत. त्यांची एकाग्रता भंग होऊ नये हा त्यापाठीमागचा उद्देश्य असायचा. सांसारिक जीवन जगताना आपले मन एका गोष्टीवर एकाग्र होतच नाही. मालिका चालू असतांना जसे मध्येमध्ये जाहिराती येतात अगदी तसेच अडथळे अधूनमधून येतात ज्यामुळे आपली एकाग्रता लोप पावते आणि कामाचा खोळंबा होतो. लहान मुलांचे मन खुपच चंचल असते. त्यांना एका जागेवर दोन मिनिटं बसून राहा म्हटले तर ते बसून राहू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये एकाग्रता निर्माण करण्यासाठी आणि त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे तरच ही मुले भविष्यात हुशार होऊ शकतात. लहान मुलांना छोटी छोटी अनेक सोपी कामे सांगितली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात एकाग्रता वाढू लागते. माझं बाळ अजून लहान म्हणून काही काम सांगितले नाही तर त्यांच्यात एकाग्रता निर्माण होणार नाही. त्याच्या वयाला झेपेल अशी कामे त्यांना करायला देणे म्हणजे त्यांच्या मेंदूचा विकास समजल्या जाते. मेंदूला जेवढं काम दिलं तेवढं त्याचे आयुष्य वाढत राहते. पण जास्तीचे काम लावणे देखील धोक्याचे आहे. काही जण अति ताण घेतात आणि आपल्या जीवाला मुकतात. पूर्वीच्या काळी मनाच्या एकाग्रतेसाठी व शिक्षणासाठी मुलांना गुरूंच्या घरी पाठवत असे त्यास गुरुकुल शिक्षण पद्धती म्हटले जायचे. त्याठिकाणी त्याला स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावल्या जात असे. विविध प्रकारचे अनुभव शिक्षण त्यांना देऊन त्यांची एकाग्रता वाढविण्याचे काम येथे केले जात असत. पण आज अशी पद्धत नाही म्हणून मुलांना स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय घरातून लावणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर ही मुले आळशी होऊन भविष्यात म्हणावी तशी प्रगती साधणार नाहीत. शिक्षणासाठी मुलांना शाळेत पाठविले जाते. शिक्षक तेथे शिकविण्याचे काम करतात. शिक्षक शिकविताना काही मुले लक्ष देतात तर काही मुले दुर्लक्ष करतात. जी मुले शिकविण्याकडे आपले पूर्ण लक्ष देतात, अवधान ठेवतात म्हणजे मन एकाग्र करून दिलेलं काम करतात तीच मुले पुढे प्रगती करतात. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत आपण मन एकाग्र करतो तर नावडतीच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामुळे ती बाब कधीही जमणार नाही. शालेय जीवनात मुले अमुक विषय सोपा आणि अमुक विषय अवघड असे का म्हणतात ? तर त्या विषयाकडे त्याची असलेली एकाग्रता हेच सर्वात मोठे कारण आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक गोष्टीत एकाग्रता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय काही मिळणार नाही. एकाग्रतेसाठी कान आणि डोळे अत्यंत महत्वाचे आहे. डोळ्याने पाहणे आणि कानाने ऐकणे या क्रिया परिपूर्ण झाले तरच काही गोष्टी कळतात. ह्या दोन गोष्टी जर वजा केले तर आपले मेंदू काहीच कामाचे नाही असेच वाटते. एकाग्रता वाढविण्यासाठी योगासने, ध्यानधारणा आणि प्रार्थना ह्या गोष्टी महत्वाचे आहेत. ज्याचा रोज सराव करणे देखील महत्वाचे आहे.  एकाग्रता म्हणजे काय असते ? याचे एक ऊत्तम उदाहरण म्हणजे संत गोरोबा काका यांच्या जीवनातील एक प्रसंग. 
गोरा कुंभार हा एक विठ्ठलभक्त होता. कुंभारकाम करत असताना देखील तो विठ्ठलाच्या भजनात सदैव तल्लीन राहत असे. विठ्ठलाच्या नामस्मरणात तो नेहमी मग्न असे. एकदा त्याची पत्नी आपल्या एकुलत्या एका लहान मुलास अंगणात ठेवून पाणी आणण्यासाठी गेली. त्या वेळी गोरा कुंभार मडकी करण्यास लागणारी माती तुडवीत विठ्ठलाचे भजन करीत होता. त्यात तो अगदी तल्लीन झाला होता. जवळच रांगत, खेळत असलेलं ते मूल तिकडे येऊन आळ्यात पडले. त्या मातीत आले. गोरा कुंभार पायांनी माती खालीवर करीत होता. मातीबरोबर त्याने आपल्या मुलालाही तुडविले. विठ्ठलाच्या भजनात तो मग्न असल्यामुळे माती तुडविताना रडलेले मूल ही त्याला समजले नाही. ही विठ्ठलाप्रति असलेली भक्तीतून एकाग्रता लक्षात येते. काही नवीन शिकायचे असेल तर मनाची एकाग्रता वाढविणे हीच खरी यशस्विता आहे. 

- नासा येवतीकर, 9423625769
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*34*
आजचा लेखनाचा विषय- एकाग्रता

 *श्वासा शिवाय आयुष्य नाही, एकाग्रता शिवाय भविष्य नाही*

==============
       "एकाग्रता" (अटेन्शन) हे आपल्या मेंदूतील ऊर्जेचा नेता आहे. आपल्या मेंदूला एकाच वेळी इतकी माहिती मिळत असते, की तो त्या माहितीला न्याय देऊ  शकत नाही. त्यामुळे तो ठरावीक माहितीच घेतो.

    माणूस मोबाइलवर व्हिडीओ पाहण्यात गुंतला असेल तर आजूबाजूला काय घडते आहे ते त्याला समजत नाही. कारण त्याचे तिकडे लक्ष नसते. आपल्या मेंदूला एकाच वेळी इतकी माहिती मिळत असते, की तो त्या माहितीला न्याय देऊ  शकत नाही. त्यामुळे तो ठरावीक माहितीच घेतो. जी माहिती तो ग्रहण करतो तिकडे लक्ष आहे, ‘एकाग्रता आहे’ असे म्हटले जाते. म्हणजे एकाग्रता (अटेन्शन) हे आपल्या मेंदूतील ऊर्जेचा नेता आहे. जेथे अटेन्शन असते तेथे मेंदूतील अधिकाधिक ऊर्जा वापरली जाते. ध्यान म्हणजे प्रयत्नपूर्वक आपले लक्ष ठरावीक ठिकाणी द्यायचे. ध्यान देऊन ऐक असे सांगितले जाते, त्यावेळी इकडे लक्ष दे असेच बोलणाऱ्याला सांगायचे असते. असे सांगावे लागते कारण समोरील व्यक्ती काहीही करीत नसली तरी तिचे लक्ष आपल्या बोलण्याकडेच असेल असे सांगता येत नाही. बऱ्याचदा मनात विचार येत असतात आणि त्यामध्येच माणूस गुंग होऊन गेलेला असतो. आत्ता आपले लक्ष कुठे आहे ते जाणणे आणि ते ठरवून एखाद्या गोष्टीवर किंवा कृतीवर नेता येणे हे मानवी मेंदूचे एक व्यवस्थापकीय कार्य आहे.
    "असावी एकाग्रता ही कामत, मनी धरावा सदा एक ध्यास , दिलेल्या कामाची पूर्ति व्हावी , यश मिळेलच मग तुम्ही खास." मेंदूतील प्री फ्रंटल कोर्टेक्स जी कामे करतो त्यातील काही खास कामांना मेंदूची व्यवस्थापकीय कार्ये म्हणतात. एखाद्या कंपनीतील मॅनेजमेंट जशी काम करते, कुठे पैसे खर्च करायचे हे जसे कंपनीत ठरवले जाते तसेच माणसामध्ये कुठे ऊर्जा वापरायची आणि कुठे वाचवायची हे मेंदूतील ठरावीक भाग ठरवीत असतो. या भागाला योग्य प्रशिक्षण मिळाले नसेल तर तो चुकीच्या ठिकाणी ऊर्जा खर्च करीत राहतो आणि त्याचे त्याला भान नसते.

      भान वाढवण्यासाठी जो सराव केला जातो त्यालाही ध्यान म्हणतात. यातील एकाग्रता ध्यान म्हणजे लक्ष एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा आणायचे, मेंदूतील एकच फाइल अधिकाधिक वेळ सक्रिय ठेवायची. त्राटक, नामस्मरण, आनापान हे सारे एकाग्रता वाढवणारे उपाय आहेत. यामध्ये ‘आलंबन अधिकाधिक सूक्ष्म करणे’ हे प्रगतीचे लक्षण असते. म्हणजे श्वासाचा स्पर्श जाणण्यासाठी नाकाच्या खाली वरच्या ओठावर लक्ष ठेवायचे. स्पर्श समजू लागला की लक्ष त्या भागातील एका छोटय़ा बिंदूवर ठेवायचे. स्वामी विवेकानंद यांनी या ध्यानाची खूप प्रशंसा केली आहे. विपश्यना शिबिरातील पहिले तीन दिवस असेच ध्यान केले जाते. त्याला आनापान म्हणतात. विद्यार्थ्यांनी असा नियमित सराव केला की त्यांची ग्रहणक्षमता वाढते.
       "मनाची स्थिरता,
        बुध्दीची कुशाग्रता ,
         ताणाची दक्षता ,
     तरच साधते एकाग्रता."

==============
✍️ श्री.सुंदरसिंग साबळे 
         गोंदिया 
   मो.9545254856
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*(38)*
*माणसाची एकाग्रता*

मैनेला, तिचा आवाज;
मोराला, त्याचा पिसारा;
वाघाला, त्याची नखं,
तशी माणसाला - त्याची ‘एका ग्रता’!

सृष्टीमध्ये प्रत्येक प्राण्याचं काही वैशिष्ट्य आहे. माणसाची तर अनेक गुणवैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी त्याला उच्च कोटीला नेणारं एक गुण-वैशिष्ट्य म्हणजे ‘एकाग्रता’.
एकाग्रतेमुळे आपल्या मनाची खूप शक्ती वाढते. ती आपल्याला अन्यत्र उपयोगी पडते. एकाग्रतेमुळे आपली कार्यक्षमताही वाढते आणि यश लौकर प्राप्त होतं.
सचिन तेंडुलकरसारखा जगविख्यात फलंदाज असं सांगतो की, “माझ्या यशात, एकाग्रतेचा मोठा वाटा आहे. मी फलंदाजी करताना मला समोरचा अंपायर, रनर किंवा अन्य कोणीही दिसत नाही. दिसतो तो फक्त गोलंदाजाचा हात व त्यातील चेंडू. त्यावरच माझं सगळं लक्ष एकाग्र झालेलं असतं.” असं त्याने एका मुलाखतीत संागितलं होतं. अशी अनेक उदाहरणं देता येतील.
थोडक्यात ‘यश’ आणि ‘एकाग्रता’ यांचं अतूट नातं आहे. कला-क्रीडा, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग-व्यापार, राजकारण, युध्द, अध्यात्म, ध्यान-साधना, इत्यादी सर्वच छोट्या-मोठ्या क्षेत्रांमध्ये, यशासाठी एकाग्र प्रयत्न आवश्यक असतात. एकाग्रतेचं महत्त्व हे असं सर्वव्यापी आहे.
परंतु, ‘एकाग्रता’ किंवा ‘ध्यान’ हा विषय आला की, ‘मन एकाग्र होत नाही’ , मनात अनेक विचार येतात’ अशीही अनेकांची तक्रार असते. तेव्हा, आपलं हे चंचल मन एकाग्र कसा करावं, एकाग्रतेतून शांती कशी मिळवावी हे समजून घेताना, प्रथम एकाग्रतेची व्याख्या पाहू.
एकाग्रतेच्या दोन व्याख्या सांगता येतील; त्या अशा -
- आपल्याला आवश्यक त्या गोष्टीकडे संपूर्णपणे लक्ष देण्याची व त्याचवेळी अन्य गोष्टींकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची क्षमता, म्हणजे एकाग्रता.
- आपली भावनिक आणि बौध्दिक शक्ती एकवटून, ती इच्छित काळापर्यंत ठरवलेल्या उद्दिष्टांवर, ध्येयावर स्थिर ठेवण्याची क्षमता, म्हणजे एकाग्रता.
मात्र, ध्यान आणि एकाग्रता यात एक मूलभूत फरक आहे. तो फरक ‘हेतूचा’ आहे. सामान्यत:, एकाग्रता ही बाह्य यशासाठी- म्हणजे दैनंदिन व्यवहारात यश मिळवण्यासाठी- उपयुक्त अशी प्रक्रिया आहे. तर ध्यान ही आपल्या अंतर्मनाच्या शोधाची, तसंच शुध्दीचीही प्रक्रिया आहे. अशा या दोन्हीचा समन्वय साधून, ‘मनशक्ती प्रयोग केंद्राने’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच, एकाग्रता आणि मन:शांतीसाठी विविध पध्दती विकसित केलेल्या आहेत.

-अमित प्र. बडगे , नागपूर
   (7030269143)
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(09) *एकाग्रतेसाठी -रामबाण AOL*

          एकाग्रता ही नैसर्गिक असते. केवळ मनाला विश्रांती किंवा आराम देऊन एकाग्रता नैसर्गिकरित्या वाढविणे शक्य आहे. मनाला आराम देण्यासाठी किंवा विश्रांती देण्यासाठी आपल्या वैयक्तिक आवडी निवडी असू शकतात. परंतु तुम्ही निवडलेले साधन मनाची एकाग्रता टिकून ठेवेलच असे नाही. एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी ध्यानधारणाद्वारे मनाला विश्रांती देणे अत्यावश्यक आहे. या सोप्या प्रक्रियेचे बरेच फायदे आहेत आणि त्याच्या उप-उत्पादनांमध्ये सुधारित एकाग्रता, वर्धित बुद्धी आणि विचारांमधील स्पष्टता यांचा समावेश होते .
       आपलं लक्ष एकाग्र का होत नाही, लक्षात का राहात नाही, याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करावा.एकाग्रता सुधारण्यासाठी ध्यान आपण एखादा कलाकार, व्यावसायिक, विद्यार्थी किंवा खेळाडू असा, किंवा आपल्या क्षेत्रातील सर्वात कुशल असा. तरीही आपली कार्यक्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता ही शेवटी आपल्या एकाग्रतेच्या किंवा लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.
    .बरेच लोक लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा एकाग्रता साधण्यासाठी खूप संघर्ष करतात. एकाग्रता भंग पावण्यासाठी खूप वेगवेगळी कारणे आहेत. उदा. थकवा, उदासीनता, काळजी, चिंता. लक्ष केंद्रित न होणे किंवा एकाग्रता नसणे ही प्रामुख्याने विखुरलेल्या आणि अस्वस्थ मनाची अवस्था आहे. आपण आपल्या मनास एकाग्र करण्याचे प्रशिक्षण कसे देऊ शकाल?
अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की ध्यानधारणा करण्याचा नियमित सराव केल्याने लक्ष वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते. ध्यान  आपल्याला वर्तमान काळात राहण्यास अधिक सक्षम करते. आपण बर्या्चदा ऐकतो की ध्यान करण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. परंतु, *गुरुदेव श्री श्री रविशंकर* म्हणतात की'" ध्यान करणे म्हणजे मन एकाग्र करणे नव्हे.तर सतर्कता आणि मनाचे लक्ष हे नियमित ध्यानसाधनेचे परिणाम आहेत". ध्यान आपल्याला फक्त एकाग्रता वाढविण्यासच नाही तर एकाग्रतेची शक्ती किंवा क्षमता वाढविण्यास मदत करते. 
        कुशल एकाग्रतेकरिता श्वासाचे निरीक्षण करणे.श्वास हा प्राणिमात्र किंवा जीवन शक्तीचा मुख्य स्रोत आहे. आपल्या श्वासाचे निरीक्षण करून आणि श्वासाबद्दल जागृत होऊन आपण शांततेचा अनुभव घेऊ शकता. प्रथमतः आपल्यासाठी एक शांत जागा निवडा. नंतर आपल्या श्वासाच्या नैसर्गिक लयीचे निरीक्षण करा. त्यानंतर ध्यान करा. आपण येथे दिलेल्या कोणत्याही प्रकारे ध्यान करून स्थिर आणि शांत मनाचा अनुभव घेऊ शकता. 
    . *प्राणायाम*- प्राणायामात प्रामुख्याने आपण श्वास आत घेतो, रोखतो, आणि सोडतो. आपली अल्प आणि दीर्घकालीन उर्जा वाढविण्यासाठी प्राणायाम हा एक मार्ग आहे. आपण ध्यान करणे सुरू करण्यापूर्वी काही मिनिटांसाठी नाडीशोधन प्राणायाम करू शकता. प्राणायाम मनाला आनंदी, एकाग्र आणि शांत ठेवण्यास मदत करतो. 
.          *सुदर्शन क्रिया*  सुदर्शन क्रियेमध्ये श्वासाच्या विशिष्ट नैसर्गिक लयींचा समावेश आहे ज्यामुळे शरीर, मन आणि भावना समक्रमित होतात. सुदर्शन क्रिया हे श्वास घेण्याचे एक अतिशय शक्तिशाली पण खूप सोपे तंत्र मनातील तणाव दूर करून मन शांत आणि एकाग्र करण्यास मदत करते. संशोधनाद्वारे असे आढळले आहे की सुदर्शन क्रिया नियमित करणाऱ्या व्यक्तींना रोग प्रतिकारशक्ती, तग धरण्याची क्षमता आणि निरंतर उच्चऊर्जेची पातळी प्राप्त होते.कोरोणा च्या बचाव करण्यासाठी आपल्या शरीराची *रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास सुदर्शन क्रिया रामबाण*  आहे. WHOने प्रमाणित केले आहे की एक सुदर्शन क्रिया-आपल्या डोक्यातील एक शेल ओपन करते.एवढी पावरफूल आहे सुदर्शन क्रिया.आँन लाईन सर्वानी सुदर्शन क्रिया शिकून स्वताःची प्रतिकारशक्ती वाढवून कोरोणाला जवळ भटकू देऊ नका.
         आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम आपली आंतरिक उर्जाउत्तेजित करून समर्पण भावाने उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत करू शकते. AOLम्हणजेच आर्ट आँफ लिव्हिंग  ,हँपीनेस प्रोग्राममध्ये योगासन सारख्या नैसर्गिक पद्धती आणि सुदर्शन क्रियेसारख्या श्वासोच्छवासाच्या क्रियांचा समावेश आहे. ह्यामुळे आपले भटकते मन शांत होऊन एकाग्रता वाढते आणि अर्थपूर्ण आणि इच्छित स्थळी जाण्यास मनाला नेण्यास मदत होते.मन वर्तमानकाळात राहतो भुत,भविष्याच्या विळख्यातून मुक्तता मिळते.जय गुरूदेव !

लेखिका 
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*(४०) मनिषा पांढरे, सोलापूर*

*एकाग्रता*

*मुलाखतकार- सद्गुरू तुम्ही एवढे विद्वान आहात. किती पुस्तकांचे तुम्ही वाचन केले आहे.*
*सद्गुरू- अगदी अल्प...कारण मला एवढी काम आहेत की वाचन करायला मला वेळच मिळत नाही.*
*मुलाखतकार- मग आपणास एवढं ज्ञान येत तरी कुठून? अगदी संगणक युगातील सर्व शब्द, जगातील सर्व माहिती कुठून माहिती होते*
*सद्गुरू- तुमच्याच मेंदूतून*
*मुलाखतकार- म्हणजे?*
*सद्गुरू- मी जेव्हा एकाग्र होतो तेव्हा माझे मन तुमच्या मनात मिसळते आणि तुमच्याच ज्ञानावर आधारित मी उत्तरे देतो.*

युट्युबवर ईशा केंद्रावरील ही सर्व माहिती ऐकली आणि एकाग्रता किती महत्त्वाची आहे हे समजले.
मन एकाग्र केले तर जगातील सर्व गोष्टी सहज साध्य करता येतात.
स्वामी विवेकानंद हे एकपाठी होते. एकपाठी म्हणजे एकदा वाचलेले लक्षात राहणे....हे कधी शक्य होतं जेव्हा आपल्यात ही एकाग्रता निर्माण होते. ती सहजासहजी निर्माण होत नाही त्यासाठी आवर्जून प्रयत्नशील रहावे लागते.
एकाग्रता निर्माण करण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी लोक विविध ध्यानप्रकार करतात. त्यात विपषण्णा, सुदर्शन क्रिया, सिंहक्रिया, सहजयोग,भ्रामरी, त्राटक असे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक जरी क्रिया नियमितपणे केली तर एकाग्रता सहज शक्य आहे.
एकाग्रता आल्यास मन शांत होते. आनंदी बनते, सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जातो, आपण वर्तमानात जगतो.योग्य निर्णय क्षमता वाढीस लागते.

एकाग्रता वर आधारित स्वामी विवेकानंदांचे आणि स्वामी बुधानंद, सरश्री यांच्या पुस्तकाचे वाचन केल्यास आपल्याला याचे महत्त्व लक्षात येईल.एकाग्रता ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आपण ती मिळवण्यासाठी नक्की प्रयत्न केला पाहिजे.

लेखिका,
मनिषा पांढरे, सोलापूर.
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
कोड नं 13

"साधूया मनाची एकाग्रता
होउ या मग जगज्जेता"

ज्याला मनाची एकाग्रता साधता येते त्याला प्रयत्नांची पराकाष्टा करून यश नक्कीच प्राप्त होते हे सर्वांनाच माहीत आहे.
विद्यार्थी असो वा व्यावसायिक वा नोकरदार प्रत्येकाला यश प्राप्ती साठी योग्य वेळेत योग्य निर्णय घेण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे. प्रत्येक जण मन एकाग्र करू शकतो का ?आणि होत नसेल तर काय अडथळे आहेत मन एकाग्र होण्यास?
 मन चंचल असल्यास , एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचे डोक्यात असल्यास काही दुःखद प्रसंगामुळे व अडचणीमुळे मन अस्थिर असल्यास, काही मानसिक आजार असल्यास गतिमंद, मतिमंद असल्यास मन एकाग्र होऊ शकत नाही. आपल्याला असे वाटते की लहान मुले खूपच चंचल असतात त्यामुळे ती मन एकाग्र करू शकत नाही परंतु असे नक्कीच नसते कारण तुम्ही मोबाईलचे किंवा एखाद्या गोष्टीचे उदाहरण घ्या. जेव्हा तुम्ही मुलाला त्याच्या आवडीची गोष्ट करायला देता तेव्हा ते मन एकाग्र करून ती गोष्ट पूर्ण करते म्हणजेच लहान मुलांमध्ये चंचलता हे कारण हा मन एकाग्र करण्यासाठी बाधा होऊ शकत नाही. एखादा विषय किंवा काम आवडत नसल्यास त्या विषयात मन एकाग्र होऊ शकत नाही याचे उदाहरण म्हणजे गणित ,इंग्रजी या सारख्या विषयांचे उदाहरण देता येईल. काही मुलांना गणित आवडत नाही इंग्रजी आवडत नाही म्हणून त्यांना ते विषय कठीण जातात. त्या विषयातील अभ्यासात ते मन एकाग्र करू शकत नाहीत.
 मोठ्या माणसांचे किंवा मुलांचेही उदाहरण याबाबत देता येईल आवडीचा व्यवसाय नसला किंवा आवडीच्या क्षेत्रात शिकण्याची संधी मिळाली नाही तर मन एकाग्र होत नाही व व्यवसाय किंवा अभ्यासात यश मिळत नाही. बऱ्याचदा एखादी मनाविरुद्ध अप्रिय घटना घडल्यास पण एकाग्र राहत नाही. विचारांचे मोहोळ मनात  उठते व निर्णय घेता येत नाही. कधी कधी असे होते की विचार वेगळे चालू असतात व कृती मात्र वेगळीच घडत असते याला कारण म्हणजे मन एकाग्र झालेले नसते; त्यामुळेच अशी गडबड होते. 
मन एकाग्र होण्यातील आणखी एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे संयम होय. मनावर ताबा किंवा संयम असेल तरच मन एकाग्र होऊ शकते अन्यथा नाही.
जगातील  यशस्वी लोकांकडे पाहिल्यास असे लक्षात येईल की एकाग्रता असल्याने त्यांना यश मिळाले. उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर याचे देता येईल सचिन तेंडुलकर म्हणतो," माझ्या समोर कितीही गर्दी असो, प्रेक्षकांचा किती आरडाओरडा, असो परंतु; माझे लक्ष चेंडू आणि फक्त चेंडू वरच केंद्रित असते त्यामुळेच मला यश मिळते.
 स्वामी विवेकानंद देखील यशासाठी एकाग्रतेला महत्त्वाचे म्हणत होते.
बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या यशाचे रहस्य देखील एकाग्रता हेच आहे. क्रीडा संस्कृती किंवा कला कोणतेही क्षेत्र असो तुम्ही जे कराल त्यात एकाग्रता असेल तर यश हमखास मिळते. लहान मुलांना जर एकाग्रतेची सवय अंगी लावता आली तर मोठेपणी देखील ते एकाग्रतेमुळे  अनेक जण यश संपादन करू शकतात . एकाग्रता साधण्यासाठी अनेक मार्ग आहेत जसे; ध्यान ध्यानधारणेमुळे मनामध्ये इतर विचार न येता आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्यासाठी एकाग्रता साध्य  करता येते. ध्यानासाठी तुम्ही शांत जागा निवडा ज्यामुळे तुमचे मन एकाग्र होईल.
लहान मुलांमध्ये एकाग्रता साधण्यासाठी छोटे-छोटे उपक्रम घेता येतील जसे घटनांचा क्रम लावणे, घटना जुळवून गोष्ट तयार करणे ,अपूर्ण गोष्ट पूर्ण तयार करणे. वस्तूंचे प्राण्यांचे वर्णन करणे .ओंकार म्हणणे अथवा गायत्री मंत्र वारंवार म्हणणे. योगासने करणे. सूर्यनमस्कार घालने यामुळे मनाची एकाग्रता साधता येते.
मोठ्या माणसांनादेखील मनाच्या एकाग्रतेसाठी काही गोष्टी करता येतील. मन जर तणावग्रस्त असेल तर अशावेळी मनाला थोडी विश्रांतीची गरज असते. थोडी विश्रांती मिळाली तर मन एकाग्र होऊ शकते मग मनाला विश्रांती कशी देता येईल तर आवडीचे गाणे ऐकणे, बागकाम करणे, किंवा रोजच्या कामात थोडासा बदल करणे. कामाचा ताण असेल तर मनाचा गोंधळ उडतो व एकाग्रता साधता येत नाही. जगात आता सगळीकडे सर्व क्षेत्रात स्पर्धा आहे या स्पर्धेला लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच सामोरे जावे लागते .स्पर्धा ही थोडी हसत-खेळत अशा पद्धतीने आपण घेतली तर मनावर ताण येणार नाही व मन एकाग्र होईल.
 'त्राटक' हे ध्यान केल्याने मनाची उत्तम एकाग्रता साधता येते तसेच
श्वासावर आधारित सुदर्शन क्रिया
 केल्यास  उत्तम एकाग्रता साधता येते. आयुर्वेदात ब्राम्ही ,शंखपुष्पी अशा औषधांमुळे मनाची एकाग्रता साधता येते असे सांगितलेले आहे. सुगंधी फुले केसात  माळणे अथवा शर्टाला लावल्यास त्या सुगंधाने मन प्रफुल्लित होते व मन एकाग्र होण्यास मदत होते.
मन एकाग्र असेल आजूबाजूला कितीही गोंधळ असेल गोंगाट असेल किंवा दुःखाची छाया असेल तरीदेखील आपल्या ध्येयावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो व यशप्राप्ती शकतो.

सविता साळुंके, श्रीरामपूर
9604231747
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*एकाग्रता*
      जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर एकाग्रचित्ताने काम करणे आवश्यक आहे. यासाठी मन एकाग्र असने आवश्यक आहे. मन एकाग्र करायचे असेल तर योगसाधना करणे आवश्यक आहे. आपल्या देशात अनेक संत, महात्मे होऊन गेले. त्यानी जिवनाचे रहस्य शोधन्यासाठी त्यानी हिमालय, घनदाट जंगल अशा जागा का निवडले? याचे कारण येथे योगसाधना जागृत करता येऊ शकते. हे साध्य करण्यासाठी मन एकाग्र होणे आवश्यक आहे. याच माध्यमातून त्यानी आपल्या शरीरातील कुंडली जागृत करून सत्याचा शोध लावून जगाला खरा मार्ग दाखविला. उदा. गौतम बुद्ध. 
         आपले लक्ष साध्य करायचे असेल तर त्या लक्षावर मन एकाग्र असणे आवश्यक आहे...असाच प्रश्न अर्जुनाला विचाले असता त्याने फक्त पक्षाचा डोळा दिसत होता..ही आहे एकग्रता. याच शक्तीच्या आधारावर अजून अर्जुन सारखा     योद्धा झाला नाही व होणार नाही. 
    लहाणपणी शालेय जीवनात आई,बाबा, गुरूजी सांगाचे 'मन लावून अभ्यास कर' यातच ही एकग्रता आहे. मन करारे चित्त, सर्व यशाचे कारण . येवढे महत्व आहे.  एकग्रतेमुळे कितीही अवघड काम आपण सहज पणे व चांगले करू शकतो. म्हणून मोठे माणसे एखादे काम चुकले तर म्हणतात, कुठे लक्ष आहे.  एकग्रता कमी झाली तर कामात चुका होतात व  काम रटाळ असे होते...म्हणून  आपले कोणतेही काम, धंदा, नोकरी यात जर एकग्रतेने काम केले तर आपले काम छाप पाडणारे असे होऊ शकते...म्हणून असे म्हणता येईल की, एकग्रता ही यशस्वी जिवनाची पायरी आहे. 
          बोईनवाड गुणवंत किशनराव
           होटाळकर (नांदेड)
           9921034211
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
एकाग्रता.
       एकाग्रता (एक+अग्रता) चा अर्थ आहे कुठल्याही लक्ष /उद्देश्य  प्राप्तिसाठी इतर कोणत्याही गोष्टीवर ध्यान न देता   एकच गोष्टी वर ध्यान/ लक्ष  केन्द्रित करणे. यश प्राप्तीचा
एकमात्र मार्ग आहे एकाग्रता. असे म्हणतात ना *अर्जुनाची
एकाग्रता अंगी असल्या शिवाय लक्ष्यवेध होत नाही*. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देणे. जळी काष्टी  पाषाणी  फक्त आपले लक्ष्यच दिसणे. ध्यानी-मनी-स्वप्नी फक्त त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी झटणे. 
     ही एकाग्रता सहज साध्य नाही. ही जाणीव पूर्वक प्रयत्ना ने साध्य करावी लागते . योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते.
     कित्येक हुशार विद्यार्थ्यांना त्याचा हुशारीच्या मानाने  कमी मार्क  मिळतात त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे एकाग्रता नसणे. अनेकांना परीक्षेत मनासारखं यश मिळत नाही. यामागे अभ्यासात लक्ष लागत नाही, आठवत नाही, समोर पुस्तक असतं पण डोक्यात शिरत नाही अशी वेगवेगळी कारणं असतात. पण *मुख्य म्हणजे एकाग्रतेचा अभाव* .
         *यावर उतारा म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती*
आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती. परीक्षेतील यश असो वा नोकरीत आपल्यावर सोपवले गेलेले काम असो.. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्य़ानं साध्य करता येतात. याचे कारण या दोन्ही क्षमतांमुळेच आपल्याला हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास येतो. *आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर या क्षमता विकसित करता येतात*.
        सर्वात प्रथम  आपलं लक्ष एकाग्र का होत नाही, लक्षात का राहात नाही, याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करावा कधी कधी  न आवडता विषय आईवडिलांच्या आग्रहाने घ्यावा लागतो , कधी काही मानसिक अस्वस्थता किंवा  समस्या असते ,ह्या गोष्टीचे आकलन होणे आवश्यक आहे. 
*एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी योगाभ्यास प्राणायाम  आणि ध्यानधारणेचा निश्चितच उपयोग होतो. ज्याना ध्यान जमत नाही त्याने जप करावा*. 
         खालील काही उपाय  लहान मोठे सर्वांना करता येतील. एकटय़ानं वा गटात स्मरणशक्तीचे खेळ खेळता येतील. अगदी साधे खेळ म्हणा प्रयत्न म्हणा ह्याने स्मरण शक्ती नक्कीच वाढवता येते जसे रोज काही गोष्टी आठवण्याचा सराव करणे उदा. शाळा किंवा ऑफिस  ते घर या मार्गातील रस्ते, त्यावरच्या दुकानांच्या पाटय़ा, इमारतींचे आकार, विक्रेत्यांचे स्टॉल्स, इत्त्यादी त्यातील किती गोष्टी आठवतात ह्या कडे लक्ष देणे. ही यादी वाढवत जाणे . पुढे अजून जास्त कठीण गोष्टी एकाच वेळेस अनेक गोष्टी  लक्षात ठेवायचा सराव करणे ,लिहून काढणे. पुढे
 वाचलेलं पुस्तक, खेळलेला खेळ, ऐकलेलं भाषण, पाहिलेलं नाटक, चित्रपट, एखादं दृश्य. सहलीच्या वेळी वा सुट्टीत गावी अनुभवलेल्या गोष्टी अशी आठवता येण्याजोग्या गोष्टीं लिहाव्यात . लिहिल्याने स्मरणशक्ती जास्त विकसित   होते
         विद्यार्थ्यांनी वर्गात दोन तासिकांच्या मधल्या वेळेत, प्रवासात किंवा रात्री झोपताना दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, नव्या शिकलेल्या गोष्टी, शिक्षकांनी विचारलेले प्रश्न, वर्गात झालेली चर्चा असे आठवून बघाव्यात. 
     विविध प्रकारच्या भेंडय़ा लावणं, गोष्ट सांगणं, कविता सादर करणं, विशिष्ट ढंगात विनोद सांगणं, प्रश्नमंजूषा, सुडोकू, शाब्दिक कोडी सोडवल्याने स्मरणशक्तीला चालना मिळते आणि आपल्याला जी गोष्ट करायची आहे, त्यावर आपोआप आपलं लक्ष एकाग्र करायचीही सवय जडते.
  *सकारात्मक  सूचना आणि कल्पना करणे*
    _ते दृश्य डोळ्यासमोर साकार करणे_
हा* अतिशय ऊपयुक्त आणि सिद्ध झालेला प्रयोग आहे*.
आपल्याला हवं ते यश आपण मिळवलंय, ध्येय साध्य केलंय याची दृश्यकल्पना करा (व्हिज्युलाइजेशन). परीक्षेसाठी छान तयारी करत असल्याचं आणि यशस्वी झाल्याची कल्पना तुमचा यशाचा मार्ग सुकर करतं.
       एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच *स्वामी विकेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ म्हणत*.
       आजच्या स्पर्धात्मक युगात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होण्याची महत्त्वपूर्ण आयुधे आहेत  *मेहनत , एकाग्रता आणि स्मरणशक्ती* 
    आजच्या काळात नवीन  पिढी वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिटेशनच्या मार्गाचा अवलंब करीत आहेत. ते थोडीफार ध्यानधारणा करु लागले आहेत, आणि आपल्या कार्यात ही यशस्वी होता हेत

डाॅ.वर्षा सगदेव ना
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
     (11)         एकाग्रता यशाची           गुरुकिल्ली


         'एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे' असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकाग्रता हवीच.

          एकाग्रता शब्द आठवला की माझ्या मनात लगेच अर्जुनाच्या गोष्टीशी तो जोडला जातो. एकाग्रतेच्या बाबतीत गुरु द्रोणांनी घेतलेल्या परीक्षेत फक्त अर्जुनच पास झाला. त्यांनी सर्वांना विचारले, "तुम्हाला झाडावर काय दिसत आहे"? एकट्या अर्जुनाने सांगितले, "मला फक्त तो डोळा दिसत आहे ज्याचा मला वेध घ्यायचा आहे". त्याला आजूबाजूचे काही दिसत नव्हते. जे साध्य आहे तेवढेच फक्त त्याला दिसत होते. अशी ही एकाग्रता.

          कोणतेही काम करताना, ते पूर्ण होईपर्यंत दुसरा विचार मनात न येणे, इतके लक्षपूर्वक काम करणे त्याला एकाग्रता म्हणतात.

           Magnifying  glass सूर्यप्रकाशात धरल्यास सगळे विखुरलेले सूर्य किरण त्यातून जाऊन ते एका बिंदूत केंद्रित होतात. तसेच मनात अगणित विचार असले तरी मनाला खेचून आणून एकाच कामावर केंद्रित करणे म्हणजे एकाग्रता. ध्यान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मनाची एकाग्रता.

           आज ऑफिसमध्ये मला दिलेले कामाचे टार्गेट कसे पूर्ण होणार याची मला चिंता लागली होती. कारण आज माझे कामात लक्षच लागत नव्हते. घरातून निघताना आज नवर्‍याशी भांडून बाहेर पडले होते ना! कामात चुका पण खूप होत्या. म्हणून मी ठरवले की काम थोड्यावेळ थांबवायचे. एक कप कॉफी घेत शांत खुर्चीत बसायचे. मनाला अंधारून गोंजारून शांत करायचे आणि मग कामाला लागायचे. थोडा उशीर झाला तर होऊ दे.  काम तरी व्यवस्थित होईल. म्हणजेच मी भांडणाच्या निमित्ताने आलेल्या सर्व नकारात्मक आलतूफालतू विचारांना मनाच्या बाहेर काढणार आणि फक्त लक्ष देणार आपल्या कामावर, म्हणजे एकाग्र होणार. योग्य वेळी योग्य गोष्टीवर मन केंद्रित करायची सवय मनाला लावलीच पाहिजे.

            परीक्षेच्या आधी आपल्या महत्वाच्या नोट्स हरवतात. त्या आपण शोधत असतो. एकीकडे आई आपल्याला हाक मारत असते. पण आपल्याला ती हाक ऐकू पण येत नाही. इतके आपण शोधण्यात गर्क असतो. आपल्याला आजूबाजूचे भान हे राहत नाही, इतकी एकाग्रता त्या शोधण्यात असते. अशीच एकाग्रता हवी.

           नोकरीसाठी माझा पहिलाच इंटरव्यू होता. अनुभव काहीच नव्हता इंटरव्यू देण्याचा. तरीही माझा इंटरव्यू खूप छान झाला. मला पाहिजे होती ती नोकरी मला मिळाली. कारण उघड होते. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी चांगल्याप्रकारे दिली होती. म्हणजेच अभ्यासात एकाग्रता होती. मी इतके सारे वाचले होते ते आयत्यावेळी आठवलेही होते. म्हणजे स्मरणशक्ती ने हि आपले काम बजावले होते.

          मेंदूत इतक्या गोष्टी साठवलेल्या असतात .

पण ते हवे तेव्हा हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती. एकाग्रतेने मुळे स्मरणशक्ती वाढते.

           मला गणित विषय आवडत नाही. मला शिवणकाम आवडत नाही. आवडत नाही म्हणजे काय होते? त्या कामात किंवा गोष्टीत एकाग्रता होत नाही. त्यामुळे ते काम हवे तसे होत नाही. नावडता विषयात एकाग्रता न झाल्याने नीट आकलन होत नाही. त्यामुळे त्याला नावडता हे लेबल लावले जाते. एकाग्रतेची क्षमता आपल्याला वयाच्या कुठल्याही टप्प्यावर वाढवता येते.

         आपण आपल्या 'आत' डोकावून पाहिले पाहिजे.   आपले मन चंचल किंवा अस्वस्थ का आहे याचा शोध घेतला पाहिजे. एकदा कारण मिळाले की उपाय योजता येतोच.

        मन विचलित करणारी आजची प्रमुख कारणे म्हणजे टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी.

 एखाद्या वेळेस आपण जे काम करणार असतो त्यासंबंधी आपल्याला जास्त माहिती नसते. त्या बाबतीत आपल्याकडे तसे कौशल्य नसते. असे कारण समजून घेतले पाहिजे म्हणजे विचलन दूर करून एकाग्रता करता येईल.

            कामाची पूर्वतयारी केलेली असली म्हणजे प्रत्यक्ष काम करताना विचलन होणार नाही. योग्य वेळी मनाला, बुद्धीला विश्रांती दिली  तर पुढचे काम दुप्पट वेगाने होते. एखाद्या वेळेस मन एकाग्र होत नसेल तर संगीत ऐकणे हा एक चांगला उपाय असू शकतो.

            आपल्याला समोर कामाचा मोठा डोंगर दिसला की असे वाटते, बाप रे! एवढे काम कसे होणार? पण त्याच कामाचे छोटे छोटे तुकडे केले, तर एकाग्रता करण्यास सोपे जाते. तसेच कामाच्या वेळेच्या बाबतीतही. तुम्हाला कामाचा शेवट दिसत असेल तर कामाच्या वेळेत एकाग्रता चांगली होते. त्यामुळे इतक्या वेळात मी काम संपवले पाहिजे, असे ठरवता आले पाहिजे.

            कुठलीही गोष्ट काम करताना इतरांपेक्षा आधी म्हणजे लवकर सुरू करा. म्हणजे कामाचे नियोजन व्यवस्थित होते. त्यामुळे घाई होत नाही. मन आणखी दुसरीकडे भरकटत नाही.

           मन एकाग्र झाले की कुठलेही काम करण्यास ऊर्जा चांगली मिळते. मग यश ठरलेलेच आहे.

           एकाग्रतेसाठी ध्यान करावे. त्यामुळे भरकटलेल्या मनाला, अडथळे बाजूस सारून एकाग्र करायला मदत करते. त्यामुळे प्रायोजित काम करण्यात मन सक्षम बनते. ध्यान आपल्याला वर्तमान काळात राहण्यास अधिक समक्ष करते. सतर्कता ही ध्यानामुळे येते.

          आपले जे ध्येय आहे त्याला आपण visualise केले पाहिजे.  प्रत्यक्ष डोळ्यासमोर सारखे ठेवले तर ध्यानी- मनी- स्वप्नी तेच राहते. त्यामुळे त्या कामातील खाचाखोचा समजतात. त्यातील अडचणींवर मात कशी करता येईल याची उत्तरेही त्यात सापडतात. हे सर्व पूर्ण एकाग्रतेने मुळे घडते.

          आजूबाजूला असणाऱ्या असंख्य विचलित करणाऱ्या गोष्टींवर मात करणारी एकाग्रतेची किल्ली आपल्या जवळ असली तर यश आपलेच.

शुभदा दीक्षित (11)
पुणे
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
सौ.भारती सावंत

          एकाग्रता

   एकांत मिळाल्याशिवाय कधी
   साधत नाही मनाची एकाग्रता
   धकाधकीच्या जीवनात रोजच
   दैनंदिन कामाची होते व्यस्तता
       पूर्वी तपश्चर्या करण्यासाठी ऋषीमुनी हिमालयात किंवा रानावनात बसत. मनाची एकाग्रता असेल तर चिंतन-मनन नि जपजाप्य संकल्प पूर्ण होतात .शहरात किंवा वसाहतीत मन कधीच एकाग्र होऊ शकत नाही. खरे तर आपले मन खूप चंचल असते. त्यास एका जागेवर बसवणे येरागबाळ्याचे काम नाही. कारण जर मनाची चंचलता दूर झाली तर आपले तन मन एकाग्र होते. म्हणजेच एकाग्रता साधण्यासाठी जीवाशिवाचे मिलन होणे आवश्यक आहे.ज्ञानेश्वर, चक्रधर, निवृत्तीनाथ आणि चांगदेव अशा कितीतरी संत महंतांनी आपल्या इंद्रियांवरील संयमाने मनाची एकाग्रता साधल्याचे आपणास वाचावयास मिळाले आहे. त्यामुळेच वयाच्या पंधराव्या वर्षी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मनुष्य एका कामात व्यस्त असताना दुसरे काम करू शकत नाही. नाहीतर 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी स्थिती होऊन बसते. नि कोणतेच काम धड न होता त्या कामाचे उचित फलित मिळत नाही.
         त्यामुळे ज्ञानी किंवा अभ्यासक प्रथम एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करतात. जीवनात काही साध्य करून घ्यायचे असेल तर इंद्रियांवरील नियंत्रण आवश्यक.चंचल मनाला आवर घालावा. काही मुले दिवसा झोपतात नि रात्रीच्या नीरव शांततेत त्यांचा अभ्यास करतात. त्यामुळे त्यांचे मन त्यांच्या काबूत राहते आणि मनाची एकाग्रता लागते. काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते रात्री अभ्यास केल्याने चांगले फळ प्राप्त होते. परंतु झोपेवर नियंत्रण ठेवावे लागते आणि शांत वातावरणात अभ्यासही छान होतो.सुप्रसिद्ध कादंबरीकार किंवा लेखक आपले लेखन करण्यासाठी पहाटेची वेळ निवडतात. प्राणायाम, योगासनेही सकाळचा गजबजाट चालू होण्यापूर्वी केला जातो. त्यामुळे मनाची एकाग्रता असेल तर त्याचे फळ चांगले मिळते.बुद्धी आणि मन यांची सांगड घालता आली की आपणास कामाचा त्रास जाणवत नाही. त्यामुळे आपण चांगले कार्य करण्यासाठी सूर्योदयापूर्वीचीच वेळ निवडतो. एकांतात विचारांची साखळी गुंफली जाते. दुसऱ्या कडून व्यत्यय येत नसेल तर आपल्या मनचक्षूंना आपण जागे ठेवतो नि नवनव्या कल्पनांचा उदय होतो. त्यामुळे मन नि शरीर यांचा मेळ लागण्यासाठी शांत वातावरण असणे फायद्याचे. याच्यामुळे आपल्या हातून सत्कार्यही घडत असते. आपण आपल्या कामात तरबेज होतो. साफल्य मिळते नि उचित परिणिती मिळते. आपल्या  मनासोबत श्वासावर नियंत्रण ठेवू शकतो. 
                विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवत असताना बाहेरून आवाज किंवा काही व्यत्यय असेल तर मनाची एकाग्रता लागत नाही आणि कितीही अभ्यास केलेला असला तरी आपली प्रश्नपत्रिका सोडवण्यात तो सफल होऊ शकत नाही. त्यामुळे जीवनात यशाच्या पायर्‍या चढण्यासाठी मन एकाग्र असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले उपनिषदे, वेद, शास्त्र, पुराण आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. आपण त्यांचे आकलन करू शकतो. कार्यात यशाची पायरी चढायची असेल तर मनाला प्रथम एकाग्र करणे महत्त्वाचे. नाही तर बहिणाबाई चौधरींच्या कवितेप्रमाणे 
  मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर  
 किती हाकला हाकला फिरी येते पिकावर अशी अवस्था होऊन जाते.

सौ.भारती सावंत 
मुंबई
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
➖➖➖➖ ➖➖
भरकटणारे मनं आणि गमावलेली एकाग्रता 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
एखाद्या विशिष्ट ध्येयावर लक्ष केंद्रीत करणे .मनाने सतत त्या ध्येयाचाच ध्यास धरणे .आणि बुध्दी त्या सतत ध्येयाचेच चित्र रेखाटने . ही आहे खरी एकाग्रता. बुध्दी हा मानवाला मिळालेला तिसरा नेत्र आहे. त्याच्या सहाय्याने आपण आपले ध्येय स्पष्टपणे  पाहू शकतो . आधि एखादं ध्येय मनात येत मग , त्याचं चित्रीकरण करण्याचं काम बुध्दी करत असते .
मनं आणि बुध्दी हे मानवाला मिळालेले सूक्ष्म अवयव आहे .
त्यांना आजपर्यंत तरी कोणी पाहु शकलं नाही . कोणीही ठामपणे त्यां अवयवांची जागा शरीरात कोठे आहे हे सांगू शकत नाही . त्याबद्दल अनेकांची भिन्न भिन्न मत आहेत ..
जरी मन आणि बुद्धी डोळ्यांनी पाहू शकत नाही तरी आपण आपल्यात असल्याचे अनुभवतो. 
कोणी म्हणतं बुध्दी मेंदू मध्ये असते पण मेंदूचे ऑपरेशन करताना दिसते का? कोणी म्हणतं मन हृदयात असतं पण हार्ट सर्जरी करताना कोणाला मन सापडले का ? 
     समजा , एका लहान मुलाने एक व्हिडिओ गेम पाहिला आणि त्याला तो खूप आवडला, तेव्हापासून त्याचं मन सतत त्या व्हिडिओ गेमचाच ध्यास धरेल तो शरिरानं शाळेत असेल किंवा कूठे ही असेल पण मन मात्र व्हिडिओ गेम जवळच असेल .  त्याच्या बुध्दी सतत त्या गेमचंच चित्र रेखाटन करत राहिलं जो पर्यंत तो व्हिडिओ गेम त्या मुलाला प्राप्त होत नाही ..
याचाच अर्थ तो व्हिडिओ गेम मिळवणे हे त्याचे प्रमुख ध्येय बनेल मन आणि बुद्धीने तो सतत त्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केलेले असेल . अशाप्रकारे जर एखादा विद्यार्थी जर अभ्यास करत असेल तर त्याच्या मन आणि बुद्धीचा एकचं ध्यास असला पाहिजे अभ्यास आणि अभ्यास मन आणि बुद्धी इकडे तिकडे भरकटली तर तिथे एकाग्रता असू शकत नाही . 
सर्वत्र तनाव आणि चिंता यांचे प्रमाण झपाट्याने वाढतांना दिसून येत आहे . आजकाल लहान मुले सूध्दा तनाव ग्रस्त दिसून येतात , लहानसहान कारणांवरून भांडणं करतात चिडचिड करतात 
 कारण घरात नेहमीच लहान मोठ्या कारणांमुळे सतत होणारे वाद  आणि त्यामुळे बनलेले घरातील तणावग्रस्त वातावरण , घरांतील आपसी संबंधांमध्ये प्रेमाचा अभाव  अशा वातावरणात मन भरकटणे स्वाभाविकच आहे .
 घरातील तणावग्रस्त वातावरणाचा परिणाम लहान थोरांच्या मनावर कमी जास्त प्रमाणात दिसून येतो .
जर मनात एखाद्या बद्दल राग असेल तरं मन सतत त्याला धडा शिकविण्याचाच विचार करत राहिल अशा परिस्थितीत मन दूसरी कडे एकाग्र होऊ शकत नाही .
ज्या मनात इतरांबद्दल इर्षा आणि तिरस्काराची  भावना असेल तर ते मन एकाग्र होऊ शकत नाही .
 काही पालक आपल्या पाल्याची तुलना सतत इतर मुलांशी करीत असता . त्या पालकांना जरा सुध्दा कल्पना नसते की ,आपण आपल्या पाल्याचे मनोबल कमजोर करीत आहोत . आपल्या मुलांना सतत इतर मुलांचे उदाहरणे देऊन सतत त्यांना टोचून बोलणे अशाने लहान मुलांचे मनोबल कमजोर होत जाते अशी मुले अभ्यास एकाग्रतेने करु शकत नाही.
अशी मुले अभ्यास व ईतर ठिकाणी मागे पडतात ..
 लहान वयात जर मनोबल कमजोर झाले तर ती मुलं मोठेपणी आत्मविश्वासाच्या अभावानेच सर्वच ठिकाणी मागे पडतात.
 आपल्या पाल्याला मिळालेल्या लहान लहान यशाचे कौतुक करा. त्याला पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करा.  त्याच्या कडून जर काही चुक झाली तर त्या मागचं कारण प्रेमाने शोधा त्यांना रागवू मारु नका  यामुळे मुलं पुन्हा पुन्हा तिच चुक करतात. इतरांशी त्याचि तूलना करुन त्याला हिणवू नका. त्याला समजून घ्या . त्याला त्यावेळी जास्त प्रेमाची गरज असते . अशावेळी जर त्यांना पालकांकडून प्रेम नाही मिळालं तर मग मुलं तेच प्रेम मित्र मैत्रिणींमध्ये शोधतात . मग पालकांशी मोकळेपणाने संवाद करणे टाळतात आणि पालकांचे ऐकत नाहीत . मित्र मैत्रिणींचा सल्ला त्यांना योग्य वाटू लागतो .. दैवयोगाने जर मित्र आणि मैत्रिणींची संगत चांगली असेल तर ठिक नाहीतर अशी मूलं वाईट संगतीत राहून आपलेच नुकसान करुन घेतात .
 टी.व्हि ., इंटरनेट आणि मोबाईल ही साधने अशी आहेत कि ज्यापासून आपण खूप काही शिकू शकतो .पण त्याचा अति गैर वापरही होऊ शकतो . जर आपण त्याचा अति वापर केला तर आपलं मन आणि बुद्धी इतरत्र भरकटू लागते. जरं आपणच सतत यातच गुंतून गेलो तर आपल्या पाल्याला कुठल्या तोंडाने सांगणार या साधणांपासुन दूर रहा . आधि आपल्याला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले पाहिजे तरच तुमचे पाल्य तुमचे अनुकरण करेल .. 
मन आणि बुध्दीला अस्थिर करण्यात आल्या साधनांचा ही मोठा वाटा आहे .
 काहींना लहानपणापासूनच संघर्षमयी जीवन वाट्याला आले असते . त्यांच्या मार्गात नेहमीच काटें पसरलेले असतात ..पण दृढता आणि संयम यांच्या जोरावर ते पुढील आयुष्यात यश संपादन करतात .
"जर आयुष्यात उंच शिखरे गाठायची असतील तर निश्चय दृढ हवा जिथे निश्चय दृढ तिथे ध्येय स्पष्ट असते ."
"मगं मार्गात कितीही काटें असले तरी यश आपलेच असते ."
ज्या गोष्टी एकाग्रतेला बाधक ठरतात त्या टाळायला हव्यात ..
राग ,व्देष ,मत्सर यांनी आपला स्वभाव चिडचिडा होत जातो आणि आपली बुद्धीत ग्रहण करण्याची क्षमता कमी होत जाते. 
म्हणून नेहमी सरळ स्वभावी राहणं हे हितकारक ठरते .जे सरळ स्वभावी असतात त्यांचं मन इतरत्र भटकण्याची शक्यता फार कमी प्रमाणात असते...
🖋 सौ सुवर्णा सोनावणे
चाळीसगाव
7744880087
➖➖➖➖➖➖➖➖
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(37)
         *एकाग्रता *

    'एकाग्रता ' या शब्दातच अर्थ दडलेला आहे. सरळ अर्थ लावायचा म्हटलं तर फक्त एकाच गोष्टीवर अग्र म्हणजे प्रथम किंवा प्राधान्य देणे. आपल्या दैनंदिन जीवनात दररोज अनेक गोष्टी होत असतात. एकावेळी एकाच गोष्टीवर केंद्र बिंदु ठरवून लक्ष पुरवणे म्हणजे एकाग्रता होय.

     प्रत्येकाच्या जीवनात एकाग्रतेला महत्व असतो. आपण बघतो की अनेकदा वारंवार वाचून सुद्धा एखादी गोष्ट लक्षात राहत नाही किंवा काही कालावधीनंतर आठवत नाही. त्याचे अनेक कारण असू शकतात पण सर्वात मोठे कारण आहे एकाग्रता नसणे.
एकाग्रता ही फक्त बोलण्याने, वाचल्याने किंवा सांगितल्याने येणार नाही. त्याकरिता प्रत्येकाला आपल्या दैनंदिन जीवनातील काहीवेळ स्वतःला द्यावा लागेल. आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळे एवढे व्यस्त आहेत की निर्जीव मशीन प्रमाणे यंत्रवत रात्रंदिन कामाच्या मागे धावत असतात.

   एकाग्रता नसण्याचे दुसरे कारण म्हणजे अनुवांशिकता सुद्धा असू शकते. एकाग्रता नाही हे आपण विविध लक्षणांवरून समजू शकतो. एखादी गोष्ट वारंवार नजरेपुढे येणे, कितीही केलं तरी कामात लक्ष न लागणे, लवकरच विसरणे, इत्यादी. या सर्व उदाहरणांवरून लक्षात येते की मन एकाग्र नाही आणि एकाग्रतेचा अभावामुळे हे सर्व होत आहे.

   एकाग्रता आणण्यासाठी विविध मार्ग आहेत. मेडीटेशन, योग, ध्यानधारणा, विपश्यना अशासारखे अनेक उपायांनी जीवनात मन एकाग्र करून आनंदी जीवनजगता येईल. हे सर्व करण्याकरिता मनावर संयम किंवा ताबा मिळवणे हे महत्वाचे आहे. मन हे विचलित असते. कधी कुणाकडे भरकटेल हे सांगता येत नाही. स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी एकांत आवश्यक असतो. एकांतात सर्व गोष्टींकडून फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागते. आपण नियमित श्वासोच्छ्वास करित असतो तेव्हा नाकाद्वारे शरिरात येणारा श्वास व बाहेर सोडतो तो उच्छ्वास यावर लक्ष केंद्रित करावे. नियमित सरावामुळे हे शक्य होऊ शकते. आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या व जीवनात होणाऱ्या गोष्टींकडून लक्ष बाजुला सारून फक्त श्वासावर नियंत्रण करता येईल. अशाप्रकारे योगसाधना, विपश्यना हे सुद्धा मिळतेजुळते आहे. यामुळे मनाची विचलित होण्याच्या क्रियेवर ताबा मिळवता येईल व कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येईल. लक्ष केंद्रित करता आले म्हणजेच एकाग्रता आली.

      एकाग्रता असली की वाचलेला भाग चटकन लक्षात येतो. विस्मरण होत नाही, लक्षकेंद्रित होतो आणि या सर्वांचा फायदा व्यक्ति ला आपल्या दैनंदिन जीवनात होत असतो. म्हणूनच म्हणतात की 'मनाची एकाग्रता ही यशाची पहिली व महत्वपूर्ण पायरी आहे.'

     एकाग्रता वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्ति परत्वे छंद सुद्धा उपयोगी पडतात. उदा. शब्दकोडे सोडवणे, सुडोकू, मार्गशोधणे, सुंदर हस्ताक्षर काढणे,स्मरणशक्ती वाढवणारे खेळ, वाचलेला भाग किंवा ऐकलेली गोष्ट लिहुन काढणे असे अनेक प्रकार आहेत जे एकाग्रता वाढविण्यात मदत करतात.
 एकाग्रता फक्त विद्यार्थी जीवनातच नाही तर सर्वांनाच आवश्यक आहे. प्रत्येकाला एकावेळी अनेक कामे करावी लागतात तेव्हा मनाची एकाग्रता ही महत्वाची आहे. ज्याप्रमाणे महाभारतातील अर्जुनाला फक्त त्याचं ध्येय म्हणजे फक्त माशाचा डोळाच दिसत होता. मन हे चंचल आहे व ज्याने मनावर ताबा मिळवला व एकाग्रता आली त्याला जीवनात यशस्वी व आनंदी जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करता येते.
  
*सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे*
       गोंदिया
    9423414686
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
एकाग्रता...

श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
वाकदकर (17)


'एकाग्रता ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे' असे स्वामी विवेकानंद म्हणतात. मन एकाग्र असताना केलेल काम हे  यशस्वी होतेचं असा कित्येकांचा दावा खरा ठरलेला आहे. याचा अर्थ आपल कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी मन एकाग्र असणे गरजेचे आहे., परंतु ज्या मनाच्या बाबतीमध्ये विषय लागू करतो ते मन नेमकं आहे कसं याविषयी समजून घेणे गरजेचे आहे. प्राणी यासाठीच अनेक वर्षापासून मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र निर्माण झालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मानवी मनाचा अभ्यास त्यानंतर मानवी वर्तनाचा अभ्यास आणि पुन्हा मानवी मनाचा अभ्यास याच पद्धतीने आज मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हीच पद्धत अस्तित्वात आहे. 

बुद्धी आणि मन
चित्त अहंकार हन
हे चतुरविध चिन्ह
जान अंतकरणाचे...

असं भावार्थदीपिका या ग्रंथामध्ये संत ज्ञानेश्‍वर सांगतात. यावरून अंतकरण चतुर्थ यामध्ये बुद्धी,मन ,चित्त आणि अहंकार यातून माणसाचा अंतकरण बनते असे स्पष्ट होत. या मनाच्या बाबतीमध्ये अनेक संतांनी, शास्त्रांनी आणि साहित्यिकांनी वेगवेगळे चिंतन मांडलेल आहे. 

काय काय करितो या मना .
परी न आवरी नारायणा..

मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिर येते पिकावर.


याचा अर्थ माणसाचं मन हे अतिशय चंचल आहे.या मनाला एका ठिकाणी स्थिर राहणे म्हणजेच मनाची एकाग्रता जागृत करणे हे होय. आणि या मनाला एकाग्र करणं हा अभ्यासाने साध्य होणारा विषय आहे.

you born to blossom या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी माणसाला आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी तीन गोष्टी सांगितलेल्या आहे. या पैकी पहिली गोष्ट म्हणजे प्रार्थना करणे, दुसरी चांगले वाचन करणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आणि नीस्वार्थी अर्थात परमार्थी जीवन जगणे होय.

यामध्ये मनाला प्रसन्न करण्यासाठी माणसाच्या मनाची एकाग्रता वाढवण्याकरिता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी प्रार्थना सुंदर उपाय सांगितलेला आहे. प्रार्थना म्हणजे कुठलाही कर्मकांड नसून माणसाच्या मनाला एका ठिकाणी चांगलं वळण लावण्यासाठी शिस्त देण्याचा तो मार्ग आहे.त्यामानाने चांगला विचार केल्यास मनामध्ये चांगल्या गोष्टींची निर्मिती होते आणि त्यानुसारच मन कृत्य करायला लागतं आणि मग मनाने ठरवलेल्या गोष्टीवर मन केंद्रित होतं आणि मग मनाची एकाग्रता वाढते. 

मौन,जप ,प्राणायाम ,ध्यान, धारणा यातून सुद्धा मनाची एकग्रता वाढवता येते. 

आपल्यासमोर असलेले ध्येयहे निश्चित केल्यास आपले म्हणून त्याच गोष्टीवर केंद्रित होते आणि मग त्यातून मनाची एकाग्रता वाढायला मदत होते. महाभारतातील एक कथेमध्ये द्रोणाचार्य अर्जुनाला विचारतात की तुला त्या झाडावर काय दिसते? त्यावेळी अर्जुनाचे चारही भावंडे वेगळे उत्तर देतात, परंतु अर्जुन मात्र मला त्या झाडावर वेध घेत असताना पक्ष्याचा डोळा दिसतो हेच उत्तर देतो, आणि खऱ्या अर्थाने तो इतिहासप्रसिद्ध धनुर्धारी बनतो.याचा अर्थ आपल्याला जे काम पूर्ण करायचे आहे त्याच कामावर सर्व शक्ती केंद्रित करणे म्हणजेच मनाची एकाग्रता वाढवणे होईल.


मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी आणखी काही गोष्टी करता येईल ते खालील प्रमाणे आहे:-

नियंत्रित जीवन शैलीचा वापर करून मनाची एकाग्रता वाढवतात.करत असलेले काम नियमितपणे वेळच्यावेळी केल्यास मन शांत होते आणि त्यातून मनाला समाधान मिळत जाते आणि मनाची एकाग्रता वाढते.यातून चांगल्या सवयींची रुजवणूक होते मनाला चिडचिडेपणा करण्याची गरज राहत नाही अतिशय समाधान पूर्वक दिलेले काम व्यवस्थित पूर्ण होऊन एकाग्रता वाढते.


योग्य विचार-वाचन जसे मनाचे खाद्य आहे तो योग्य विचार करणे हेसुद्धा मनाचे खाद्य आहे,म्हणून चांगल्या वाचनातून चांगले विचार घडत असतात.चांगल्या विचारातून चांगली कृती होते आणि मन समाधानी,आनंदी होते त्यातून माणसाची एकाग्रता वाढते.

व्यवस्थित झोप आणि व्यायाम हीसुद्धा मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी कारणीभूत घटक आहेत.

मेडिटेशन आणि प्रार्थना केल्याने मनाची एकाग्रता वाढवता येईल.
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(4)  एकाग्रता 

मनुष्य हा समूहशिल प्राणी आहे. समूहाने राहणे हे मनुष्य जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. 
   समूहातील प्रत्येक घटकांचे आवडी-निवडी , सवयी, गरजा सोडविणे हे त्या समूहातील प्रत्येकाने स्वतःचे काम समजून सोडवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.  
    .पूर्वी पासून अदिमानवा पासून  हे चालत आलेलं आहे. नंतर पुढे बदल होत गेले आणि मानव टोळक्या टोळक्याने राहू लागला  वस्तीकरून राहू लागला. 
    तदनंतर पुन्हा मानवाच्या आणखी गरजा वाढल्या, अन्न पूर्वी कच्चे खाल्ले जायचे परंतू नंतर भाजून किंवा शिजवून खाणं पद्धत आली, वस्त्र, निवारा ह्या गरजा वाढल्या आणि त्यांना मूलभूत गरजा म्हणून पाहण्यात येऊ लागले. जसा जसा मानवाचा  विकास होत गेला तसा तसा तो बदलत गेला. पुढे मूलभूत गरजा मध्ये आणखी ही एक गरज मानवाची वाढली.  आजच्या परिस्थितीतील नाही.  पुरातन काळापासूनच ही गरज होती असे म्हणावे लागेल कारण उल्लेख इतिहासात आढळतो आहे ती गरज म्हणजे शिक्षण होय. 
         शिक्षण म्हटलं कि लक्ष अवधान मेहनत या बाबी आल्या आणि त्या सर्व बाबी मन, चित्त या वर अवलंबून असतात आणि चित्त हे एकाग्रतेवर अधारित असते.  चित्त, मन जर स्थिर नसेल तर शिक्षण घेणं सोडा काहीच आत्मसात होऊ शकत नाही.
मुळात शिक्षण ही प्रक्रिया मनावरच चालते म्हणजे शिक्षण मनाला द्यावे लागते. शरीराला देण्यात येणारे शिक्षण हे वेगळे असते.  आणि मनाला मिळणारे संस्कार हे शिक्षण असते म्हणून मन एकाग्र करावे लागते.  लक्ष द्यावे लागते निट ऐकावे लागते, पहावे लागते.  विश्व वंदनीय माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहित असताना किंबहूना सांगताना समस्त श्रोत्यांना विनंती करतात " तरी अवधान एक बार दिजे! मग सर्व सुखाशी पाञ होईजे! हे प्रतिज्ञोत्तर माझे! उघड ऐका!!
  तुम्ही फक्त लक्ष एक वेळ दया, मी तुम्हाला निश्चित फळ देईन. अशी प्रतिज्ञा पूर्वक विनवणी करतात, त्या श्रोत्यांना एकाग्रतेने विवेचन ऐकवितात. 
    जगातील सर्व एकाग्रतेने विद्या प्राप्त केलेल्या विद्यार्थी मंडळींची उदाहरणे आपल्याला ज्ञात आहेत महाभारत काळात अर्जुन महाधनूर्धर बनला कारण एकाग्रता एकदा गुरू द्रोण सर्व शिष्य गण घेऊन एका वनांत जातात.  
        तेथे सर्वाची परीक्षा घेण्यासाठी गुरू सर्वांना बोलावतात, एका झाडावर एक पक्षी बसलेला असतो त्या पक्षाचा डोळा लक्ष सांग तात आणि लगेच प्रत्येकाला आळी पाळीने बोलावतात . आणि विचारातात बोल शिष्या तुला काय दिसते.  सर्व जन सांगतात झाड, पक्षी असे गुरू सर्वांना अप्राञ ठरवतात मग अर्जूनाला बोलावतात आणि विचारतात बोल शिष्या तुला काय दिसते तेव्हा अर्जून उदगारतो मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो.  कारण झाड आणि पक्षी माझं लक्ष नाही लक्ष फक्त डोळा आहे.  तेव्हा अर्जून पाञ ठरतो कारण एकाग्रता हे होते. 
        गुरू द्रोणानी एकलव्याला शिक्षण देण्यास नकार दिल्या नंतर त्याने गुरू द्रोणाचा चिखल मातीचा पुतळा तयार करून एकाग्रता पूर्वक लक्ष दिले आणि विद्या प्राप्त केली. येथे ही एकाग्रता महत्त्वाचा भाग ठरली.
एकाग्रता मानवी मनाची मानसिकता आहे एखाद्याचे मन जर एकाग्रतेत रमले नाही तर सर्व गोष्टी शून्य ठरतात
सांगेन एक छोटीशी गोष्ट एकाग्रता किती महत्त्वाचा घटक आहे ते एकदा एका महान गुरू कडे शंभर विद्यार्थी विद्या मिळविण्यासाठी एका नदी काठी आश्रमात असतात गुरू त्यांना नविन नविन गोष्टी तत्व सांगत असतात. आणि असेच एक दिवस गुरू त्यांना नदीवर घेऊन जातात , जाताना बरोबर एक दुलडी जी वाळलेल्या बाम्बू पासून बनवलेली असते.  ती खूप सछिद्र असते आणि ती भरून जो विद्यार्थी आश्रमात पाणी आणिन तो विद्यार्थी पास किंवा पाञ असे गुरूजीनी सांगितले. 
     विद्यार्थी एकमेकांशी बोलू लागले, गुरूजी बद्दल उलट चर्चा करू लागले. " गुरूजी हे शक्य नाही, काही तरी चुकतंय " तुम्ही निट दुसरा प्रश्न द्या शंभर पैकी नव्याण्णव विद्यार्थ्यानी हेच उत्तर दिले.  एक जन माञ हे एकाग्रतेने ऐकत होता गुरू कडे पूर्ण लक्ष देऊन ऐकत होता सर्व समजून घेऊन त्या पध्दतीने क्रिया करू लागला.  आणि शेवटी आश्रमात पाणी घेऊन गेला. कोण होता तो एकाग्र लक्ष देणारा कुशाग्र विद्यार्थी तर ते होते भारतरत्न स्व.माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम साहेब.  
      त्या दुलडीला त्यांनी लाखो वेळेस पाण्यात खालीवर केले खूप वेळ मेहनत घेतली आणि गुरूचा शब्द खरा बनविला
म्हणजे एकाग्रतेने लक्ष दिले आणि तेच केले आणि अजरामर बनले थोडक्यात एकाग्रता ही मानवाची अतिशय महत्वाची गोष्ट आहे

भागवत गर्कळ बीड
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
07 लेख
एकाग्रता

"  अरे,लक्ष कुठे आहे तुझं ? इकडे लक्ष दे "
 अशी वाक्ये आपल्याला  सगळीकडेच ऐकायला मिळतात. या वाक्यावरून विचारणाऱ्याला हे एकच सांगायचे असते की तू तुझं लक्ष एकाग्र कर. मानवाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता हा गुण आवश्यक आहे. एकाग्रता म्हणजे आपण कोणतेही काम करत असताना आपले पूर्ण लक्ष त्या कामांमध्ये देणे होय.त्या कामात गुंगून जाणे होय. एकाग्रता च्या विरोधी चंचलता हा शब्द आहे. यशस्वी व्यक्तींचा जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्या येते की या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये कार्य करत असताना  कोणतीही गोष्ट एकाग्रपणेच केलेली आहे. अभ्यास करत असताना एकाग्रचित्ताने केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो. कारण त्या वेळेला आपले पूर्ण लक्ष त्या अभ्यासामध्ये लागून राहिलेली असते. विद्यार्थी जीवनामध्ये एकाग्रतेला फार महत्त्व आहे.

 आज सगळीकडे आपण पाहतो की भौतिक सुखाचा  सुळसुळाट झालेला आहे. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळे प्रत्येकाच्या घरी टीव्ही , मोबाइल यासारखे इलेक्ट्रॉनिक साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आजच्या विद्यार्थ्यांना आपले लक्ष अभ्यासात केंद्रित करणेस, एकाग्र करणे कठीण होऊन बसले आहे. कारण ह्या बाह्य आकर्षणाचा परिणाम लहान मुलांच्या मेंदुवर लवकर होतो व बाह्य आकर्षनेच मुलांच्या मेंदूचा ताबा मिळवतात. त्यामुळेच त्यांना अभ्यासात मन एकाग्र करणे जमत नाही.

 आयटी कंपन्यांमध्ये नोकरीला असलेल्या सर्व नोकरदारांना सुद्धा आपले मन एकाग्र करणे कठीण होऊन बसले आहे. कारण त्यांना कामाचा व्यापच इतका आहे की बाकीचा विचार करायला त्यांच्या मेंदूला वेळच नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला विद्यार्थी असो किंवा नोकरदार असो ते वैतागून जातात. कामाची विभागणी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे मेंदूला पण ताण येतो. त्यामुळे चिडचिड वाढते, कलह वाढतो, तणाव वाढतो. म्हणून कोणत्याही गोष्टींमध्ये एकाग्र चित्ताची खूप आवश्यकता आहे.

 जे काम नेमून दिलेले आहे ते काम तर आपल्याला केले पाहिजे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा  तणाव न घेता आपण एकाग्रचित्तही राहिले पाहिजे.मग आपण हे कसे काय केले पाहिजे?  यावर काही उपाय आहे का?  तर यावर उत्तर असे आहे की हो आहे, यावर उपाय आहे. आणि तो म्हणजे मनाची एकाग्रता साधण्याचा सर्वात उत्तम साधन म्हणजे योगासन व प्राणायाम करणे होय. आपण दररोज सकाळी योगासन, प्राणायामाचे विविध प्रकार केले तर आपोआपच आपल्या मनावर आलेला अतिरिक्त ताण हा नष्ट होऊन जातो व आपण दिवसभर प्रफुल्लित राहतो.आपण कोणत्याही ताणतणावा शिवाय राहतो व दिलेल्या कामांमध्ये आपण आपले मन एकाग्र करून दिलेले काम पूर्ण करतो.

 एकाग्रता हा गुण सर्वांनाच गरजेचा आहे. घरामध्ये काम करणारी गृहिणी तिला आपले घरचे कामकाज वेळच्या वेळी होते ते कशामुळे होते ?उत्तर आहे मनाची एकाग्रता.आपल्या डोक्यामध्ये हजारो विषय असतील तर आपले एकही काम धड होत नाही त्यामुळे एकावेळी एकच विचार आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवला व एकाग्रचित्ताने काम केले तर सर्वच थांबलेली आपली कामे यशस्वी होत असतात. तलावाकाठी बसलेला जो बगळा  असतो तो शांत बसून एकाग्रतेने माशाची वाट पाहतो तेव्हांच त्याला खाण्यासाठी मासा मिळतो. म्हणजे त्याला त्याच्या एकाग्रतेचे फळ मिळते.यावरून हेच सार निघते की एकाग्रता हा महत्त्वाचा गुण आहे.सर्वांनाच त्याचे महत्त्व समजले पाहिजे.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
कोड क्र. [ 14 ]

" चित्ताची एकाग्रता " 

     " मन पाखरू पाखरू 
       त्याची काय सांगू दैना
      आता होतं भूईवर
      गेलं गेलं आभायात ! " 
या बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीतून मानवी चंचल मनांचे यथार्थ दर्शन घडून येते . खरंच , ' मन ' ही एक अशी अनाकलनीय संकल्पना आहे . जी कुणालाही स्पष्टपणे उलगडून दाखविता येत नाही . ती आपले स्वरूप निरंतर बदलत असते . अशा बदलत्या चंचल मनात एकाग्रता कशी काय राहील ? ती राहते केवळ स्थिर मनोवृत्ती असणाऱ्या मनात !  आपण नदीच्या स्थिर पाण्यातूनच आपले प्रतिबिंब पाहू शकतो . पण जर ते पाणी आपण हलवून अस्थिर केले तर आपले प्रतिबिंबही आपल्याला हलते व अस्थिरच दिसणार ... ही पाण्याची स्थिती अगदी आपल्या चित्ताशी तंतोतंत मिळतीजुळती आहे ... कारण चित्त स्थिर असल्याशिवाय एकाग्रता साध्य होणार नाही ... म्हणून आधी चंचल मन स्थिर करावे ! ते कसे करावे ? त्यासाठी काय काय करावे ? ते नियंत्रित कसे ठेवावे ? हे सहजासहजी शक्य होत नाही ! त्यासाठी कठोर मानसिक तपोसाधना करावी लागते ... मनाला विवेकाच्या लगामाने नेहमी अंकीत करावे लागते .... मनात फक्त आणि फक्त सात्त्विक भावनांचाच संचय करावा लागतो ... जे काही वाईट , दोष , दुर्गुण आहेत ते महत् प्रयासाने अंर्तमनातून कायमचेच दूरवर फेकून द्यावे लागतात ... काम , क्रोध , मोह , लोभ , माया , मत्सर या षडरिपूंचा तनमनातून त्याग करावा लागतो ... मन नेहमी संयमी , शांत , सद्विवेकी , सदाचारी , परस्परांप्रती प्रेम , करूणा , कणव ठेवावी लागते ... तेव्हा कुठे चंचल मन स्थिर व स्थितप्रज्ञ होणार ... आणि चित्ताची एकाग्रता आपसूक येणार ....

      चित्ताच्या एकाग्रतेसाठी काही प्राणायाम , आसने , सकारात्मक विचारसरणी , संगीत , कलोपासना , ध्यानधारणा , छंद , वाचन इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होतो ... शिवाय ज्योती त्राटक , बिंदू त्राटक , सूर्य त्राटक , श्वासावर लक्ष केंद्रित करणे , आज्ञाचक्रे जागृत करणे , स्वयोंपचार पद्धती , स्वसुचन पद्धती , स्वसंमोहन पद्धती इत्यादींच्या आधारे चित्त एकाग्रता आणता येते ... पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात आंतरिकदृष्ट्या काही तरी शिकण्याची , आत्मसात करण्याची प्रखर अशी इच्छा व तळमळ आधी निर्माण झाली पाहिजे .... तरच ती व्यक्ती एकाग्रतेसाठी प्राप्त ठरते ... अन्यथा जबरदस्तीने खाऊपीऊ घातल्यास परिणामी उलटीच होईल व सर्व मेहनत पाण्यात जाईल ...
म्हणून आधी आंतरिक तहान भूक महत्त्वाची आहे त्याशिवाय स्वतःहून एकाग्रता येत नाही ... आणि ओढून ताणून आणलेली एकाग्रता फळास प्राप्त होत नाही ... स्वयंस्फूर्तीने एकाग्रता आल्यास हमखास यशप्राप्ती मिळतेच ...

     अशाप्रकारे मानवी मनात उपरोक्त प्रकारे प्रयत्नपूर्वक व स्वयंस्फूर्तीने एकाग्रता आणता येईल ... " मन करारे प्रसन्न ! सर्व सिद्धीचे कारण !! " हेही एकाग्रतेसाठी आवश्यक आहे ... शेवटी एवढेच म्हणेल की ,

" स्वभाव सोडा उग्र
  मन होईल एकाग्र 
  गाठाल यशोमार्ग
  धारता शांती मार्ग ! "

    अर्चना दिगांबर गरूड 
    ता. किनवट , जि. नांदेड 
    मो. क्र. 9552963376
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•

•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•








रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...